3 मे रोजी झालेल्या नीट-यूजी 2026 परीक्षेची(देशभरातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतीलप्रवेशासाठीची केंद्रीय परीक्षा) प्रश्नपत्रिका फुटल्यानंतरपरीक्षा रद्द करण्यात आली. हा निर्णय लाखो विद्यार्थीआणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठ्या धक्क्यापेक्षा कमीनव्हता. या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबांनी अनेकमहिने किंबहुना अनेक वर्षे, या एका परीक्षेमुळेभविष्यातील चांगल्या आयुष्याचे दार उघडेल याआशेवर आयुष्य रोखून ठेवले होते. आता नव्याने परीक्षा21 जून रोजी घेण्याचे निश्चित झाले असले तरी परीक्षारद्द होण्याचा परिणाम अधिक गंभीर होत चालला आहे. आतापर्यंत किमान तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलीअसून हजारो विद्यार्थी मानसिक नैराश्याशी झुंज देत आहेत. त्यांच्या समोर पुन्हा एकदा चिंता, अनिश्चितता आणि कठोर अभ्यासाचे दुष्टचक्र उभे राहिले आहे. सरकारने या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेशदिले असून आतापर्यंत नऊ जणांना अटक केली आहे. प्रश्नपत्रिका फुटीचे हे प्रकरण आता अनेक शहरांमध्ये पसरलेल्या घोटाळ्याचे रूप घेताना दिसत आहे. केंद्रीयशिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सरकारला पात्रविद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागू नये, म्हणून परीक्षारद्द केल्याचे सांगितले. त्यांनी पुढील वर्षापासूननीट-यूजी परीक्षा पेन-पेपर पद्धतीऐवजी संगणकावरऑनलाइन घेतली जाईल, असेही स्पष्ट केले. तसेचपुनर्परीक्षा द्यायची नसलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कपरत दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. मात्र, 3 मेरोजी परीक्षा दिलेल्या सुमारे 22.05 लाख विद्यार्थ्यांसाठीपरीक्षा शुल्क महत्त्वाचे नाही. देशातील स्पर्धा परीक्षाव्यवस्था विद्यार्थ्यांकडून आणि त्यांच्या कुटुंबीयांकडूनमोठी किंमत वसूल करते. नुकतेच किशोरवयातून बाहेरपडलेल्या मुलामुलींना कोटा, सीकर, प्रयागराजयांसारख्या शहरांतील ‘कोचिंग फॅक्टरी’मध्ये पाठवलेजाते. ते मित्रांपासून दूर जातात. त्यांची दिनचर्याविस्कळीत होते आणि ते शारीरिक तसेच मानसिकसमस्यांशी झुंज देतात. विशेषतः टियर-2 आणि टियर-3शहरांतील मध्यमवर्गीय कुटुंबे आपल्या मुलांना वैद्यकीयमहाविद्यालयात किंवा आयआयटीमध्ये पाठवण्याचेस्वप्न पाहतात. त्याग करण्यास तयार असतात. कोचिंगसंस्थांची फी आणि मुलांच्या राहणीमानाचा खर्चभागवण्यासाठी ते आयुष्यभराची बचत पणालालावतात. अनेकदा ते दुसऱ्या मुलांच्या लग्नाला विलंबकरतात, अगदी स्वतःच्या उपचारांनाही पुढे ढकलतात.कारण त्यांना आशा असते की, त्यांची मुले एक दिवसपात्र डॉक्टर, अभियंता बनतील किंवा प्रतिष्ठित नोकरीमिळवतील. सरकारी संस्थांमधील अभियांत्रिकी आणिवैद्यकीय शिक्षणासारख्या प्रमुख व्यावसायिकअभ्यासक्रमांच्या परीक्षा केंद्रीकृत पद्धतीने घेण्यासाठी2018 मध्ये एनटीएची स्थापना झाली होती. एनटीएतर्फेआयआयटीसाठी जेईई (मेन), नीट-यूजी,सीयूईटी-यूजी, यूजीसी-नेट आणि सीएसआयआर-नेटयांसारख्या परीक्षा घेतल्या जातात. मात्र, प्रश्नपत्रिकाफुटी आणि परीक्षा रद्द होण्याच्या वादांमुळे तिची प्रतिमासातत्याने मलिन होत आहे. शिक्षण मंत्रालयाने 2024मध्ये संसदेत दिलेल्या माहितीनुसार एनटीएने 240परीक्षा यशस्वीपणे घेतल्या होत्या. मात्र, त्याचकालावधीत प्रतिष्ठित पदे आणि प्रवेशांशी संबंधितकिमान 16 महत्त्वाच्या परीक्षा स्थगित कराव्या लागल्याहोत्या. 2025 मध्ये शिक्षणविषयक संसदीय स्थायीसमितीने नमूद केले की, 2024-25 या कालावधीतएनटीएने घेतलेल्या 14 स्पर्धा परीक्षांपैकी किमान पाचपरीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका फुटी आणि निकाल प्रक्रियेतीलत्रुटींसारख्या गंभीर समस्या आढळल्या. सर्वात गंभीर बाब म्हणजे नीट-यूजी प्रथमच अशाघोटाळ्यात अडकलेली नाही. 2024 मध्येहीप्रश्नपत्रिका फुटली होती. त्या वर्षी हे प्रकरण सर्वोच्चन्यायालयात गेले होते. न्यायालयाने प्रश्नपत्रिकाफुटल्याचे मान्य केले होते, मात्र पुनर्परीक्षेमुळेविद्यार्थ्यांवर मोठा ताण येईल, असे सांगत परीक्षा रद्दकरण्यास नकार दिला होता. प्रश्नपत्रिका फुटी आणिइतर समस्या सातत्याने एनटीएच्याच मागे का लागल्याआहेत, याचे उत्तर शिक्षण मंत्रालयाने द्यायला हवे. कारणएनटीएतर्फे न घेतल्या जाणाऱ्या सीबीएसई आणियूपीएससीसारख्या परीक्षा बहुतांश वेळा अशासमस्यांपासून दूर राहिलेल्या दिसतात. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) युवकांना समान संधी देणारी पारदर्शकव्यवस्था असावी, अशी धारणाअसलेल्या परीक्षा प्रणालीच्याविश्वासार्हतेलाच मोठा धक्का बसलाआहे. वारंवार निराशा करणाऱ्या संस्थेवरलोकांनी अखेर किती काळ विश्वासठेवायचा?
