
Maharashtra Politics : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय निघाला, तर आमदार भरत गोगावले यांच्या मंत्रीपदाची नेहमीच चर्चा होत असते. नव्या मंत्रिमंडळ विस्तारात मला स्थान नक्कीच मिळणार, असा विश्वास भरत गोगावले कार्यकर्त्यांसमोर व्यक्त करत असतात. अनेकदा विरोधीपक्षांच्या नेत्यांकडून त्यांना डिवचण्याचा देखील प्रयत्न केला जातो. मात्र, तरी देखील गोगावले शांतपणे उत्तर देतात.
अशातच भरत गोगावले यांच्या मंत्रीपदाबाबत शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी मोठा खुलासा केला आहे. राज्यात जेव्हा शिंदे-भाजप सरकार स्थापन करायचे होते. त्यावेळी कुणाला मंत्रीपद द्यायचं याचा पेच एकनाथ शिंदे यांच्यासमोर होता. तेव्हा भरत गोगावले यांनी सरकार बनवण्यासाठी स्वत: मंत्रीपद नाकारलं होतं, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
|
MP Bus Fire News : मध्य प्रदेशात बसला लागली भीषण आग, 13 जणांचा होरपळून मृत्यू |
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत आणि आमदार भरत गोगावले बुधवारी रायगड दौऱ्यावर आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली. मंत्री उदय सामंत यांनी भाषण करताना गोगावले यांच्या मंत्रीपदाबाबत मोठा खुलासा करत सर्वांनाच चकीत करून टाकलं.
काय म्हणाले उदय सामंत?
"राजकारणात आज कुणाला कोणतंही पद मिळवायचं असेल, तर कधी तो दुसऱ्यासाठी माघार घेत नाही. ज्या दिवशी शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होणार होता, तो दिवस मला आठवतो. मी एकनाथ शिंदे साहेब आणि भरत गोगावले पहाटे ४ वाजता एकत्र चर्चा करत बसलो होतो".
"कुणाला मंत्रीमंडळात स्थान द्यायचं आणि कुणाला नाही, असा संभ्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर होता. पण त्यावेळी भरत गोगावले यांनी थेट सांगितलं, की तुम्हाला जर अडचण होत असेल, मानसिक त्रास होत असेल, तर मला मंत्रीमंडळात घेऊ नका. तुम्ही मुख्यमंत्री झालात म्हणजेच मीच मुख्यमंत्री झालो", असा खुलासा सामंत यांनी केला.
दरम्यान, मंत्री उदय सामंत यांनी भरत गोगावले यांना एक मोलाचा सल्ला देखील दिला. भरत गोगावले यांनी स्वतःचा स्वभाव बदलण गरजेचं आहे. ते लोकांवर इतका विश्वास ठेवतात, की त्यांच्यातील किती टक्के लोक त्यांना फसवतात, हे त्यांनाही माहित नसते, असंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



