Navi Mumbai Airport Water Leak: Authorities Break Silence After Viral Video Causes Uproar!

नवी मुंबई: विमानतळावर पाणीगळतीचा व्हिडीओ व्हायरल; विमानतळ प्रशासनाचे स्पष्टीकरण, 'प्रवाशांची दिशाभूल होतेय!'

Navi Mumbai Airport Water Leak: Authorities Break Silence After Viral Video Causes Uproar!
नवी मुंबई: आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पाणीगळतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर विमानतळाच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, या प्रकरणावर विमानतळ प्रशासनाने स्पष्टीकरण देत दिशाभूल करणाऱ्या दाव्यांवर आक्षेप नोंदविला आहे.

पाणीगळती कशामुळे झाली?
व्हिडीओमध्ये प्रवाशांच्या बॅगा भिजल्याचा दावा करण्यात आला होता. यावर स्पष्टीकरण देताना व्यवस्थापनाने सांगितले की, १७ जून रोजी बॅगेज बेल्ट क्रमांक ५ आणि ६ जवळ किरकोळ पाणीगळती आढळून आली होती. ही बाब निदर्शनास येताच संबंधित
यंत्रणांनी तातडीने गळती नियंत्रणात आणली. हा परिसर त्वरित बंद करून बॅगेज हाताळणीचे काम पर्यायी बेल्टवर वळविण्यात आले होते. विमानतळावरील दैनंदिन कामकाजावर याचा कोणताही परिणाम झाला नाही आणि ही समस्या अवघ्या अर्ध्या तासात दूर करण्यात आली.

 

बांधकामात दोष नाही
विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, इमारतीच्या छत किंवा भिंतींच्या बांधकामामध्ये कोणताही दोष नाही. पाणीगळती वातानुकूलित (AC) यंत्रणेतील अनपेक्षित तांत्रिक बिघाडामुळे झाली होती. विमानतळाच्या सर्व वातानुकूलित यंत्रणा नवीन आहेत,
मात्र तरीही हा बिघाड कसा झाला, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

डिसेंबर २०२५ मध्ये मोठ्या थाटात उद्घाटन झालेल्या या विमानतळावर लवकरच आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणार आहेत. येत्या १५ जुलैपासून विमानतळावर प्रथम मालवाहू उड्डाणे आणि त्यानंतर प्रवासी उड्डाणे सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *