
Jalgaon : राज्यात पाणी टंचाईची समस्या अधिक गडद होत चालली आहे. एप्रिल महिण्याच्या तुलनेत आता अधिक पाणी टंचाई जाणविण्यास सुरवात झाली आहे. यामुळे प्रशासनाकडून देखील उपाययोजना वाढविण्यात येत आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील ३७ गावांना पाणीटंचाईची समस्या अधिक गडद होत चालली असून याठिकाणी ट्रॅकर तसेच विहिरींचे अधिग्रहण करून गावांची तहान भागविली जात आहे.
उन्हाची तीव्रता जशी वाढत आहे. तशीच पाणीटंचाईची समस्या देखील गडद होत चालली आहे. यामुळे महिला, नागरिकांना पाणी आणण्यासाठी दूरवर पायपीट करत जावे लागत आहे. राज्याच्या अनेक भागात हि टंचाई वाढत असून जळगांव जिल्ह्यात देखील पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. जिल्ह्यात चार तालुक्यात मिळून ३७ गावांमध्ये पाणी संकट निर्माण झाले आहे.
|
Washim : लिंबू म्हणून दिलेली रोपं ईडलिंबूची; समितीच्या अहवालतून स्पष्ट, कृषी केंद्राकडून फसवणूक |
भूजल पातळीत झपाट्याने घट
जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंशावर कायम असल्याने प्रकल्पासह भूजल पातळीत झपाट्याने घट होत आहे. यामुळे पाणीटंचाई जाणवत असून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेकडून उपाययोजनांना सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी नियोजन केले गेले आहे. टंचाईच्या तीव्रतेचा विचार करून उपाययोजना म्हणून या गावांसाठी टँकर, कूपनलिका, विंधन विहिरी अधिग्रहण करण्यावर भर दिला जात आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
सात गावांसाठी ८ ट्रॅकर सुरु
जिल्ह्यातील ३७ गावांमध्ये पाणी समस्या निर्माण झाली असून यातील ७ गावांना ८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तर ३१ गावात विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये चाळीसगाव तालुक्यात ३, अमळनेर तालुक्यात २ जामनेर, भडगाव तालुक्यात प्रत्येकी १ गावासाठी १ टँकर अशा सात गावांसाठी ८ टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर जामनेर तालुक्यात ६, एरंडोल १, मुक्ताईनगर, चाळीसगाव व पाचोऱ्यासाठी प्रत्येकी चार, अमळनेर ८, पारोळा ४ अशा ३१ गावांसाठी ३१ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.
शहर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
- पुणे: साडेसात सकाळी मॉर्निंग वॉल्कसाठी गेलेली ७३ वर्षीय महिला नदीपात्रात मृदअवस्थेत आढळली; काही तासांतच मृतदेहाची पटली ओळख
- शेतकऱ्याचा ३७ वर्षांचा लढा यशस्वी! बेकायदेशीर भूसंपादन उच्च न्यायालयाने ठरवले रद्द, नुकसानभरपाई व ताब्याविना जमीन वाटप बेकायदेशीर
- पुणे: पिंपरीतील कुटुंब मृत्यू प्रकरण, घरातून ऑनलाईन मागवलेले 'सोडियम नायट्रेट' आणि सुसाईड नोट हस्तगत!
महाराष्ट्र
- ठाणे: भिवंडीत इमारत दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू, तर डोंबिवलीतील गुन्हेगारी आणि नवी मुंबईतील ड्रग्स कारवाईमुळे खळबळ
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
- पुणे: साडेसात सकाळी मॉर्निंग वॉल्कसाठी गेलेली ७३ वर्षीय महिला नदीपात्रात मृदअवस्थेत आढळली; काही तासांतच मृतदेहाची पटली ओळख
- शेतकऱ्याचा ३७ वर्षांचा लढा यशस्वी! बेकायदेशीर भूसंपादन उच्च न्यायालयाने ठरवले रद्द, नुकसानभरपाई व ताब्याविना जमीन वाटप बेकायदेशीर
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली



























Subscribe to my channel




