
Job Offer : परदेशात चांगल्या भविष्याच्या शोधात निघालेल्या एका तरुणाचं स्वप्न फसवणुकीच्या जाळ्यात अडकून उद्धवस्त झाल्याची धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यातून समोर आली आहे. बच्चू मिया चाळ, पालघर येथे राहणारा उमेश किसन धोडी या तरुणाला युरोपमध्ये नोकरीचे आमिष दाखवून अल्बानिया या देशात पाठवण्यात आले. परंतु तेथे पोहोचल्यावर उमेशच्या हातात काहीच उरले नाही. ना ठोस नोकरी, ना सुविधा, ना संरक्षण. सध्या तो तिथे अडचणीत असून त्याने व्हिडीओद्वारे मदतीची विनंती केली आहे.
उमेशने सांगितले की, वडोदरा येथील IOR नावाच्या कंपनीच्या माध्यमातून त्याला अल्बानियातील Amec Solular Group या कंपनीमध्ये नोकरीचे आमिष देण्यात आले. नोकरीसाठी लागणारी कागदपत्रं, प्रवासाची तिकिटं आणि औपचारिक बाबी पूर्ण करून तो युरोपला पोहोचला. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू असल्याचं भासत होतं. पण कंपनीकडून कुठल्याही प्रकारच्या सुविधा न दिल्यामुळे उमेशने विरोध केला. त्याने विरोध केल्याने त्याला मोठा फटका बसला. त्याला कंपनीतून कामावरून काढून टाकण्यात आलं.
उमेश याला परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवणारा एजंट रफिक घाची हा आहे. या एजंटने उमेशकडून आर्थिक व्यवहार करून त्याला "चांगली नोकरी" असल्याचे सांगून पाठवले. प्रत्यक्षात मात्र, उमेशने ज्या गोष्टींची अपेक्षा केली होती, त्यापैकी एकही गोष्ट प्रत्यक्षात आली नाही. सध्या तो अल्बानियामध्ये अन्न, निवारा आणि सुरक्षा यांसारख्या मूलभूत गरजांसाठी संघर्ष करत आहे.
ही घटना केवळ उमेशपुरती मर्यादित नसून, परदेशात नोकरीच्या मोहात अडकणाऱ्या असंख्य तरुणांसाठी इशारा देणारी आहे. एजंटकडून दिल्या जाणाऱ्या माहितीची शहानिशा न करता घेतलेले निर्णय हे अशा फसवणुकीला निमंत्रण देतात. उमेशने मनसेचे कार्यकर्ते तुलसी जोशी यांच्याशी संपर्क साधला असून, त्यांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. उमेशचा व्हिडीओ कॉल सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे, ज्यात त्याने आपली व्यथा मांडून मदतीची करुण याचना केली आहे.
या प्रकरणाची दखल घेऊन केंद्र सरकार, विशेषतः परराष्ट्र मंत्रालयाने त्वरित लक्ष घालावे आणि उमेशला भारतात सुखरूप परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी उमेशच्या कुटुंबीयांसह स्थानिक नागरिक करत आहेत. या प्रकरणामुळे भविष्यातील अशा घटनांना रोखण्यासाठी एजंट कंपन्यांवर देखरेख आणि नियमबद्ध नियंत्रणाची गरज अधोरेखित झाली आहे. दरम्यान, उमेशच्या घरी चिंतेचं वातावरण आहे. घरच्यांनी सरकार आणि सामाजिक संस्थांना मदतीचे आवाहन केलं आहे. या घटनेनंतर, पालघरमधील अनेक तरुण आणि त्यांच्या कुटुंबीयांनीही आपले निर्णय पुन्हा एकदा विचारात घेण्यास सुरुवात केली आहे.
शहर
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पाण्याची तीव्र टंचाई! सर्व धरणसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित; विभागीय आयुक्तांचे वीजपंप जप्त करण्याचे कठोर आदेश
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
महाराष्ट्र
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- नंदुरबार: गावोगावी उभे राहिलेत दोन गट, पक्षात गटबाजीचा आजार..; शिंदेंच्या आमदारानेच उघड केली स्वतःच्या पक्षाची पोलखोल!
गुन्हा
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला


























Subscribe to my channel




