राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांच्यासह आणखीसहा नेते भाजपमध्ये गेल्यानंतर आम आदमी पक्षातनिर्माण झालेली उलथापालथ ही केवळ भ्रष्टाचारविरोधीआंदोलनातून जन्मलेल्या या पक्षाच्या ऱ्हासाची सुरुवातनाही. हा मध्यमवर्गाच्या स्वप्नाचा भंगही आहे. त्यातश्रीमंत, बाहुबलींच्या हातातून सत्ता काढून राजकारणालाकाही लोकांच्या स्वार्थाऐवजी व्यापक सामाजिक हिताचेसाधन बनवण्याची या वर्गाची इच्छा होती. राज्यसभेत राघव चड्ढा ‘आप’चा चमकता चेहरा बनलेहोते. यावरून भारतीय मध्यमवर्गाशी त्यांच्या पूर्वीच्यापक्षाचे किती घट्ट नाते होते, हे दिसून येते. हा वर्ग होतात्या काळातील राजकारणाला कंटाळला होता आणि काहीतरी नवे व अर्थपूर्ण घडवू इच्छित होता. राघव यांनी 13 वर्षे टीका केली, त्याच पक्षात आता त्यांनी प्रवेशकेला आहे. यावरून आजचे राजकारण किती पोकळझाले आहे, हे स्पष्ट होते. येथे आदर्श आणि निष्ठा यांना वैयक्तिक स्वार्थ आणि अति महत्त्वाकांक्षेच्या वेदीवरबळी दिले जाते. मात्र, केवळ राघव यांनाच दोष देणेयोग्य ठरेल का? ते अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षात कालांतराने निर्माण झालेल्या विसंगतींचे प्रतीक आहेत. ‘आप’ने भाजप आणि काँग्रेससारख्या मोठ्यापक्षांना हरवून दिल्लीच्या राजकारणात प्रवेश केला. तेव्हा मध्यमवर्गाच्या अपेक्षा वेगळ्या होत्या. कार्यक्षमता,पारदर्शकता आणि सहभागाची अपेक्षा ठेवणाऱ्यामध्यमवर्गाच्या जोरावर ‘आप’ आणि केजरीवाल सत्तेतआले. त्यांनी लोकांना शासनाच्या केंद्रस्थानी ठेवण्याचेआश्वासन दिले होते. केजरीवाल यांचे आर्थिक मॉडेलपारंपरिक पक्षांसारखे कॉर्पोरेट निधीवर आधारित नव्हते.त्यांनी लाखो समर्थकांच्या छोट्या-छोट्या देणग्यांवरविश्वास ठेवला होता. ते नव्या प्रकारच्या राजकारणाचेस्वप्न पाहत होते. नायब राज्यपालांशी सततच्यासंघर्षामुळे केजरीवाल यांच्यासमोर अडचणी होत्या, हेखरे असले तरी ते स्वतःही सत्तेच्या मोहापासून दूर राहूशकले नाहीत. साधेपणाने सरकारी निवासात राहण्याचेआश्वासन असूनही त्यांनी स्वतःसाठी मोठा बंगलाउभारला. राजधानीत पक्ष मजबूत करण्याआधीच त्यांचीमहत्त्वाकांक्षा दिल्लीच्या बाहेर गेली होती. हरियाणा,पंजाब, गुजरात आणि गोवा अशा राज्यांकडे त्यांनी लक्षवळवले. या वाढत्या महत्त्वाकांक्षेचा दुहेरी परिणामदिसला. त्यांचे जुने आणि विश्वासू सहकारी मध्येचत्यांच्यापासून दूर गेले. योगेंद्र यादव, प्रशांत भूषण,शाजिया इल्मी, अल्का लांबा, कुमार विश्वास आणिकपिल मिश्रा यांसारखी अनेक नावे यामध्ये आहेत.