राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांच्यासह आणखीसहा नेते भाजपमध्ये गेल्यानंतर आम आदमी पक्षातनिर्माण झालेली उलथापालथ ही केवळ भ्रष्टाचारविरोधीआंदोलनातून जन्मलेल्या या पक्षाच्या ऱ्हासाची सुरुवातनाही. हा मध्यमवर्गाच्या स्वप्नाचा भंगही आहे. त्यातश्रीमंत, बाहुबलींच्या हातातून सत्ता काढून राजकारणालाकाही लोकांच्या स्वार्थाऐवजी व्यापक सामाजिक हिताचेसाधन बनवण्याची या वर्गाची इच्छा होती. राज्यसभेत राघव चड्ढा ‘आप’चा चमकता चेहरा बनलेहोते. यावरून भारतीय मध्यमवर्गाशी त्यांच्या पूर्वीच्यापक्षाचे किती घट्ट नाते होते, हे दिसून येते. हा वर्ग होतात्या काळातील राजकारणाला कंटाळला होता आणि काहीतरी नवे व अर्थपूर्ण घडवू इच्छित होता. राघव यांनी 13 वर्षे टीका केली, त्याच पक्षात आता त्यांनी प्रवेशकेला आहे. यावरून आजचे राजकारण किती पोकळझाले आहे, हे स्पष्ट होते. येथे आदर्श आणि निष्ठा यांना वैयक्तिक स्वार्थ आणि अति महत्त्वाकांक्षेच्या वेदीवरबळी दिले जाते. मात्र, केवळ राघव यांनाच दोष देणेयोग्य ठरेल का? ते अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षात कालांतराने निर्माण झालेल्या विसंगतींचे प्रतीक आहेत. ‘आप’ने भाजप आणि काँग्रेससारख्या मोठ्यापक्षांना हरवून दिल्लीच्या राजकारणात प्रवेश केला. तेव्हा मध्यमवर्गाच्या अपेक्षा वेगळ्या होत्या. कार्यक्षमता,पारदर्शकता आणि सहभागाची अपेक्षा ठेवणाऱ्यामध्यमवर्गाच्या जोरावर ‘आप’ आणि केजरीवाल सत्तेतआले. त्यांनी लोकांना शासनाच्या केंद्रस्थानी ठेवण्याचेआश्वासन दिले होते. केजरीवाल यांचे आर्थिक मॉडेलपारंपरिक पक्षांसारखे कॉर्पोरेट निधीवर आधारित नव्हते.त्यांनी लाखो समर्थकांच्या छोट्या-छोट्या देणग्यांवरविश्वास ठेवला होता. ते नव्या प्रकारच्या राजकारणाचेस्वप्न पाहत होते. नायब राज्यपालांशी सततच्यासंघर्षामुळे केजरीवाल यांच्यासमोर अडचणी होत्या, हेखरे असले तरी ते स्वतःही सत्तेच्या मोहापासून दूर राहूशकले नाहीत. साधेपणाने सरकारी निवासात राहण्याचेआश्वासन असूनही त्यांनी स्वतःसाठी मोठा बंगलाउभारला. राजधानीत पक्ष मजबूत करण्याआधीच त्यांचीमहत्त्वाकांक्षा दिल्लीच्या बाहेर गेली होती. हरियाणा,पंजाब, गुजरात आणि गोवा अशा राज्यांकडे त्यांनी लक्षवळवले. या वाढत्या महत्त्वाकांक्षेचा दुहेरी परिणामदिसला. त्यांचे जुने आणि विश्वासू सहकारी मध्येचत्यांच्यापासून दूर गेले. योगेंद्र यादव, प्रशांत भूषण,शाजिया इल्मी, अल्का लांबा, कुमार विश्वास आणिकपिल मिश्रा यांसारखी अनेक नावे यामध्ये आहेत.पक्षाचा विस्तार करण्यासाठी अधिक संसाधनांची गरजहोती. देणगीआधारित आर्थिक मॉडेल आणिकार्यकर्त्यांची ताकद दिल्ली जिंकण्यासाठी पुरेशी ठरली,पण मोठ्या राज्यांमध्ये वेगाने विस्तार करण्यासाठी तीअपुरी पडली. यानंतर केजरीवाल आणि त्यांच्यानिकटवर्तीय सल्लागारांविरोधात ईडी आणिसीबीआयच्या चौकशा सुरू झाल्या. 2025 च्या दिल्लीविधानसभा निवडणुकीपूर्वी केजरीवाल यांच्यासहअनेक नेत्यांना तुरुंगात जावे लागले. सीबीआयचेप्रकरण खालच्या न्यायालयाने फेटाळले. मात्र यागोंधळात 2025 मधील निवडणुकीतील पराभव निश्चितझाला होता. दिल्लीत ‘आप’चा आणि स्वतः केजरीवालयांचा त्यांच्या मतदारसंघात झालेला पराभव पाहता,सध्याचे पक्षांतर जवळपास अपेक्षितच होते. केजरीवाल,चड्ढा व ‘आप’ची ही कहाणी आजच्या राजकारणातीलउणिवांची आठवण करून देते. सत्तेला व्यक्तीपूजा,धनबल,बाहुबलाऐवजी सेवा आधारित बनवू इच्छिणाऱ्यामध्यमवर्गीय आदर्शवाद्यांसाठीही हा मोठा इशारा आहे.मानवी विकास व आधुनिक प्रगतीला समान महत्त्वमिळावे, अशी अपेक्षा असणाऱ्यांनी यातून धडा घ्यावा. केजरीवाल आणि ‘आप’चा राजकीय शेवट झाला,असे आत्ताच म्हणणे घाईचे ठरेल. मात्र राज्यसभेतीलपक्षाचा ऱ्हास दिल्लीत अशा प्रक्रियेला सुरुवात करूशकतो. त्याचा परिणाम पंजाबमध्येही दिसू शकतो.पुढील वर्षी पंजाबमध्ये ‘आप’ सरकारसमोर पुढची मोठीनिवडणूक परीक्षा आहे. ‘आप’चा अंतर्गतविस्कळीतपणा हा बदलाची आशा बाळगणाऱ्या छोट्यापक्षांसमोरील आव्हानांनाही अधोरेखित करतो. ( हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) ‘आप’ची ही कहाणी आजच्याराजकारणातील उणिवांची ठळकआठवण करून देते. सत्तेला व्यक्ती पूजा,धनबल व बाहुबलाऐवजी सेवा आधारितबनवू इच्छिणाऱ्या मध्यमवर्गीयआदर्शवाद्यांसाठीही हा मोठा इशारा आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.


























Subscribe to my channel



