3 मे रोजी झालेल्या नीट-यूजी 2026 परीक्षेची(देशभरातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतीलप्रवेशासाठीची केंद्रीय परीक्षा) प्रश्नपत्रिका फुटल्यानंतरपरीक्षा रद्द करण्यात आली. हा निर्णय लाखो विद्यार्थीआणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठ्या धक्क्यापेक्षा कमीनव्हता. या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबांनी अनेकमहिने किंबहुना अनेक वर्षे, या एका परीक्षेमुळेभविष्यातील चांगल्या आयुष्याचे दार उघडेल याआशेवर आयुष्य रोखून ठेवले होते. आता नव्याने परीक्षा21 जून रोजी घेण्याचे निश्चित झाले असले तरी परीक्षारद्द होण्याचा परिणाम अधिक गंभीर होत चालला आहे. आतापर्यंत किमान तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलीअसून हजारो विद्यार्थी मानसिक नैराश्याशी झुंज देत आहेत. त्यांच्या समोर पुन्हा एकदा चिंता, अनिश्चितता आणि कठोर अभ्यासाचे दुष्टचक्र उभे राहिले आहे. सरकारने या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेशदिले असून आतापर्यंत नऊ जणांना अटक केली आहे. प्रश्नपत्रिका फुटीचे हे प्रकरण आता अनेक शहरांमध्ये पसरलेल्या घोटाळ्याचे रूप घेताना दिसत आहे. केंद्रीयशिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सरकारला पात्रविद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागू नये, म्हणून परीक्षारद्द केल्याचे सांगितले. त्यांनी पुढील वर्षापासूननीट-यूजी परीक्षा पेन-पेपर पद्धतीऐवजी संगणकावरऑनलाइन घेतली जाईल, असेही स्पष्ट केले. तसेचपुनर्परीक्षा द्यायची नसलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कपरत दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. मात्र, 3 मेरोजी परीक्षा दिलेल्या सुमारे 22.05 लाख विद्यार्थ्यांसाठीपरीक्षा शुल्क महत्त्वाचे नाही. देशातील स्पर्धा परीक्षाव्यवस्था विद्यार्थ्यांकडून आणि त्यांच्या कुटुंबीयांकडूनमोठी किंमत वसूल करते. नुकतेच किशोरवयातून बाहेरपडलेल्या मुलामुलींना कोटा, सीकर, प्रयागराजयांसारख्या शहरांतील ‘कोचिंग फॅक्टरी’मध्ये पाठवलेजाते. ते मित्रांपासून दूर जातात. त्यांची दिनचर्याविस्कळीत होते आणि ते शारीरिक तसेच मानसिकसमस्यांशी झुंज देतात. विशेषतः टियर-2 आणि टियर-3शहरांतील मध्यमवर्गीय कुटुंबे आपल्या मुलांना वैद्यकीयमहाविद्यालयात किंवा आयआयटीमध्ये पाठवण्याचेस्वप्न पाहतात. त्याग करण्यास तयार असतात. कोचिंगसंस्थांची फी आणि मुलांच्या राहणीमानाचा खर्चभागवण्यासाठी ते आयुष्यभराची बचत पणालालावतात. अनेकदा ते दुसऱ्या मुलांच्या लग्नाला विलंबकरतात, अगदी स्वतःच्या उपचारांनाही पुढे ढकलतात.कारण त्यांना आशा असते की, त्यांची मुले एक दिवसपात्र डॉक्टर, अभियंता बनतील किंवा प्रतिष्ठित नोकरीमिळवतील. सरकारी संस्थांमधील अभियांत्रिकी आणिवैद्यकीय शिक्षणासारख्या प्रमुख व्यावसायिकअभ्यासक्रमांच्या परीक्षा केंद्रीकृत पद्धतीने घेण्यासाठी2018 मध्ये एनटीएची स्थापना झाली होती. एनटीएतर्फेआयआयटीसाठी जेईई (मेन), नीट-यूजी,सीयूईटी-यूजी, यूजीसी-नेट आणि सीएसआयआर-नेटयांसारख्या परीक्षा घेतल्या जातात. मात्र, प्रश्नपत्रिकाफुटी आणि परीक्षा रद्द होण्याच्या वादांमुळे तिची प्रतिमासातत्याने मलिन होत आहे. शिक्षण मंत्रालयाने 2024मध्ये संसदेत दिलेल्या माहितीनुसार एनटीएने 240परीक्षा यशस्वीपणे घेतल्या होत्या. मात्र, त्याचकालावधीत प्रतिष्ठित पदे आणि प्रवेशांशी संबंधितकिमान 16 महत्त्वाच्या परीक्षा स्थगित कराव्या लागल्याहोत्या. 2025 मध्ये शिक्षणविषयक संसदीय स्थायीसमितीने नमूद केले की, 2024-25 या कालावधीतएनटीएने घेतलेल्या 14 स्पर्धा परीक्षांपैकी किमान पाचपरीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका फुटी आणि निकाल प्रक्रियेतीलत्रुटींसारख्या गंभीर समस्या आढळल्या. सर्वात गंभीर बाब म्हणजे नीट-यूजी प्रथमच अशाघोटाळ्यात अडकलेली नाही. 2024 मध्येहीप्रश्नपत्रिका फुटली होती. त्या वर्षी हे प्रकरण सर्वोच्चन्यायालयात गेले होते. न्यायालयाने प्रश्नपत्रिकाफुटल्याचे मान्य केले होते, मात्र पुनर्परीक्षेमुळेविद्यार्थ्यांवर मोठा ताण येईल, असे सांगत परीक्षा रद्दकरण्यास नकार दिला होता. प्रश्नपत्रिका फुटी आणिइतर समस्या सातत्याने एनटीएच्याच मागे का लागल्याआहेत, याचे उत्तर शिक्षण मंत्रालयाने द्यायला हवे. कारणएनटीएतर्फे न घेतल्या जाणाऱ्या सीबीएसई आणियूपीएससीसारख्या परीक्षा बहुतांश वेळा अशासमस्यांपासून दूर राहिलेल्या दिसतात. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) युवकांना समान संधी देणारी पारदर्शकव्यवस्था असावी, अशी धारणाअसलेल्या परीक्षा प्रणालीच्याविश्वासार्हतेलाच मोठा धक्का बसलाआहे. वारंवार निराशा करणाऱ्या संस्थेवरलोकांनी अखेर किती काळ विश्वासठेवायचा?
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.


























Subscribe to my channel



