नवी दिल्ली: देशातील परीक्षांमधील गैरप्रकार, पेपरफुटी आणि इतर प्रमुख शैक्षणिक प्रश्नांवरून आक्रमक पवित्रा घेतलेल्या अभिजीत दिपके यांच्या 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) या संघटनेने आगामी ५ सप्टेंबर रोजी दिल्लीत काढण्याचे ठरवलेल्या बहुचर्चित निषेध मोर्चाला आणि रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनाचा मार्ग मोकळा झाला असून, या प्रकरणी सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी अत्यंत महत्त्वाची टिप्पणी केली आहे.
काय आहे प्रकरण आणि याचिका?
अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली 'कॉकरोच जनता पार्टी'ने देशातील परीक्षांमधील कथित अनियमितता, रखडलेले निकाल आणि अश्वासनपूर्तीविरोधात ५ सप्टेंबर रोजी दिल्लीत एका भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. हा मोर्चा इंडिया गेटपासून सुरू होऊन थेट दिल्ली पोलीस मुख्यालय (Delhi Police Headquarters) आणि संबंधित उच्चाधिकार क्षेत्रापर्यंत नेण्याचे नियोजनCJP कडून करण्यात आले आहे. दरम्यान, या नियोजित रॅलीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि वाहतूक विस्कळीत होऊ शकते, असा युक्तिवाद करत या रॅलीला किंवा आंदोलनाला प्रतिबंध करावा, अशी मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेत न्यायालयाने कोणतीही स्थगिती देण्यास नकार दिला.
सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण:
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी स्पष्ट केले की, कोणतीही ठोस किंवा भक्कम कारण नसताना केवळ पूर्वग्रहातून किंवा अंदाज बांधून आधीच अप्रिय घटना घडतील असे गृहीत धरता येणार नाही. लोकशाही देशात नागरिकांना शांततापूर्ण मार्गाने आपले प्रश्न मांडण्याचा आणि निषेध व्यक्त करण्याचा अधिकार आहे. प्रशासकीय यंत्रणा आणि संबंधित प्राधिकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्था राखणे ही त्यांची जबाबदारी आहे आणि ते योग्य ती काळजी घेतील, अशी अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली. तसेच, कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्याचे काम पोलीस आणि प्रशासनाचे असून, त्याआधीच आंदोलनावर सरसकट बंदी घालता येणार नाही, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.
आंदोलनाची रूपरेषा व CJP ची भूमिका:
'कॉकरोच जनता पार्टी'ने जाहीर केल्यानुसार, या आगामी मोर्चाचे नेतृत्व अशा विद्यार्थ्यांचे कुटुंबीय करणार आहेत, ज्यांनी नीट (NEET) किंवा इतर महत्त्वाच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर तसेच फेरपरीक्षा व निकालातील तणावामुळे आपले प्राण गमावले होते. याशिवाय, जुलै महिन्यातील मागील आंदोलनादरम्यान ज्या विद्यार्थ्यांना कथितरित्या पोलीस कारवाई व अत्याचारांना सामोरे जावे लागले होते, त्यांच्या कुटुंबातील सदस्यही या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. CJP च्या कार्यसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, "आमच्या शांततेला किंवा सद्भावनेला कुणीही कमजोरी समजण्याची चूक करू नये, तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्या सरकारविरोधातील हा लढा अधिक तीव्र केला जाईल," असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
शहर
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
- मुंबई: एक देश, एक निवडणूक'मुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि विकासकामांना वेग मिळेल; नेत्यांचे स्पष्ट प्रतिपादन
- बीड: लेकींच्या शिक्षणासाठी आईचा अनवाणी एल्गार; साडी नेसून धावली अन् अंबाजोगाईत जिंकली मॅरेथॉन!
महाराष्ट्र
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
- मुंबई: एक देश, एक निवडणूक'मुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि विकासकामांना वेग मिळेल; नेत्यांचे स्पष्ट प्रतिपादन
- बीड: लेकींच्या शिक्षणासाठी आईचा अनवाणी एल्गार; साडी नेसून धावली अन् अंबाजोगाईत जिंकली मॅरेथॉन!
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!

























Subscribe to my channel



