ओपनर इशान किशन याने केलेल्या तोडफोड खेळीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 27 व्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानसमोर 176 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 175 धावा केल्या. टीम इंडियासाठी एकूण 5 फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. तर 2 प्रमुख फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. तर पाकिस्तानच्या फिरकीपटूंनी चिवट बॉलिंग करत भारताला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं. मात्र तरीही टीम इंडियाने इतिहास घडवला.टीम इंडियाची टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील 175 ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. टीम इंडियाने यासह स्वत:चाच रेकॉर्ड ब्रेक केला. टीम इंडियाने याआधी 2022 साली पाकिस्तान विरुद्ध 6 विकेट्स गमावून 160 धावा केल्या होत्या. अशात आता टीम इंडिया 175 धावांचा यशस्वी बचाव करुन सलग तिसरा विजय मिळवणार की पाकिस्तान विजयासह सुपर 8 मध्ये पोहचणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पाकिस्तानने भारताला पहिल्याच ओव्हरमध्ये झटका दिला. अभिषेक शर्मा पुन्हा झिरोवर आऊट झाला. अभिषेकची या स्पर्धेत झिरोवर आऊट होण्याची ही सलग दुसरी वेळ ठरली.
इशानचा तडाखा
अवघ्या 1 धावेवर विकेट गमावल्यानंतर इशान किशन याने तिलक वर्मासोबत दुसऱ्या विकेटसाठी धमाका केला. इशानने चौफेर फटकेबाजी करत पाकिस्तानच्या गोलंदाजीची हवा काढली. इशानने पाहता पाहता अर्धशतक झळकावलं. इशानने अर्धशतकानंतर फटकेबाजी करत धावांचा वेग कायम ठेवला. मात्र सॅम अय्युब याने इशानला आऊट केलं. इशानने सर्वाधिक 77 धावा केल्या.
त्यानंतर तिलक वर्मा, कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे या तिघांनी किल्ला लढवला. या तिघांनी झुंज दिली. मात्र या तिघांपैकी एकालाही फटकेबाजी करुन पाकिस्तानच्या गोलंदाजांवर कुरघोडी करता आली नाही. हार्दिक पंड्या याला भोपळाही फोडता आला नाही. तिलकने 25 आणि शिवमने 27 धावा केल्या. तर कॅप्टन सूर्यकुमार यादव याने 32 धावांचं योगदान दिलं. तर अखेरच्या क्षणी रिंकु सिंह याने 4 बॉलमध्ये 1 फोर आणि 1 सिक्ससह निर्णायक आणि नाबाद 11 धावा जोडल्या. रिंकूने केलेल्या या निर्णायक खेळीमुळे भारताला पाकिस्तानन विरुद्ध टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत मोठी धावसंख्या उभारता आली.
टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाक यांच्यातील सर्वोच्च धावसंख्या
टीम इंडिया, 175 धावा, 2026
टीम इंडिया, 160 धावा, 2022
पाकिस्तान, 159 धावा, 2022
टीम इंडिया, 157 धावा, 2007
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.























Subscribe to my channel