पक्षाचा विस्तार करण्यासाठी अधिक संसाधनांची गरजहोती. देणगीआधारित आर्थिक मॉडेल आणिकार्यकर्त्यांची ताकद दिल्ली जिंकण्यासाठी पुरेशी ठरली,पण मोठ्या राज्यांमध्ये वेगाने विस्तार करण्यासाठी तीअपुरी पडली. यानंतर केजरीवाल आणि त्यांच्यानिकटवर्तीय सल्लागारांविरोधात ईडी आणिसीबीआयच्या चौकशा सुरू झाल्या. 2025 च्या दिल्लीविधानसभा निवडणुकीपूर्वी केजरीवाल यांच्यासहअनेक नेत्यांना तुरुंगात जावे लागले. सीबीआयचेप्रकरण खालच्या न्यायालयाने फेटाळले. मात्र यागोंधळात 2025 मधील निवडणुकीतील पराभव निश्चितझाला होता. दिल्लीत ‘आप’चा आणि स्वतः केजरीवालयांचा त्यांच्या मतदारसंघात झालेला पराभव पाहता,सध्याचे पक्षांतर जवळपास अपेक्षितच होते. केजरीवाल,चड्ढा व ‘आप’ची ही कहाणी आजच्या राजकारणातीलउणिवांची आठवण करून देते. सत्तेला व्यक्तीपूजा,धनबल,बाहुबलाऐवजी सेवा आधारित बनवू इच्छिणाऱ्यामध्यमवर्गीय आदर्शवाद्यांसाठीही हा मोठा इशारा आहे.मानवी विकास व आधुनिक प्रगतीला समान महत्त्वमिळावे, अशी अपेक्षा असणाऱ्यांनी यातून धडा घ्यावा. केजरीवाल आणि ‘आप’चा राजकीय शेवट झाला,असे आत्ताच म्हणणे घाईचे ठरेल. मात्र राज्यसभेतीलपक्षाचा ऱ्हास दिल्लीत अशा प्रक्रियेला सुरुवात करूशकतो. त्याचा परिणाम पंजाबमध्येही दिसू शकतो.पुढील वर्षी पंजाबमध्ये ‘आप’ सरकारसमोर पुढची मोठीनिवडणूक परीक्षा आहे. ‘आप’चा अंतर्गतविस्कळीतपणा हा बदलाची आशा बाळगणाऱ्या छोट्यापक्षांसमोरील आव्हानांनाही अधोरेखित करतो. ( हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) ‘आप’ची ही कहाणी आजच्याराजकारणातील उणिवांची ठळकआठवण करून देते. सत्तेला व्यक्ती पूजा,धनबल व बाहुबलाऐवजी सेवा आधारितबनवू इच्छिणाऱ्या मध्यमवर्गीयआदर्शवाद्यांसाठीही हा मोठा इशारा आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
- मुंबईत पाणी माफियांचा खेळ खल्लास! पालिकेकडून वॉटर टँकरसाठी 'OTP' सिस्टीम लागू; आता घरबसल्या करा पारदर्शक बुकिंग!
- उत्तर प्रदेशात 'सैराट'सारखा थरार! परीक्षा केंद्राबाहेर पडलेल्या पत्नीला घेण्यासाठी आलेल्या पतीची साल्याकडून हत्या
महाराष्ट्र
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
- मुंबईत पाणी माफियांचा खेळ खल्लास! पालिकेकडून वॉटर टँकरसाठी 'OTP' सिस्टीम लागू; आता घरबसल्या करा पारदर्शक बुकिंग!
- उत्तर प्रदेशात 'सैराट'सारखा थरार! परीक्षा केंद्राबाहेर पडलेल्या पत्नीला घेण्यासाठी आलेल्या पतीची साल्याकडून हत्या
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
- इस्रायलमध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा; भारत-इस्रायल मैत्रीची नवी गाथा
- दाम्पत्य रस्ता चुकले, जिवाला मुकले! गोवा बांबोळी महामार्गावर कारची दुचाकीला जोरदार धडक; वृद्ध पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

























Subscribe to my channel


