टॉड जी. बुशोल्ज यांचा कॉलम:होर्मुझ खाडी सुरू झाली नाही‎ तर पुढची आघाडी तैवान ?

‎‎‎‎‎‎‎‎‎‎होर्मुझ सामुद्रधुनी बंद करून इराणने ट्रम्प प्रशासनासमोर ‎एक प्रकारची सराव परीक्षा ठेवली आहे. ती उत्तीर्ण‎ होण्यासाठी म्हणजेच तैवानवर चीनच्या संभाव्य हल्ला‎किंवा नाकेबंदीविरोधात प्रतिकारशक्ती कायम ‎ठेवण्यासाठी अमेरिकेला ही सामुद्रधुनी निर्णायकपणे‎पुन्हा खुली करावीच लागेल.‎ होर्मुझ आणि तैवान या दोन्ही अरुंद समुद्री मार्गांच्या‎बंदीमुळे अर्थव्यवस्था 20 व्या शतकाच्या मध्यापर्यंत मागे‎जाऊ शकते. गेल्या दीड महिन्यात इराणने हॉर्मुझ‎सामुद्रधुनीला तरंगत्या गोळीबार क्षेत्रात बदलले आहे.‎जहाजांची ये-जा कमी झाली आहे, तेलवाहू जहाजे‎भीतीने मार्गक्रमण करत आहेत आणि इराणी स्पीडबोट्स‎व ड्रोन समुद्री चाच्यांसारखे वागत आहेत. या‎ठप्पपणामुळे जागतिक अर्थव्यवस्था अडचणीत आली‎आहे. कारण जगातील तेल आणि द्रवीकृत नैसर्गिक‎वायूचा मोठा हिस्सा याच मार्गाने जातो. हे फक्त‎मध्यपूर्वेतील संकट नाही तर आशियातील संघर्षाची‎रंगीत तालीम आहे. यातून चीनला तैवानविरोधातील‎रणनीती आखण्याचे संकेत मिळत आहेत. तैवान खाडी ‎‎होर्मुझसारखीच आहे, पण ती सेमीकंडक्टरसाठी‎महत्त्वाची आहे. जगातील सर्वात प्रगत चिप्सपैकी 90 ‎‎टक्क्यांहून अधिक उत्पादन तैवानची टीएसएमसी कंपनी‎करते. ह्याच चिप्स एआय डेटा सेंटर्स, लढाऊ विमाने‎आणि स्मार्टफोनचे ‘मेंदू’ मानल्या जातात. परदेशी‎चिप्सवरील अवलंबित्वामुळे निर्माण होणारे राष्ट्रीय‎सुरक्षेचे धोके लक्षात घेऊन अमेरिकेने 2022 मध्ये‎‘चिप्स अँड सायन्स ॲक्ट’ मंजूर केला होता. जेणेकरून‎उत्पादकांना देशातच कारखाने उभारण्यासाठी प्रोत्साहन‎मिळावे. तरीही टेक्सास, ओहायो आणि न्यूयॉर्कमध्ये‎नव्या फॅब्रिकेशन युनिट्सची योजना असूनही अमेरिका‎अजूनही मोठ्या प्रमाणावर चिप्सच्या आयातीवर‎अवलंबून आहे. अशा स्थितीत चीनने तैवानवर हल्ला‎केला किंवा नाकेबंदी केली, तर 21 व्या शतकाची‎तांत्रिक यंत्रणाच ठप्प होऊ शकते. जागतिक नुकसान‎110 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते. ही केवळ मंदी‎नसेल, तर पुरवठा साखळीचा हृदयविकाराचा झटका‎ठरेल. शी जिनपिंग यांना चीनच्या इतिहासात फक्त‎इलॉन मस्कपेक्षा चांगल्या कार बॅटऱ्या बनवणारा नेता‎म्हणून ओळखले जावे, असे वाटत नाही. त्यांना माओ‎त्से तुंग यांनी दिलेले ‘एक चीन’चे वचन पूर्ण करायचे‎आहे— कोणतीही अट नसलेला आणि कम्युनिस्ट‎नेतृत्वाला आव्हान देणारा कोणताही बंडखोर बेट‎नसलेला चीन. शी यांना असे वाटले की तैवानवरील‎हल्ल्यानंतर अमेरिकेने कारवाईत संकोच केला किंवा‎तडजोड केल्यास अमेरिकेची प्रतिकारशक्ती संपेल.‎जगातील सर्वात शक्तिशाली नौदलही जर एका‎कमकुवत प्रादेशिक शक्तीसमोर तेलवाहू जहाजांना‎सुरक्षितपणे बाहेर काढू शकत नसेल, तर तैवानवरील‎चीनी नाकेबंदी तोडण्यासाठी अमेरिका आपली‎विमानवाहू नौका, पाणबुड्या आणि हजारो सैनिकांचा‎जीव धोक्यात घालेल, यावर शी का विश्वास ठेवतील?‎गेम थिअरीमध्ये याला ‘विश्वसनीय बांधिलकी’ म्हटले‎जाते. म्हणजेच विरोधकाला खात्री असली पाहिजे की‎तुम्ही बोलल्याप्रमाणे कृती कराल. तसे झाले नाही, तर‎संपूर्ण खेळच बिघडतो. विश्वासार्हता एकदा गमावली,‎तर ती परत मिळवणे सोपे नसते.‎ या समस्येचा उपाय कठीण आहे, पण स्पष्ट आहे.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎अमेरिकेने हॉर्मुझ सामुद्रधुनी निर्णायकपणे पुन्हा खुली‎करावी. यासाठी सामुद्रधुनीत एस्कॉर्ट, माइन-स्वीपर्स‎तैनात करणे, हल्ल्याच्या ठिकाणांवर कारवाई करणे‎आणि इराणच्या टोलबूथ बेटांवर नियंत्रण मिळवणे‎आवश्यक ठरेल. 2020 मध्ये ग्रीस, इजिप्त, पॅलेस्टिनी‎नॅशनल अथॉरिटी आणि इस्रायल यांनी इतर देशांसह‎ईस्ट मेडिटेरेनियन गॅस फोरमची स्थापना केली होती,‎जेणेकरून नव्या गॅस साठ्यांचा उपयोग करता येईल.‎दुर्दैवाने, बायडेन प्रशासनाने इस्रायल ते युरोप प्रस्तावित‎पाइपलाइनसाठी अमेरिकेचा पाठिंबा मागे घेतला.‎प्रत्यक्षात हा हॉर्मुझवरील अवलंबित्व कमी करणारा‎महत्त्वाचा प्रकल्प ठरू शकला असता.‎ अमेरिकेसमोर पर्याय स्पष्ट आहे— स्वतःच्या ताकदीने‎होर्मुझ खुला करा. अन्यथा शी तैवानवरील हल्ल्याची‎तयारी करताना पाहा. सकारात्मक बाब म्हणजे‎अमेरिकेकडे सर्वात घातक नौदल आहे आणि अशी‎आर्थिक ताकदही आहे. ती कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला‎मागे टाकू शकते. (@प्रोजेक्ट सिंडिकेट)‎ चीनने तैवानवर हल्ला केला किंवा‎नाकेबंदी केली, तर 21 व्या शतकाची‎तांत्रिक ‘नर्व्हस सिस्टिम’च ठप्प होऊ‎शकते. जागतिक नुकसान 10 ट्रिलियन‎डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते. ही केवळ‎मंदी नसेल, तर पुरवठा साखळीचा‎‘कार्डियाक अरेस्ट’ ठरेल.‎‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

इतर

पुणे : भारतात तोंडाच्या आरोग्याकडे अजूनही अनेकदा दुर्लक्ष केले जाते. अनेक जण दातदुखी किंवा गंभीर त्रास होईपर्यंत उपचार पुढे ढकलतात. मात्र, दंततज्ज्ञांच्या मते ही सवय भविष्यात अधिक महाग ठरू शकते. पुण्यातील दंतचिकित्सक डॉ. प्रेयस गायकवाड यांनी सांगितले की, किडलेले दात, हिरड्यांचे संसर्ग, दातांच्या रचनेतील समस्या अशा अनेक तक्रारी हळूहळू वाढत जातात. योग्य वेळी तपासणी आणि उपचार झाले तर हे प्रश्न सहज, कमी वेळात आणि कमी खर्चात सोडवता येतात. “रुग्ण योग्य वेळी आले तर उपचार सोपे, जलद आणि कमी खर्चिक होतात. उशीर केल्यास समस्या अधिक गुंतागुंतीच्या होतात,” असे डॉ. गायकवाड म्हणाले. आधुनिक दंतसेवांमध्ये आता प्रौढांसह मुलांसाठीही सर्वसमावेशक उपचार उपलब्ध आहेत. यामध्ये नियमित तपासणी, दातांची स्वच्छता, रूट कॅनल, दात सरळ करणे, दात बसवणे तसेच आपत्कालीन उपचारांचा समावेश आहे. तसेच, अनेक क्लिनिकमध्ये आता ईएमआय (EMI) आधारित पेमेंट पर्यायही उपलब्ध होत आहेत. त्यामुळे मोठ्या उपचारांचा आर्थिक भार एकदम न पडता हप्त्यांमध्ये उपचार घेणे शक्य होत आहे. विशेषतः कुटुंबांमध्ये वेगवेगळ्या वयोगटातील सदस्यांच्या दंतउपचारांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरत आहे. तज्ज्ञांच्या मते, तोंडाचे आरोग्य हे केवळ दातांपुरते मर्यादित नसून त्याचा परिणाम आहार, बोलणे आणि शरीराच्या एकूण आरोग्यावरही होतो. त्यामुळे नियमित तपासणी आणि वेळेवर उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे. डॉक्टर सल्ला साठी सम्पर्क - डॉ. गायकवाड डेंटल क्लिनिक, साईधाम सोसायटी, शॉप नं. २, धानोरी पोलीस चौकीच्या शेजारी, धानोरी, पुणे, महाराष्ट्र – ४११०१५ एकंदरीत संदेश स्पष्ट आहे — दंतउपचार पुढे ढकलू नका. वेळेवर घेतलेली काळजी आरोग्य सुरक्षित ठेवतेच, शिवाय भविष्यातील मानसिक आणि आर्थिक ताणही कमी करते.

In India, oral health is still frequently neglected.

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *