हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण म्हणून महाशिवरात्रीला ओळखले जाते. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला हा सण साजरा केला जातो. २०२६ मध्ये महाशिवरात्रीच्या तारखेबाबत भाविकांमध्ये काहीसा संभ्रम आहे. शास्त्रानुसार, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी महाशिवरात्री साजरी करणे सर्वात शुभ ठरेल. भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचा हा पावन दिवस देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
१५ फेब्रुवारीलाच महाशिवरात्री का?
पंचांगानुसार, चतुर्दशी तिथीची सुरुवात १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.०४ वाजता सुरु होत आहे. या तिथीची समाप्ती १६ फेब्रुवारीला सायंकाळी ५.३४ वाजता होणार आहे. महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये निशीथ काळ म्हणजेच मध्यरात्रीच्या पूजेला अनन्यसाधारण महत्त्व असते. हा योग १५ फेब्रुवारीच्या रात्री आहे. त्या शास्त्रानुसार याच दिवशी महाशिवरात्री व्रत आणि पूजा करणे फलदायी मानले जातं आहे.
पूजेचे चार प्रहर आणि अचूक वेळ
महाशिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहारांत महादेवाची उपासना केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे. प्रत्येक प्रहरात विशिष्ट वस्तूचा अभिषेक केला जातो.
- प्रथम प्रहर: सायंकाळी ६:१५ ते रात्री ९:२५ (दुधाचा अभिषेक)
- द्वितीय प्रहर: रात्री ९:२५ ते मध्यरात्री १२:३५ (दह्याचा अभिषेक)
- तृतीय प्रहर: मध्यरात्री १२:३५ ते पहाटे ३:४५ (तुपाचा अभिषेक)
- चतुर्थ प्रहर: पहाटे ३:४५ ते सकाळी ६:५५ (मधाचा अभिषेक)
- विशेष निशीथ काळ मुहूर्त: १५ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२:०९ ते १:०० या वेळेत केलेली पूजा अत्यंत शुभ मानली जाते.
महाशिवरात्रीची पूजा कशी कराल?
- महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि उपवासाचा संकल्प करावा.
- त्यानंतर शिवलिंगावर सर्वप्रथम गंगाजल किंवा शुद्ध पाण्याचा अभिषेक करावा.
- दूध, दही, तूप, मध आणि साखर या क्रमाने अभिषेक करून पुन्हा शुद्ध जलाने शिवलिंग स्वच्छ करावे.
- शिवाला प्रिय असलेले बेलपत्र, धतुरा, पांढरी मंदारची फुले, भस्म आणि अक्षता अर्पण कराव्यात.
- पूजा करताना ‘ओम नमः शिवाय’ किंवा ‘महामृत्युंजय मंत्राचा’ मनोभावे जप करावा.
- शेवटी शंकराची आरती करून पांढऱ्या मिठाईचा किंवा फळांचा नैवेद्य दाखवावा.
आध्यात्मिक आणि पौराणिक महत्त्व
धार्मिक मान्यतेनुसार, महाशिवरात्रीलाच भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह संपन्न झाला होता. याच दिवशी शिवाने वैराग्य सोडून गृहस्थाश्रमात प्रवेश केला. शिवपुराणानुसार, याच रात्री महादेव पहिल्यांदा लिंगोद्भव रूपात (अग्नीस्तंभ किंवा ज्योतिर्लिंग) प्रकट झाले होते.
असे मानले जाते की, या रात्री विश्वातील आध्यात्मिक ऊर्जा अत्यंत सक्रिय असते. या दिवशी केलेले ध्यान, जप आणि जागरण इतर दिवसांच्या तुलनेत हजार पटीने जास्त फळ देते. भगवान शिवाने हलाहल विष प्राशन करून जगाचे रक्षण केले, तो दिवसही हाच मानला जातो. काशी विश्वनाथ, उज्जैनचे महाकाल आणि सर्व शिवालयांमध्ये या दिवशी शिव तांडव स्तोत्र आणि रुद्राभिषेकाचा जयघोष भाविकांमध्ये चैतन्य निर्माण करतो.
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel




