पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:अंतर्मनातील डोळ्यांनीच‎ दिशाभ्रम दूर होणे शक्य

डोळ्यांना डोळ्यांनी पाहण्यासाठीही आरशाची गरज लागते. विज्ञान‎डोळ्यांना फक्त दिसणे यांच्याशी जोडते. मात्र अध्यात्मशास्त्र सांगते‎की, दोन डोळे अंतर्मनातही असतात. भगवान शंकरांच्या तिसऱ्या‎डोळ्याची गोष्ट वेगळी. अंतर्मनातील डोळे पाहण्यासाठी डोळे मिटले‎पाहिजेत. मौन धारण करावे. ध्यानाच्या दिशेने चालल्यावर जाणवते की,‎आतही डोळे आहेत. त्यांचा उपयोग काय? तुलसीदासांनी एक प्रसंग‎लिहिला . काकभुशुंडी गरुडाला सांगतात— “जब जेहि दिसि भ्रम होई‎खगेसा, सो कह पच्छिम उयउ दिनेसा।” हे पक्षीराज, दिशाभ्रम झालेला‎व्यक्ती म्हणतो की सूर्य पश्चिमेला उगवला आहे. ही स्थिती पूर्ण गोंधळ,‎दिग्भ्रमाची असते. यात उजवे-डावे, पुढे-मागे, भूत, वर्तमान, भविष्य‎यांचा गोंधळ होतो. विज्ञान याला डिमेन्शिया किंवा अल्झायमर असे नाव‎देते. काकभुशुंडी यांनी याचाच संकेत दिला आहे की, दिशाभ्रम‎भल्याभल्या लोकांनाही होऊ शकतो. यावर उपाय फक्त अंतर्मनातील‎नेत्रद्वारे होऊ शकतो.‎‎

This post was originally published on this site.



इतर

पुणे : भारतात तोंडाच्या आरोग्याकडे अजूनही अनेकदा दुर्लक्ष केले जाते. अनेक जण दातदुखी किंवा गंभीर त्रास होईपर्यंत उपचार पुढे ढकलतात. मात्र, दंततज्ज्ञांच्या मते ही सवय भविष्यात अधिक महाग ठरू शकते. पुण्यातील दंतचिकित्सक डॉ. प्रेयस गायकवाड यांनी सांगितले की, किडलेले दात, हिरड्यांचे संसर्ग, दातांच्या रचनेतील समस्या अशा अनेक तक्रारी हळूहळू वाढत जातात. योग्य वेळी तपासणी आणि उपचार झाले तर हे प्रश्न सहज, कमी वेळात आणि कमी खर्चात सोडवता येतात. “रुग्ण योग्य वेळी आले तर उपचार सोपे, जलद आणि कमी खर्चिक होतात. उशीर केल्यास समस्या अधिक गुंतागुंतीच्या होतात,” असे डॉ. गायकवाड म्हणाले. आधुनिक दंतसेवांमध्ये आता प्रौढांसह मुलांसाठीही सर्वसमावेशक उपचार उपलब्ध आहेत. यामध्ये नियमित तपासणी, दातांची स्वच्छता, रूट कॅनल, दात सरळ करणे, दात बसवणे तसेच आपत्कालीन उपचारांचा समावेश आहे. तसेच, अनेक क्लिनिकमध्ये आता ईएमआय (EMI) आधारित पेमेंट पर्यायही उपलब्ध होत आहेत. त्यामुळे मोठ्या उपचारांचा आर्थिक भार एकदम न पडता हप्त्यांमध्ये उपचार घेणे शक्य होत आहे. विशेषतः कुटुंबांमध्ये वेगवेगळ्या वयोगटातील सदस्यांच्या दंतउपचारांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरत आहे. तज्ज्ञांच्या मते, तोंडाचे आरोग्य हे केवळ दातांपुरते मर्यादित नसून त्याचा परिणाम आहार, बोलणे आणि शरीराच्या एकूण आरोग्यावरही होतो. त्यामुळे नियमित तपासणी आणि वेळेवर उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे. डॉक्टर सल्ला साठी सम्पर्क - डॉ. गायकवाड डेंटल क्लिनिक, साईधाम सोसायटी, शॉप नं. २, धानोरी पोलीस चौकीच्या शेजारी, धानोरी, पुणे, महाराष्ट्र – ४११०१५ एकंदरीत संदेश स्पष्ट आहे — दंतउपचार पुढे ढकलू नका. वेळेवर घेतलेली काळजी आरोग्य सुरक्षित ठेवतेच, शिवाय भविष्यातील मानसिक आणि आर्थिक ताणही कमी करते.

In India, oral health is still frequently neglected.

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *