
Manoj Jarange Protest : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे. आज मराठा आरक्षण उपसमितीच्या सदस्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मनोज जरांगेंनी केलेल्या मागण्या मान्य केले असल्याचे सांगितले. जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या काय होत्या आणि सरकारने नेमका काय निर्णय घेतला हे आपण जाणून घेणार आहोत...
१) हैदराबादच्या गॅझेटची तात्काळ अंमलबजावणी करा ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी होती. सरकारने हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी मान्यता दिली. तासभरात जीआर काढण्यात येईल.
२) सातारा संस्थानचे गॅझेटही लागू करावे अशी मनोज जरांगेंची मागणी होती. ही मागणी सरकारने मान्य केली. यासंदर्भातला जीआर महिनाभरात निघणार आहे. राजेंनी याबाबत मनोज जरांगेंना शब्द दिला आहे.
३) मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी मनोज जरांगेंनी केली होती. काही ठिकाणी गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. सप्टेंबर अखेरपर्यंत सर्व गुन्हे मागे घेऊ असे सरकारने सांगितले.
४) मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या वारसांना नोकरी देण्यात यावी अशी मागणी जरांगेंनी केली होती. सरकारने बलिदान देण्यात आलेल्या आंदोलकांच्या कुटुंबियांना आठवडाभरात पैशांची मदत दिली जाईल असे सांगितले. शिवाय कुटुंबातील सदस्याला नोकरीही देण्यात येईल. राज्य परिवहन मंडळात नोकरी देऊ असे सरकारने सांगितले.
५)५८ लाख नोंदीचा रेकॉर्ड ग्राम पंचायतीला लावा म्हणजे लोकं अर्ज करून घेतील आणि प्रमाणपत्र व्हॅलीडीटी आदेश काढा अशी मागणी मनोज जरांगेंनी केली होती. त्यांची ही मागणी मान्य करण्यात आली आहे. विखे पाटील यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्याने प्रत्येक सोमवारी बैठक घेऊन जेवढे दाखले आहेत. तेवढे अर्ज निकाली काढावे.
६) शिंदे समितीला तालुकास्तरावर ऑफिस द्या, वंशावळ समिती तालुका स्तरावर तपासणी करा. मोडी उर्दू लिपी अभ्यासक घ्या, मानधनावर करणार सरकार - मान्य
७) मराठा कुणबी एकच आहे जीआर काढा अशी मागणी मनोज जरांगेंनी केली होती. ही प्रक्रिया किचकट आहे, त्यासाठी वेळ लागेल. महिना नाही तर दोन महिना घ्या पण जीआर काढणार असे सरकारकडून जरांगेंना सांगण्यात आले आहे.
८) सगेसोयरे अध्यादेश निर्णय घ्या अशी मागणी जरांगेंनी केली होती. यावर सरकारकडून सांगण्यात आले. सगे सोयऱ्यांच्या मुद्द्यावर ८ लाख हरकती आहेत. त्याला वेळ लागणार आहे.
९ ) तुमच्या आरटीओने आम्हाला सहा- सहा हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. मराठा आंदोलकांना मुंबईतील रस्ते माहिती नव्हते त्यामुळे चुका झाल्या. सरकारकडून आंदोलकांच्या गाडीवरील सर्व दंड मागे घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. सरकारने ही मागणी मान्य केली.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




