राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांच्यासह आणखीसहा नेते भाजपमध्ये गेल्यानंतर आम आदमी पक्षातनिर्माण झालेली उलथापालथ ही केवळ भ्रष्टाचारविरोधीआंदोलनातून जन्मलेल्या या पक्षाच्या ऱ्हासाची सुरुवातनाही. हा मध्यमवर्गाच्या स्वप्नाचा भंगही आहे. त्यातश्रीमंत, बाहुबलींच्या हातातून सत्ता काढून राजकारणालाकाही लोकांच्या स्वार्थाऐवजी व्यापक सामाजिक हिताचेसाधन बनवण्याची या वर्गाची इच्छा होती. राज्यसभेत राघव चड्ढा ‘आप’चा चमकता चेहरा बनलेहोते. यावरून भारतीय मध्यमवर्गाशी त्यांच्या पूर्वीच्यापक्षाचे किती घट्ट नाते होते, हे दिसून येते. हा वर्ग होतात्या काळातील राजकारणाला कंटाळला होता आणि काहीतरी नवे व अर्थपूर्ण घडवू इच्छित होता. राघव यांनी 13 वर्षे टीका केली, त्याच पक्षात आता त्यांनी प्रवेशकेला आहे. यावरून आजचे राजकारण किती पोकळझाले आहे, हे स्पष्ट होते. येथे आदर्श आणि निष्ठा यांना वैयक्तिक स्वार्थ आणि अति महत्त्वाकांक्षेच्या वेदीवरबळी दिले जाते. मात्र, केवळ राघव यांनाच दोष देणेयोग्य ठरेल का? ते अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षात कालांतराने निर्माण झालेल्या विसंगतींचे प्रतीक आहेत. ‘आप’ने भाजप आणि काँग्रेससारख्या मोठ्यापक्षांना हरवून दिल्लीच्या राजकारणात प्रवेश केला. तेव्हा मध्यमवर्गाच्या अपेक्षा वेगळ्या होत्या. कार्यक्षमता,पारदर्शकता आणि सहभागाची अपेक्षा ठेवणाऱ्यामध्यमवर्गाच्या जोरावर ‘आप’ आणि केजरीवाल सत्तेतआले. त्यांनी लोकांना शासनाच्या केंद्रस्थानी ठेवण्याचेआश्वासन दिले होते. केजरीवाल यांचे आर्थिक मॉडेलपारंपरिक पक्षांसारखे कॉर्पोरेट निधीवर आधारित नव्हते.त्यांनी लाखो समर्थकांच्या छोट्या-छोट्या देणग्यांवरविश्वास ठेवला होता. ते नव्या प्रकारच्या राजकारणाचेस्वप्न पाहत होते. नायब राज्यपालांशी सततच्यासंघर्षामुळे केजरीवाल यांच्यासमोर अडचणी होत्या, हेखरे असले तरी ते स्वतःही सत्तेच्या मोहापासून दूर राहूशकले नाहीत. साधेपणाने सरकारी निवासात राहण्याचेआश्वासन असूनही त्यांनी स्वतःसाठी मोठा बंगलाउभारला. राजधानीत पक्ष मजबूत करण्याआधीच त्यांचीमहत्त्वाकांक्षा दिल्लीच्या बाहेर गेली होती. हरियाणा,पंजाब, गुजरात आणि गोवा अशा राज्यांकडे त्यांनी लक्षवळवले. या वाढत्या महत्त्वाकांक्षेचा दुहेरी परिणामदिसला. त्यांचे जुने आणि विश्वासू सहकारी मध्येचत्यांच्यापासून दूर गेले. योगेंद्र यादव, प्रशांत भूषण,शाजिया इल्मी, अल्का लांबा, कुमार विश्वास आणिकपिल मिश्रा यांसारखी अनेक नावे यामध्ये आहेत.पक्षाचा विस्तार करण्यासाठी अधिक संसाधनांची गरजहोती. देणगीआधारित आर्थिक मॉडेल आणिकार्यकर्त्यांची ताकद दिल्ली जिंकण्यासाठी पुरेशी ठरली,पण मोठ्या राज्यांमध्ये वेगाने विस्तार करण्यासाठी तीअपुरी पडली. यानंतर केजरीवाल आणि त्यांच्यानिकटवर्तीय सल्लागारांविरोधात ईडी आणिसीबीआयच्या चौकशा सुरू झाल्या. 2025 च्या दिल्लीविधानसभा निवडणुकीपूर्वी केजरीवाल यांच्यासहअनेक नेत्यांना तुरुंगात जावे लागले. सीबीआयचेप्रकरण खालच्या न्यायालयाने फेटाळले. मात्र यागोंधळात 2025 मधील निवडणुकीतील पराभव निश्चितझाला होता. दिल्लीत ‘आप’चा आणि स्वतः केजरीवालयांचा त्यांच्या मतदारसंघात झालेला पराभव पाहता,सध्याचे पक्षांतर जवळपास अपेक्षितच होते. केजरीवाल,चड्ढा व ‘आप’ची ही कहाणी आजच्या राजकारणातीलउणिवांची आठवण करून देते. सत्तेला व्यक्तीपूजा,धनबल,बाहुबलाऐवजी सेवा आधारित बनवू इच्छिणाऱ्यामध्यमवर्गीय आदर्शवाद्यांसाठीही हा मोठा इशारा आहे.मानवी विकास व आधुनिक प्रगतीला समान महत्त्वमिळावे, अशी अपेक्षा असणाऱ्यांनी यातून धडा घ्यावा. केजरीवाल आणि ‘आप’चा राजकीय शेवट झाला,असे आत्ताच म्हणणे घाईचे ठरेल. मात्र राज्यसभेतीलपक्षाचा ऱ्हास दिल्लीत अशा प्रक्रियेला सुरुवात करूशकतो. त्याचा परिणाम पंजाबमध्येही दिसू शकतो.पुढील वर्षी पंजाबमध्ये ‘आप’ सरकारसमोर पुढची मोठीनिवडणूक परीक्षा आहे. ‘आप’चा अंतर्गतविस्कळीतपणा हा बदलाची आशा बाळगणाऱ्या छोट्यापक्षांसमोरील आव्हानांनाही अधोरेखित करतो. ( हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) ‘आप’ची ही कहाणी आजच्याराजकारणातील उणिवांची ठळकआठवण करून देते. सत्तेला व्यक्ती पूजा,धनबल व बाहुबलाऐवजी सेवा आधारितबनवू इच्छिणाऱ्या मध्यमवर्गीयआदर्शवाद्यांसाठीही हा मोठा इशारा आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
























Subscribe to my channel


