शिरूर, पिंपरखेड दि. १० (प्रफुल्ल बोंबे ): शिरूर तालुक्यातील फाकटे, चांडोह, टाकळी हाजी, वडनेर, म्हसे, सरदवाडी आणि माळवाडी गावांमध्ये सुरू असलेल्या वारंवार वीज कपातीविरोधात ग्रामस्थांनी एकत्र येत राज्य सरकारकडे धाव घेतली आहे. सामाजिक कार्यकर्ते शंकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन रात्रीचे लोडशेडिंग तात्काळ बंद करण्याची लेखी मागणी केली. यावेळी परिसरातील बिबट्यांचा वाढता वावर, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होणारा परिणाम आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी यांची सविस्तर माहिती मंत्र्यांसमोर मांडण्यात आली.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या वेळेस वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतीसाठी आवश्यक पाणीपुरवठा, पिकांची देखभाल आणि दैनंदिन कामकाजावर गंभीर परिणाम होत आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळे निर्माण होत असून पालकांमध्ये नाराजी वाढत आहे. परिसरात बिबट्या व सर्पांचा वावर असल्याने रात्रीच्या अंधारात नागरिकांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वीज नसल्यामुळे रस्ते, शेतमळे आणि वस्ती परिसर अंधारात बुडत असून वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचा तसेच अपघातांचा धोका वाढत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
यापूर्वीही महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे अनेक तक्रारी आणि निवेदने देण्यात आली होती. मात्र परिस्थितीत सुधारणा न झाल्याने अखेर ग्रामस्थ, सरपंच, सामाजिक संस्था आणि विविध संघटनांचे पदाधिकारी एकत्र येत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुढाकार घेतला. निवेदनात फाकटे व पंचक्रोशीतील गावांमधील रात्रीचे लोडशेडिंग तात्काळ बंद करणे, नियमित व अखंडित वीजपुरवठा करणे आणि नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, १० जून रोजी शिष्टमंडळाने बारामती येथील महावितरणचे अधीक्षक अभियंता दीपक लहामगे यांची भेट घेतली. ग्रामस्थांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून संबंधित विभागाला आवश्यक सूचना देण्यात आल्याचे सांगत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते शंकर पिंगळे यांनी दिली. परिसरातील नागरिकांना लवकरच लोडशेडिंगच्या समस्येतून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
"बिबट्यांचा धोकाही वाढतोय, विद्यार्थ्यांचा अभ्यासही अंधारात जातोय आणि शेतकऱ्यांची शेतीही संकटात सापडतेय... आता तरी रात्रीचे लोडशेडिंग थांबणार का? बेट भागातील हजारो नागरिकांचा सवाल प्रशासनासमोर उभा ठाकला आहे!"
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
























Subscribe to my channel


