
Mumbai : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी अजित पवारांचा राजीनामा मागितला आहे. उद्याच त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. असं झालं नाही तर मी अमित शाहांना दिल्लीत भेटून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करेन असंही म्हटलं आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या पुण्यातल्या 40 एकर जमिनीच्या आर्थिक व्यवहारातील घोळामुळे अजित पवारांवर टीका होते आहे. त्यांनी आपल्या मुलाला पाठीशी घातलं आहे, सत्तेचा दुरुपयोग केला आहे, पार्थवर गुन्हा दाखल का नाही केला, असे अनेक प्रश्न विरोधकांसह अंजली दमानियांनीही उपस्थित केले आहेत. याच व्यवहाराचा पाठपुरावा करताना आज अंजली दमानियांनी पत्रकार परिहोणारी लूट थांबवावी, शेतकऱ्यांचा छळ थांबवा, महसूल विभागाने स्कॅम थांबवा,षदेत खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी सांगितलं की माझ्या हाती आलेला डेटा महाराष्ट्राला हादरवून टाकणारा डेटा आहे.
|
|
हे जे कोणी स्वयंघोषीत भाई- दादा आहेत. त्यांनी आत्ताच्या आत्ता जमिनींची होणारी लूट थांबवावी, शेतकऱ्यांचा छळ थांबवा, महसूल विभागाने स्कॅम थांबवा,असं अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.
पार्थ पवारांची कंपनी अॅमेडियाने फ्रॉडवर फ्रॉड केले आहेत. या कंपनीने एक डेटा सेंटर सुरु करायचे आहे, असे सुरुवातीला एलओआय करताना सांगितले आहे. जमीन विकत घेण्याचा विषयही काढलेला नाही. आम्ही जमीन विकत घेतोय स्टॅम्प ड्युटीवर आम्हाला सूट द्या, अशी मागणी कुठेच नाही. कंपनीचे कागदपत्रे देताना त्यात आम्ही ९८ लाख रुपये गुंतवून डेटा सेंटर सुरु करतोय असं म्हटलं आहे, असं अंजली दमानियांनी यावेळी सांगितलं आहे.
ती ४० एकर जागा ही शितल तेजवानीच्या नावावर आहे. ती आम्ही डेटा सेंटर उभारण्यासाठी ५ वर्षांसाठी लीजवर घेत आहोत, असं दाखवून एलओआय घेतलं आणि जी मोठी स्टॅम्पड्युटी लागणार होती ती फक्त ५०० रुपये भरली, अशी पळवाट काढून यांनी मोठा फ्रॉड केला आहे, असे कित्येक व्यवहार झाले असतील आणि होऊ शकतात, असा खळबळजनक खुलासा अंजली दमानियांनी केला आहे.
हे सगळं घडल्यानंतर ते जागेचा ताबा घेण्याचाही व्यवहार केला गेला. तृप्ता ठाकुर या वकिलांनी ही मागणी केली. कलेक्टरांना केंद्रीय प्रशासनाकडून सांगण्यात आलं की जमिनीवर ताबा घेण्यासाठी कोणी येतंय, कलेक्टरांनी ही सगळी माहिती पालकमंत्री अजित पवारांनी दिली नव्हती का? कलेक्टरांना तहसीलदारांनी जमीनीची विक्री झालेली कळवलं होतं, असं असताना 1800 कोटींच्या जमिनीचा व्यवहार झाल्याचं जूनपासून नोव्हेंबरपर्यंत पालकमंत्र्यांना कलेक्टरांनी सांगितलं नाही, असं होऊ शकतं का? असा सवाल अंजली दमानियांनी उपस्थित केला आहे.
त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रीपद, पालकमंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा, अशीही विनंती केली आहे. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करणारी समिती बरखास्त करा आणि नवी एसआयटी गठीत करा, अशीही मागणी केली आहे. २४ तासात अजित पवारांचा राजीनामा झाला नाही तर मी दिल्लीला जाणार आहे. गृहमंत्री अमित शाहांची भेट घेणार आहे. त्यांनी भेट नाही दिली तर तिथेही मी जोपर्यंत भेट होत नाही तोपर्यंत ठाण मांडून बसणार आहे, असं म्हटलं आहे.
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली





























Subscribe to my channel




