
Mumbai : मराठा आंदोलकांचा आज आंदोलनाचा पाचवा दिवस सुरू आहे. काल कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर आणि आज मुंबई पोलिसांनी बजावलेल्या नोटीशीत आंदोलकांना आझाद मैदान सोडण्यास सांगितले आहे.आज मराठा आंदोलकांविरोधात दाखल केलेल्या याचिकेविरूद्ध मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीदरम्यान, कोर्टानं मराठा आंदोलकांना ३ वाजेपर्यंत वेळ दिला आहे. ३ वाजेपर्यंत मैदान रिकामं करण्याचा आदेश दिला आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान सोडाण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. ' मराठा आंदोलकांना ताबडतोब निघून जावं लागेल. हे बेकायदेशीर आहे. आज दुपारी ३ वाजेनंतर, कुणीही तिथे बसणार नाही' असं कोर्ट म्हणाले.
मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षण आंदोलनावरील सुनावणीदरम्यान, कोर्टानं पुन्हा एकदा आंदोलकांना स्पष्ट इशारा दिला आहे. आझाद मैदान सोडण्यास सांगितले. कोर्टात एसीजे यांनी मराठा आंदोलकांचे वकील माने - शिंदे यांच्यासमोर प्रश्न उपस्थित केला. ' उच्च न्यायालयाला वेढा घालता येणार नाही. तुम्ही प्रथम या न्यायालयाचे अधिकारी आहात. ते (मराठा आंदोलक) तिथून निघून गेले आहेत का?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
एसीजे (न्यायमुर्ती) यांच्या प्रश्नावर माने शिंदे यांनी, 'नाही मिलॉर्ड्स, मनोज जरांगे अजूनही तिथेच आहेत. त्यांनी परवानगी वाढवण्यासाठी अर्ज केला आहे. बाकीचे निघून गेले आहेत', असं त्यांनी उत्तर दिलं.
यावर न्यायमुर्ती म्हणाले, 'हे काय आहे? अर्जावर काही आदेश येईल ही अपेक्षा? तिथे कुणीही बसू शकत नाही. ताबडतोब निघून जावे लागेल. हे बेकायदेशीर आहे. आज दुपारी ३ नंतर, कुणीही तिथे बसणार नाही, याची खात्री करा. गरज पडल्यास, आम्ही एखाद्याला पाठवू किंवा आम्ही स्वतः रस्ते आणि घटनास्थळाला भेट देऊन सर्वजण निघून गेले आहेत का ते तपासू', असं न्यायामुर्ती म्हणाले.
कोर्टानं राज्य सरकारलाही झापलं
कोर्टात न्यायमुर्तींनी राज्य सरकारलाही सुनावलं. न्यायमुर्ती म्हणाले,'आम्ही राज्य सरकारवरही समाधानी नाही. सरकार काय करत होते, याबाबतही आम्हाला जाणून घ्यायचे आहे. तुमचे निदर्शक या न्यायालयाच्या न्यायाधीशांना रस्त्यावरून चालत त्यांच्या न्यायालयात पोहोचण्यासाठी आणि कामकाज चालवण्यास कसे भाग पाडू शकतात? तुमचे निदर्शक रस्त्यावर नाचत होते, म्हणून तुम्ही उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना असे चालण्यास भाग पाडू शकत नाही', असं ते म्हणाले.Mumbai : मराठा आंदोलकांचा आज आंदोलनाचा पाचवा दिवस सुरू आहे. काल कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर आणि आज मुंबई पोलिसांनी बजावलेल्या नोटीशीत आंदोलकांना आझाद मैदान सोडण्यास सांगितले आहे.
आज मराठा आंदोलकांविरोधात दाखल केलेल्या याचिकेविरूद्ध मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीदरम्यान, कोर्टानं मराठा आंदोलकांना ३ वाजेपर्यंत वेळ दिला आहे. ३ वाजेपर्यंत मैदान रिकामं करण्याचा आदेश दिला आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान सोडाण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. ' मराठा आंदोलकांना ताबडतोब निघून जावं लागेल. हे बेकायदेशीर आहे. आज दुपारी ३ वाजेनंतर, कुणीही तिथे बसणार नाही' असं कोर्ट म्हणाले.
मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षण आंदोलनावरील सुनावणीदरम्यान, कोर्टानं पुन्हा एकदा आंदोलकांना स्पष्ट इशारा दिला आहे. आझाद मैदान सोडण्यास सांगितले. कोर्टात एसीजे यांनी मराठा आंदोलकांचे वकील माने - शिंदे यांच्यासमोर प्रश्न उपस्थित केला. ' उच्च न्यायालयाला वेढा घालता येणार नाही. तुम्ही प्रथम या न्यायालयाचे अधिकारी आहात. ते (मराठा आंदोलक) तिथून निघून गेले आहेत का?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
एसीजे (न्यायमुर्ती) यांच्या प्रश्नावर माने शिंदे यांनी, 'नाही मिलॉर्ड्स, मनोज जरांगे अजूनही तिथेच आहेत. त्यांनी परवानगी वाढवण्यासाठी अर्ज केला आहे. बाकीचे निघून गेले आहेत', असं त्यांनी उत्तर दिलं.
यावर न्यायमुर्ती म्हणाले, 'हे काय आहे? अर्जावर काही आदेश येईल ही अपेक्षा? तिथे कुणीही बसू शकत नाही. ताबडतोब निघून जावे लागेल. हे बेकायदेशीर आहे. आज दुपारी ३ नंतर, कुणीही तिथे बसणार नाही, याची खात्री करा. गरज पडल्यास, आम्ही एखाद्याला पाठवू किंवा आम्ही स्वतः रस्ते आणि घटनास्थळाला भेट देऊन सर्वजण निघून गेले आहेत का ते तपासू', असं न्यायामुर्ती म्हणाले.
कोर्टानं राज्य सरकारलाही झापलं
कोर्टात न्यायमुर्तींनी राज्य सरकारलाही सुनावलं. न्यायमुर्ती म्हणाले,'आम्ही राज्य सरकारवरही समाधानी नाही. सरकार काय करत होते, याबाबतही आम्हाला जाणून घ्यायचे आहे. तुमचे निदर्शक या न्यायालयाच्या न्यायाधीशांना रस्त्यावरून चालत त्यांच्या न्यायालयात पोहोचण्यासाठी आणि कामकाज चालवण्यास कसे भाग पाडू शकतात? तुमचे निदर्शक रस्त्यावर नाचत होते, म्हणून तुम्ही उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना असे चालण्यास भाग पाडू शकत नाही', असं ते म्हणाले.
शहर
- मुंबई: रात्री जेवणानंतर शतपावली करताना मंत्री अदिती तटकरे यांचे पीआरओ आशिष मेटे यांचे आकस्मिक निधन
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
महाराष्ट्र
- मुंबई: रात्री जेवणानंतर शतपावली करताना मंत्री अदिती तटकरे यांचे पीआरओ आशिष मेटे यांचे आकस्मिक निधन
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
- मुंबई: एक देश, एक निवडणूक'मुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि विकासकामांना वेग मिळेल; नेत्यांचे स्पष्ट प्रतिपादन
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तर प्रदेश: कौशांबीत पटाखा कारखान्यात भीषण स्फोट; महिला व बालकांसह ७ ते ८ जणांचा मृत्यू, परिसर हादरला
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल


























Subscribe to my channel



