पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:अंतर्मनातील डोळ्यांनीच‎ दिशाभ्रम दूर होणे शक्य

डोळ्यांना डोळ्यांनी पाहण्यासाठीही आरशाची गरज लागते. विज्ञान‎डोळ्यांना फक्त दिसणे यांच्याशी जोडते. मात्र अध्यात्मशास्त्र सांगते‎की, दोन डोळे अंतर्मनातही असतात. भगवान शंकरांच्या तिसऱ्या‎डोळ्याची गोष्ट वेगळी. अंतर्मनातील डोळे पाहण्यासाठी डोळे मिटले‎पाहिजेत. मौन धारण करावे. ध्यानाच्या दिशेने चालल्यावर जाणवते की,‎आतही डोळे आहेत. त्यांचा उपयोग काय? तुलसीदासांनी एक प्रसंग‎लिहिला . काकभुशुंडी गरुडाला सांगतात— “जब जेहि दिसि भ्रम होई‎खगेसा, सो कह पच्छिम उयउ दिनेसा।” हे पक्षीराज, दिशाभ्रम झालेला‎व्यक्ती म्हणतो की सूर्य पश्चिमेला उगवला आहे. ही स्थिती पूर्ण गोंधळ,‎दिग्भ्रमाची असते. यात उजवे-डावे, पुढे-मागे, भूत, वर्तमान, भविष्य‎यांचा गोंधळ होतो. विज्ञान याला डिमेन्शिया किंवा अल्झायमर असे नाव‎देते. काकभुशुंडी यांनी याचाच संकेत दिला आहे की, दिशाभ्रम‎भल्याभल्या लोकांनाही होऊ शकतो. यावर उपाय फक्त अंतर्मनातील‎नेत्रद्वारे होऊ शकतो.‎‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *