आरती जेरथ यांचा कॉलम:‎‎‎‎‎‎‎‎‎‎‘आप’चे पतन हे मध्यमवर्गीय ‎स्वप्नांचा भंग होण्यासारखे‎

राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांच्यासह आणखी‎सहा नेते भाजपमध्ये गेल्यानंतर आम आदमी पक्षात‎निर्माण झालेली उलथापालथ ही केवळ भ्रष्टाचारविरोधी‎आंदोलनातून जन्मलेल्या या पक्षाच्या ऱ्हासाची सुरुवात‎नाही. हा मध्यमवर्गाच्या स्वप्नाचा भंगही आहे. त्यात‎श्रीमंत, बाहुबलींच्या हातातून सत्ता काढून राजकारणाला‎काही लोकांच्या स्वार्थाऐवजी व्यापक सामाजिक हिताचे‎साधन बनवण्याची या वर्गाची इच्छा होती.‎ राज्यसभेत राघव चड्ढा ‘आप’चा चमकता चेहरा बनले‎होते. यावरून भारतीय मध्यमवर्गाशी त्यांच्या पूर्वीच्या‎पक्षाचे किती घट्ट नाते होते, हे दिसून येते. हा वर्ग होता‎त्या काळातील राजकारणाला कंटाळला होता आणि ‎‎काहीतरी नवे व अर्थपूर्ण घडवू इच्छित होता. राघव यांनी‎ 13 वर्षे टीका केली, त्याच पक्षात आता त्यांनी प्रवेश‎केला आहे. यावरून आजचे राजकारण किती पोकळ‎झाले आहे, हे स्पष्ट होते. येथे आदर्श आणि निष्ठा यांना ‎‎वैयक्तिक स्वार्थ आणि अति महत्त्वाकांक्षेच्या वेदीवर‎बळी दिले जाते. मात्र, केवळ राघव यांनाच दोष देणे‎योग्य ठरेल का? ते अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या ‎‎पक्षात कालांतराने निर्माण झालेल्या विसंगतींचे प्रतीक ‎‎आहेत. ‘आप’ने भाजप आणि काँग्रेससारख्या मोठ्या‎पक्षांना हरवून दिल्लीच्या राजकारणात प्रवेश केला.‎ तेव्हा मध्यमवर्गाच्या अपेक्षा वेगळ्या होत्या. कार्यक्षमता,‎पारदर्शकता आणि सहभागाची अपेक्षा ठेवणाऱ्या‎मध्यमवर्गाच्या जोरावर ‘आप’ आणि केजरीवाल सत्तेत‎आले. त्यांनी लोकांना शासनाच्या केंद्रस्थानी ठेवण्याचे‎आश्वासन दिले होते. केजरीवाल यांचे आर्थिक मॉडेल‎पारंपरिक पक्षांसारखे कॉर्पोरेट निधीवर आधारित नव्हते.‎त्यांनी लाखो समर्थकांच्या छोट्या-छोट्या देणग्यांवर‎विश्वास ठेवला होता. ते नव्या प्रकारच्या राजकारणाचे‎स्वप्न पाहत होते. नायब राज्यपालांशी सततच्या‎संघर्षामुळे केजरीवाल यांच्यासमोर अडचणी होत्या, हे‎खरे असले तरी ते स्वतःही सत्तेच्या मोहापासून दूर राहू‎शकले नाहीत. साधेपणाने सरकारी निवासात राहण्याचे‎आश्वासन असूनही त्यांनी स्वतःसाठी मोठा बंगला‎उभारला. राजधानीत पक्ष मजबूत करण्याआधीच त्यांची‎महत्त्वाकांक्षा दिल्लीच्या बाहेर गेली होती. हरियाणा,‎पंजाब, गुजरात आणि गोवा अशा राज्यांकडे त्यांनी लक्ष‎वळवले. या वाढत्या महत्त्वाकांक्षेचा दुहेरी परिणाम‎दिसला. त्यांचे जुने आणि विश्वासू सहकारी मध्येच‎त्यांच्यापासून दूर गेले. योगेंद्र यादव, प्रशांत भूषण,‎शाजिया इल्मी, अल्का लांबा, कुमार विश्वास आणि‎कपिल मिश्रा यांसारखी अनेक नावे यामध्ये आहेत.‎पक्षाचा विस्तार करण्यासाठी अधिक संसाधनांची गरज‎होती. देणगीआधारित आर्थिक मॉडेल आणि‎कार्यकर्त्यांची ताकद दिल्ली जिंकण्यासाठी पुरेशी ठरली,‎पण मोठ्या राज्यांमध्ये वेगाने विस्तार करण्यासाठी ती‎अपुरी पडली. यानंतर केजरीवाल आणि त्यांच्या‎निकटवर्तीय सल्लागारांविरोधात ईडी आणि‎सीबीआयच्या चौकशा सुरू झाल्या. 2025 च्या दिल्ली‎विधानसभा निवडणुकीपूर्वी केजरीवाल यांच्यासह‎अनेक नेत्यांना तुरुंगात जावे लागले. सीबीआयचे‎प्रकरण खालच्या न्यायालयाने फेटाळले. मात्र या‎गोंधळात 2025 मधील निवडणुकीतील पराभव निश्चित‎झाला होता. दिल्लीत ‘आप’चा आणि स्वतः केजरीवाल‎यांचा त्यांच्या मतदारसंघात झालेला पराभव पाहता,‎सध्याचे पक्षांतर जवळपास अपेक्षितच होते. केजरीवाल,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎चड्ढा व ‘आप’ची ही कहाणी आजच्या राजकारणातील‎उणिवांची आठवण करून देते. सत्तेला व्यक्तीपूजा,‎धनबल,बाहुबलाऐवजी सेवा आधारित बनवू इच्छिणाऱ्या‎मध्यमवर्गीय आदर्शवाद्यांसाठीही हा मोठा इशारा आहे.‎मानवी विकास व आधुनिक प्रगतीला समान महत्त्व‎मिळावे, अशी अपेक्षा असणाऱ्यांनी यातून धडा घ्यावा.‎ केजरीवाल आणि ‘आप’चा राजकीय शेवट झाला,‎असे आत्ताच म्हणणे घाईचे ठरेल. मात्र राज्यसभेतील‎पक्षाचा ऱ्हास दिल्लीत अशा प्रक्रियेला सुरुवात करू‎शकतो. त्याचा परिणाम पंजाबमध्येही दिसू शकतो.‎पुढील वर्षी पंजाबमध्ये ‘आप’ सरकारसमोर पुढची मोठी‎निवडणूक परीक्षा आहे. ‘आप’चा अंतर्गत‎विस्कळीतपणा हा बदलाची आशा बाळगणाऱ्या छोट्या‎पक्षांसमोरील आव्हानांनाही अधोरेखित करतो.‎ ( हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) ‘आप’ची ही कहाणी आजच्या‎राजकारणातील उणिवांची ठळक‎आठवण करून देते. सत्तेला व्यक्ती पूजा,‎धनबल व बाहुबलाऐवजी सेवा आधारित‎बनवू इच्छिणाऱ्या मध्यमवर्गीय‎आदर्शवाद्यांसाठीही हा मोठा इशारा आहे.‎‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

इतर

पुणे : भारतात तोंडाच्या आरोग्याकडे अजूनही अनेकदा दुर्लक्ष केले जाते. अनेक जण दातदुखी किंवा गंभीर त्रास होईपर्यंत उपचार पुढे ढकलतात. मात्र, दंततज्ज्ञांच्या मते ही सवय भविष्यात अधिक महाग ठरू शकते. पुण्यातील दंतचिकित्सक डॉ. प्रेयस गायकवाड यांनी सांगितले की, किडलेले दात, हिरड्यांचे संसर्ग, दातांच्या रचनेतील समस्या अशा अनेक तक्रारी हळूहळू वाढत जातात. योग्य वेळी तपासणी आणि उपचार झाले तर हे प्रश्न सहज, कमी वेळात आणि कमी खर्चात सोडवता येतात. “रुग्ण योग्य वेळी आले तर उपचार सोपे, जलद आणि कमी खर्चिक होतात. उशीर केल्यास समस्या अधिक गुंतागुंतीच्या होतात,” असे डॉ. गायकवाड म्हणाले. आधुनिक दंतसेवांमध्ये आता प्रौढांसह मुलांसाठीही सर्वसमावेशक उपचार उपलब्ध आहेत. यामध्ये नियमित तपासणी, दातांची स्वच्छता, रूट कॅनल, दात सरळ करणे, दात बसवणे तसेच आपत्कालीन उपचारांचा समावेश आहे. तसेच, अनेक क्लिनिकमध्ये आता ईएमआय (EMI) आधारित पेमेंट पर्यायही उपलब्ध होत आहेत. त्यामुळे मोठ्या उपचारांचा आर्थिक भार एकदम न पडता हप्त्यांमध्ये उपचार घेणे शक्य होत आहे. विशेषतः कुटुंबांमध्ये वेगवेगळ्या वयोगटातील सदस्यांच्या दंतउपचारांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरत आहे. तज्ज्ञांच्या मते, तोंडाचे आरोग्य हे केवळ दातांपुरते मर्यादित नसून त्याचा परिणाम आहार, बोलणे आणि शरीराच्या एकूण आरोग्यावरही होतो. त्यामुळे नियमित तपासणी आणि वेळेवर उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे. डॉक्टर सल्ला साठी सम्पर्क - डॉ. गायकवाड डेंटल क्लिनिक, साईधाम सोसायटी, शॉप नं. २, धानोरी पोलीस चौकीच्या शेजारी, धानोरी, पुणे, महाराष्ट्र – ४११०१५ एकंदरीत संदेश स्पष्ट आहे — दंतउपचार पुढे ढकलू नका. वेळेवर घेतलेली काळजी आरोग्य सुरक्षित ठेवतेच, शिवाय भविष्यातील मानसिक आणि आर्थिक ताणही कमी करते.

In India, oral health is still frequently neglected.

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *