राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांच्यासह आणखीसहा नेते भाजपमध्ये गेल्यानंतर आम आदमी पक्षातनिर्माण झालेली उलथापालथ ही केवळ भ्रष्टाचारविरोधीआंदोलनातून जन्मलेल्या या पक्षाच्या ऱ्हासाची सुरुवातनाही. हा मध्यमवर्गाच्या स्वप्नाचा भंगही आहे. त्यातश्रीमंत, बाहुबलींच्या हातातून सत्ता काढून राजकारणालाकाही लोकांच्या स्वार्थाऐवजी व्यापक सामाजिक हिताचेसाधन बनवण्याची या वर्गाची इच्छा होती. राज्यसभेत राघव चड्ढा ‘आप’चा चमकता चेहरा बनलेहोते. यावरून भारतीय मध्यमवर्गाशी त्यांच्या पूर्वीच्यापक्षाचे किती घट्ट नाते होते, हे दिसून येते. हा वर्ग होतात्या काळातील राजकारणाला कंटाळला होता आणि काहीतरी नवे व अर्थपूर्ण घडवू इच्छित होता. राघव यांनी 13 वर्षे टीका केली, त्याच पक्षात आता त्यांनी प्रवेशकेला आहे. यावरून आजचे राजकारण किती पोकळझाले आहे, हे स्पष्ट होते. येथे आदर्श आणि निष्ठा यांना वैयक्तिक स्वार्थ आणि अति महत्त्वाकांक्षेच्या वेदीवरबळी दिले जाते. मात्र, केवळ राघव यांनाच दोष देणेयोग्य ठरेल का? ते अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षात कालांतराने निर्माण झालेल्या विसंगतींचे प्रतीक आहेत. ‘आप’ने भाजप आणि काँग्रेससारख्या मोठ्यापक्षांना हरवून दिल्लीच्या राजकारणात प्रवेश केला. तेव्हा मध्यमवर्गाच्या अपेक्षा वेगळ्या होत्या. कार्यक्षमता,पारदर्शकता आणि सहभागाची अपेक्षा ठेवणाऱ्यामध्यमवर्गाच्या जोरावर ‘आप’ आणि केजरीवाल सत्तेतआले. त्यांनी लोकांना शासनाच्या केंद्रस्थानी ठेवण्याचेआश्वासन दिले होते. केजरीवाल यांचे आर्थिक मॉडेलपारंपरिक पक्षांसारखे कॉर्पोरेट निधीवर आधारित नव्हते.त्यांनी लाखो समर्थकांच्या छोट्या-छोट्या देणग्यांवरविश्वास ठेवला होता. ते नव्या प्रकारच्या राजकारणाचेस्वप्न पाहत होते. नायब राज्यपालांशी सततच्यासंघर्षामुळे केजरीवाल यांच्यासमोर अडचणी होत्या, हेखरे असले तरी ते स्वतःही सत्तेच्या मोहापासून दूर राहूशकले नाहीत. साधेपणाने सरकारी निवासात राहण्याचेआश्वासन असूनही त्यांनी स्वतःसाठी मोठा बंगलाउभारला. राजधानीत पक्ष मजबूत करण्याआधीच त्यांचीमहत्त्वाकांक्षा दिल्लीच्या बाहेर गेली होती. हरियाणा,पंजाब, गुजरात आणि गोवा अशा राज्यांकडे त्यांनी लक्षवळवले. या वाढत्या महत्त्वाकांक्षेचा दुहेरी परिणामदिसला. त्यांचे जुने आणि विश्वासू सहकारी मध्येचत्यांच्यापासून दूर गेले. योगेंद्र यादव, प्रशांत भूषण,शाजिया इल्मी, अल्का लांबा, कुमार विश्वास आणिकपिल मिश्रा यांसारखी अनेक नावे यामध्ये आहेत.पक्षाचा विस्तार करण्यासाठी अधिक संसाधनांची गरजहोती. देणगीआधारित आर्थिक मॉडेल आणिकार्यकर्त्यांची ताकद दिल्ली जिंकण्यासाठी पुरेशी ठरली,पण मोठ्या राज्यांमध्ये वेगाने विस्तार करण्यासाठी तीअपुरी पडली. यानंतर केजरीवाल आणि त्यांच्यानिकटवर्तीय सल्लागारांविरोधात ईडी आणिसीबीआयच्या चौकशा सुरू झाल्या. 2025 च्या दिल्लीविधानसभा निवडणुकीपूर्वी केजरीवाल यांच्यासहअनेक नेत्यांना तुरुंगात जावे लागले. सीबीआयचेप्रकरण खालच्या न्यायालयाने फेटाळले. मात्र यागोंधळात 2025 मधील निवडणुकीतील पराभव निश्चितझाला होता. दिल्लीत ‘आप’चा आणि स्वतः केजरीवालयांचा त्यांच्या मतदारसंघात झालेला पराभव पाहता,सध्याचे पक्षांतर जवळपास अपेक्षितच होते. केजरीवाल,चड्ढा व ‘आप’ची ही कहाणी आजच्या राजकारणातीलउणिवांची आठवण करून देते. सत्तेला व्यक्तीपूजा,धनबल,बाहुबलाऐवजी सेवा आधारित बनवू इच्छिणाऱ्यामध्यमवर्गीय आदर्शवाद्यांसाठीही हा मोठा इशारा आहे.मानवी विकास व आधुनिक प्रगतीला समान महत्त्वमिळावे, अशी अपेक्षा असणाऱ्यांनी यातून धडा घ्यावा. केजरीवाल आणि ‘आप’चा राजकीय शेवट झाला,असे आत्ताच म्हणणे घाईचे ठरेल. मात्र राज्यसभेतीलपक्षाचा ऱ्हास दिल्लीत अशा प्रक्रियेला सुरुवात करूशकतो. त्याचा परिणाम पंजाबमध्येही दिसू शकतो.पुढील वर्षी पंजाबमध्ये ‘आप’ सरकारसमोर पुढची मोठीनिवडणूक परीक्षा आहे. ‘आप’चा अंतर्गतविस्कळीतपणा हा बदलाची आशा बाळगणाऱ्या छोट्यापक्षांसमोरील आव्हानांनाही अधोरेखित करतो. ( हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) ‘आप’ची ही कहाणी आजच्याराजकारणातील उणिवांची ठळकआठवण करून देते. सत्तेला व्यक्ती पूजा,धनबल व बाहुबलाऐवजी सेवा आधारितबनवू इच्छिणाऱ्या मध्यमवर्गीयआदर्शवाद्यांसाठीही हा मोठा इशारा आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-पुणे ते पंढरपूर विशेष रेल्वे जाहीर, कधी सुटणार आणि कुठे थांबणार
- मुंबई: कल्याणमध्ये खळबळजनक हत्याकांड; मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची २ सहकाऱ्यांनी केली निर्घृण हत्या, हत्येमागचे धक्कादायक कारण समोर
- नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा
- पुणे: कात्रजमध्ये थरारक खून! डोके, चेहरा आणि हातावर कोयत्याने अनेक वार करत १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या
महाराष्ट्र
- मुंबई: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-पुणे ते पंढरपूर विशेष रेल्वे जाहीर, कधी सुटणार आणि कुठे थांबणार
- मुंबई: कल्याणमध्ये खळबळजनक हत्याकांड; मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची २ सहकाऱ्यांनी केली निर्घृण हत्या, हत्येमागचे धक्कादायक कारण समोर
- नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा
- मध्य प्रदेश: दिवसाढवळ्या थरारक हत्याकांड! हॉटेलबाहेर ६० वर्षीय वकीलाची गोली झाडून निर्घृण हत्या, ३ हल्लेखोर फरार
गुन्हा
- सांगली: पेठनाका येथे भीषण अपघात, डंपरच्या धडकेत पतीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी; परिसरात शोककळा
- छत्रपती संभाजीनगर: छळाला कंटाळून महिलेनं संपवलं जीवन; तीन चिमुकले आईच्या मायेला पारखे, उपस्थितांचे पाणावले डोळे
- वाघोली: सायबर गुन्ह्यांच्या फसवणुकीतील रक्कम फिरविण्यासाठी वापर झालेल्या वाघोली व लोणीकंद येथील बँकेच्या संशयित खातेदारांविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलण्याच्या संशयातून संताप; पतीनेच ओशिवऱ्यात केला पत्नीचा काटा काढत आवळला गळा
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- सिक्कीम: बोगद्यात मिथेन गॅसचा भीषण स्फोट, दरड कोसळून ९ कामगारांचा मृत्यू; अनेक जण अडकल्याने खळबळ
- दिल्ली: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत मुलांसह जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी, व्हिडीओ व्हायरल
- उत्तर प्रदेश: युट्यूबवर शोधली हत्येची आयडिया! विवाहित प्रियकराने औषधाच्या नावाखाली नर्स प्रेयसीला दिली विषारी ड्रिप
- दिल्लीत हायअलर्ट! संसदेच्या सुरक्षेसाठी वॉटर गनचे बंब अन् हजारो जवान तैनात; सीजेपीच्या आंदोलनामुळे छावणीचे स्वरूप"
























Subscribe to my channel




