
Maharashtra : नकाशानुसार महाराष्ट्र हे भारताच्या दक्षिण मध्यात येतं. मराठमोळ्या महाराष्ट्राला अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य लाभलेलं आहे. लाँग विकेंड जवळ येताच पर्यंटक अगदी नवनव्या ठिकाणांना भेटी देण्याच्या तयारीत दिसून येतात. यंदा महाराष्ट्र दिनी तुम्हीही महाराष्ट्रातील निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य अनुभवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी महाराष्ट्रातील ही ९ ठिकाणं बेस्ट ऑप्शन्स ठरू शकतात.
१. अमरावती
महाराष्ट्राच्या उत्तर पूर्व दिशेला असलेले अमरावती देवतांचे राजा इन्द्रांचे शहर म्हणून ओळखले जाते. अनेक ऐतिहासिक मंदिरे आणि अभयारण्ये या ठिकाणी भेट देण्यासाठी पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. येथील देवी अंबा, भगवान श्रीकृष्ण आणि वेंकटेश्वर मंदिरे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. येथील चीकलधरा आणि धरनी तहसिलमधे असलेले टायगर रिझर्व्ह एकूण 1597 स्केअर फिट परिसरात पसरलेले आहे.

२. नाशिक
नाशिकला नासहिक नावानेही ओळखले जाते. नाशिक महाराष्ट्राच्या उत्तर-पश्चिम भागात स्थित आहे. हे शहर हिंदू धर्मियांचं प्रमुख तिर्थ क्षेत्र आहे. नाशिकमधे भरणार कुंभ मेळा पर्यटकांचं विशेष आकर्षण आहे. येथे १२ ज्योतिर्लिंगांमधील एक त्र्यंबकेश्वर मंदिरसुद्धा आहे.

३. पुणे
पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणतात. पुण्याला क्वीन ऑफ द डेक्कनच्या नावानेही ओळखलं जातं. पुण्यात शनिवारवाडा महाल आहे जे पेशव्यांचे निवासस्थान होते. प्रथम बाजीराव यांनी या महालाचा पाया उभारला होता. पुण्यात प्रसिद्ध आगाखान पॅलेससुद्धा आहे. हा महाल 1892 मधे इमाम सुल्तान मोहम्मद शाह आगाखान तृतीय बांधला होता. 1969 मधे चौथ्या आगाखानने हा महाल भारत सकारला सुपूर्द केला.

४. मुंबई
मुंबईला आधी बॉम्बे नावाने ओळखले जायचे. भारताच्या चार प्रमुख महानगरांपैकी एक असण्याबरोबरच ही महाराष्ट्राची राजधानीदेखील आहे. मुंबईला भारताची आर्थिक राजधानीसुद्धा म्हटले जाते. येथे देशातील प्रमुख वित्तीय केंद्र आहे. येथे गेटवे ऑफ इंडिया, हाजी अली, जोगेश्वरी गुफा, हँगिंग गार्डन,सिद्धीविनायक मंदिर, मरीन ड्राइव्ह ही ठीकाणं पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे.

५. रत्नागिरी
समुद्राने घेरलेलं आणि बाल गंगाधर टिळक यांचं जन्मस्थान असलेलं रत्नागिरी. रत्नागिरी महाराष्ट्र राज्यातील दक्षिण-पश्चिम भागातील अरबी समुद्रतटी वसलेलं आहे. हा कोकण क्षेत्राचाच एक भाग आहे. रत्नागिरीला लांबलचक समुद्रकिनारा लाभलेला आहे. येथे हजारो छोटे स्तूप, असंख्य मूर्त्यांचे अवशेष आढळले आहेत. थीवा महाल, रत्नागिरी किल्ला ही ठिकाणं पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे.

६. लोणावळा
लोणावडा हे एक हिल स्टेशन आहे. याला सह्याद्री पर्वतरांगांचे मणि या नावानेही ओळखले जाते. लोणावड्याला मुंबई आणि पुण्याच्या मध्यातील प्रवेशद्वारही मानलं जातं. वुड पार्क लोणावड्याच्या मुख्य बाजारपेठाच्या अगदी मागे आहे. हे एक जैविक उद्यान आहे. या पार्कच्या विरुद्ध दिशेला एक जुनी ईसाई स्मशानभूमी आहे. जी शेकडो वर्षे जुनी आहे.

७. औरंगाबाद
औरंगाबाद जगात अजिंठा आणि एलोराच्या प्रसिद्ध बौद्ध गुहांसाठी प्रसिद्ध आहे. या गुहांना वर्ल्ड हेरिटेजमधे समाविष्ट करून घेण्यात आले होते. मध्यकाळात औरंगाबादचं भारतात महत्वपूर्ण स्थान होतं. औरंगजेबने त्याचे शेवटचे दिवस याच ठिकाणी घालवले. औरंगजेबची पत्नी रबिया दुरानीचा मकबरासुद्धा येथेच आहे.

८. दौलताबाद
हे शहर औरंगाबाद जिल्ह्यात येतं. दौलताबाद शहरात बऱ्याच ऐतिहासिक इमारती आहेत. या इमारतींमधे जामा मस्जिद, चांद मीनार, चीनी महाल आणि दौलताबादच्या किल्ल्याचा देखील समावेश आहे.

९. महाबळेश्वर
हे ठिकाण महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आहे. महाबळेश्वरचं पर्यंटन क्षेत्र पर्यटकांमधे विशेष आकर्षण आहे. येथे कृष्णाभाई मंदिर, 3 मंकी पाइंट, वेन्ना झील, लिंगमाला वॉटरफॉल, Kate's Point, विलसन पॉइंट यांसारखी प्रेक्षणीय स्थळं आहेत. महाबळेश्वरजवळच फिरण्यासाठी प्रतापगढ किल्ला देखील आहे.

शहर
- पुण्यात माणुसकीला काळिमा! मुलगा होत नसल्याने छळ; चिमुकल्या मुलासह विवाहितेची जीवनयात्रा संपवली
- मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात! कर्नाळा घाटात टेम्पो ट्रॅव्हलर उलटली; १० प्रवासी गंभीर जखमी
- एअर इंडियाचा नवा 'महाराजा' कोण? ७ मे रोजी टाटा समूहाची महत्त्वाची बैठक; संकटात सापडलेल्या एअरलाईन्ससाठी दोन मोठी नावे चर्चेत!
- मुंबईत संशयाचा रक्तरंजित शेवट! पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून भाजी विक्रेत्याने तरुणाची केली हत्या; मृतदेह नाल्यात फेकला
महाराष्ट्र
- 'मिसिंग लिंक'वर फोटो काढण्यासाठी थांबलात तर खिसा होणार रिकामा; दोन दिवसांत ९० वाहनांवर दणक्यात कारवाई
- पुण्यात माणुसकीला काळिमा! मुलगा होत नसल्याने छळ; चिमुकल्या मुलासह विवाहितेची जीवनयात्रा संपवली
- आणेवाडी टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा! पुणे-बेंगळुरू महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; पर्यायी मार्गांवरही वाहनांचा वेढा
- मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात! कर्नाळा घाटात टेम्पो ट्रॅव्हलर उलटली; १० प्रवासी गंभीर जखमी
गुन्हा
- बीडमध्ये धक्कादायक 'दृश्यम' स्टाईल मर्डर! पत्नीनेच बहीण आणि मेहुण्याच्या मदतीने केला पतीचा खून; ८ महिन्यांनंतर गोदावरी पात्रात सापडला सांगाडा
- हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमधून रस्ते अपघाताची एक अत्यंत अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे
- मुंबईत संशयाचा रक्तरंजित शेवट! पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून भाजी विक्रेत्याने तरुणाची केली हत्या; मृतदेह नाल्यात फेकला
- परभणीत खळबळ! पोलीस मुख्यालयातील जमादाराचा शेतात आढळला मृतदेह; घातपात की अपघात? तपास सुरू
राजकीय
- पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान: ममता बॅनर्जी विरुद्ध भाजप लढतीत नवा ट्विस्ट; तज्ज्ञांनी वर्तवला 'सायलेंट व्होटर्स'चा अंदाज
- बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश; शेतकरी आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार
- पुणे शिवसेनेत (ठाकरे गट) खांदेपालट: संघटनात्मक बांधणीसाठी संजय राऊत यांचा मोठा निर्णय
- 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
इतर
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
मनोरंजन
विडियो गॅलेरी

देश विदेश
- होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये थरार! इराणच्या लष्कराने भारताकडे येणारे मालवाहू जहाज घेतले ताब्यात; 'मॉस्किटो फ्लीट' कारवाईचा व्हिडिओ व्हायरल
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?























Subscribe to my channel




