
Jalgaon : महापालिकेच्या व्यापारी संकुलाच्या भाडे निश्चिती बाबत सरकार आणि महापालिका प्रशासन यांच्याकडून चालढकल करण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे.
त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न शहरवासीय उपस्थित करत आहेत. सर्व गाळेधारकांकडे रेडीरेकनरच्या आठ टक्के म्हणजे, १२९ कोटी रुपये थकीत असल्याची माहिती महापालिकेच्या किरकोळ वसुली विभागातर्फे देण्यात आली.
|
|
त्यातील रेडीरेकनरच्या आठ टक्के दरानुसार फुले मार्केटमधील २९० गाळेधारकांनी पूर्ण भरलेली रक्कम त्यातून वजा करण्यात आली आहे.
जळगाव महापालिकेचे २५ व्यापारी संकुल आहेत. त्यात एकूण २ हजार ७०० गाळे आहेत. त्यातील तीन व्यापारी संकुल वगळल्यास इतर सर्व व्यापारी संकुलातील गाळेधारकांची गाळेकराराची मुदत २०१२ ला संपली आहे. मात्र या गाळेधारकांची अद्याप भाडे निश्चिती न झाल्याने महापालिकेचे आर्थिक उत्पन्न ठप्प झाले आहे.
भाडे निश्चितीचा जटिल तिढा
महापालिकेच्या संकुलाच्या भाडे निश्चितीचा प्रश्न गंभीर झाला आहे. महापालिकेने रेडीरेक्नर दराच्या आठ टक्केप्रमाणे भाडे आकारणी केली होती. त्याला विरोध करण्यात आला. त्याबाबत मंत्रालयात दावा दाखल करण्यात आला. त्यावर निकाल लागल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र प्रत्यक्षात महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे महापालिकेकडे आज शहराच्या विकासासाठी निधी नसल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारकडून येणाऱ्या निधीवर रस्ते व गटार आणि इतर कामे होत आहे. परंतु महापालिकेचे हक्काचे उत्पन्न मात्र मिळत नाही.
मंत्रालयातून दिरंगाई
महापालिकेच्या व्यापारी संकुलाचे भाडे ठरविण्याच्या दराच्या निश्चितीबाबत मंत्रालयातून दिरंगाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. रेडीरेक्नर आठ टक्के दर आकारून भाडे निश्चिती करण्याबाबत महापालिकेचा प्रस्ताव आहे. व्यापाऱ्यांनी रेडीरेक्नर दोन टक्के दराने आकारणी करण्याची मागणी केली आहे.
त्यामुळे हा वाद मंत्रालयात असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे मंत्रालयात त्याबाबत निकाल देण्यात आला आहे. परंतु अद्याप त्याबाबतचा अध्यादेश महापालिकेत आला नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे याबाबत नक्की काय आहे? याचा शहरवासीयांमध्ये संभ्रम आहे.
प्रशासकडून अपेक्षा
महापालिकेत आता प्रशासकीय राज आहे. प्रशासक तथा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी महापालिकेच्या या शाश्वत उत्पन्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे, त्यांनी सरकारला पत्र पाठवून याबाबत तातडीने निर्णय देण्याची विनंती करण्याची गरज आहे, अशी शहरवासीयांची अपेक्षा आहे. गेल्या दहा वर्षापासून संकुलाचे गाळे भाडे निश्चितीकरणाचा तिढा कधी सुटणार हा प्रश्नच आहे.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!




























Subscribe to my channel