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- इचलकरंजीकरांची तहान भागणार! जुने दानवाड येथून नवी 'राधाकृष्ण' पाणी योजना; आमदार राहुल आवाडेंनी मांडला प्लॅन, मुख्यमंत्र्यांचे आदेश
- पुणेकरांच्या चिंतेत वाढ! धरणांतील खालावलेल्या पाणीसाठ्यामुळे उद्यापासून शहरात 'एक दिवसाआड' पाणीपुरवठा; महापालिकेचा मोठा निर्णय
- 'एल निनो'च्या संकटावर 'एआय'चा उतारा! महाराष्ट्रातील ४० लाख शेतकऱ्यांना होणार फायदा; कृषी विभागाकडून हायटेक प्रणाली सज्ज
- बळीराजाला सर्वात मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सुरू, थेट बँक खात्यात निधी जमा होण्यास सुरुवात; एकनाथ शिंदेंची मोठी माहिती
महाराष्ट्र
- पुणेकरांच्या चिंतेत वाढ! धरणांतील खालावलेल्या पाणीसाठ्यामुळे उद्यापासून शहरात 'एक दिवसाआड' पाणीपुरवठा; महापालिकेचा मोठा निर्णय
- 'एल निनो'च्या संकटावर 'एआय'चा उतारा! महाराष्ट्रातील ४० लाख शेतकऱ्यांना होणार फायदा; कृषी विभागाकडून हायटेक प्रणाली सज्ज
- बळीराजाला सर्वात मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सुरू, थेट बँक खात्यात निधी जमा होण्यास सुरुवात; एकनाथ शिंदेंची मोठी माहिती
- सोलापूर आयटी पार्कचा मार्ग मोकळा! कृष्णा खोरे नियामक मंडळाकडून लॉजिस्टिक पार्कचा जुना ठराव रद्द; २० हेक्टर जागा एमआयडीसीकडे हस्तांतरित होणार
गुन्हा
- मुंबई: बीकेसीमध्ये धावणार देशातील पहिली 'पॉड टॅक्सी'! स्वप्न की वास्तव? प्रकल्पाच्या उपयुक्ततेवर उपस्थित झाले प्रश्नचिन्ह.
- बीड हादरले! तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार, फोटो-व्हिडिओच्या जोरावर ब्लॅकमेलिंग; अंबाजोगाई परिसरातील धक्कादायक प्रकार
- पुण्यात थरार! महिलेशी चॅटिंगच्या संशयातून तरुणाचे अपहरण; दिवेघाटात सिनेस्टाईल पाठलाग करत पोलिसांकडून सुटका.
- अमेरिका: हैदराबादचा तरुण अंशुल कुंचा याचा 'फेक' पिझ्झा डिलिव्हरीच्या जाळ्यात अडकवून गोळ्या झाडून खून!
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
- भाजप पदाधिकारी अजित आचरेकरला DRI कडून बेड्या; संजय राऊतांचा रवींद्र चव्हाणांवर गंभीर आरोप!
इतर
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
- दैनिक राशिभविष्य ७ जून २०२६: आज कोणत्या राशींवर असेल गणपती बाप्पाची कृपा? जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य ६ जून २०२६ : या राशींना मिळणार नोकरीत प्रमोशन तर काहींचा वाढणार खर्च!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- महायुद्धाचा भडका! इस्रायलकडून इराणमधील प्रमुख शहरांवर भीषण हल्ला; प्रत्युत्तरात इराणकडून ३० क्षेपणास्त्रांचा मारा, 'ऑपरेशन नस्र' सुरू
- दिल्ली: विमानतळावर निसर्गाचा तडाखा! वादळामुळे एअर इंडियाच्या तीन विमानांचे नुकसान; लोखंडी स्टॅण्ड झाले 'खेळणी'
- भंडारा: वैनगंगा नदीत बोट उलटून दोन तरुणांचा बुडून मृत्यू; पाच जण सुदैवाने बचावले!
- अमेरिका: हैदराबादचा तरुण अंशुल कुंचा याचा 'फेक' पिझ्झा डिलिव्हरीच्या जाळ्यात अडकवून गोळ्या झाडून खून!


























Subscribe to my channel


