Pakistan BLA Clash : पाकिस्तानात नेमहीच काहीतरी घडत असतं. या देशात कधी बॉम्बस्फोट होतो. तर कधी अजब फतवा निघतो. गेल्या काही दिवसांपासून तिथे पाकिस्तानी लष्कर आणि बलुच लिबरेशन आर्मी अर्थात बीएलए यांच्यात मोठा संघर्ष सुरू आहे. बीएलएने पाकिस्तानात काही ठिकाणांवर हल्ले केल्यानंतर पाकिस्तानी लष्करानेही बीएलएच्या तळांना लक्ष्य केले. दरम्यान, आता याच संघर्षाबाबत मोठी आणि हादरवणारी माहिती समोर येत आहे. येथे बीएलएने आम्ही एकूण 17 पाकिस्तानी सैनिकांनी ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. बीएलएच्या या कारवाईमुळे पाकिस्तानी लष्कराची झोप उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार बीएलएने एकूण 17 पाकिस्तानी सैनिकांना ताब्यात घेतलं आहे. त्यांना बंदी बनवलं आहे. तसा दवाच बीएलएने केले आहे. यापैकी एकूण 10 सैनिकांना बीएलने सोडले असून अजूनही सात सैनिक त्यांच्याच ताब्यात आहेत. सोबतच या बंदी बनवलेल्या सैनिकांची सुटका हवी असेल तर पाकिस्तानी सरकारकडे बीएलएने मोठी मागणी केली आहे. बलुच भागातील बंदी केलेल्या लोकांची जोपर्यंत पाकिस्तानी सरकार, लष्कर जोपर्यंत सुटका करत नाही तोपर्यंत आम्हीदेखील 17 पाकिस्तानी सैनिकांची सुटका करणार नाही, अशी भूमिका बीएलएने घेतली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानात सध्या तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
बीएलएच्या मीडिया विभागाचे प्रवक्ते जीयंड बलोच यांनी याबाबत बीएलएची भूमिका स्पष्ट केली आहे. बीएलएची ही कृती ऑपरेशन हिरोफचा दुसरा भाग आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.
उरलेल्या 7 सैनिकांवर नेमके आरोप काय?
जीयंड बलोच यांनी सांगितल्यानुसार 17 पैकी 10 पाकिस्तांनी सैनिकांना सोडून देण्यात आलं आहे. सोडून दिलेले 10 सैनिक हे बलुच प्रांतातील स्थानिक पोलीस संघटनांशी संबंधित होते. उर्वरीत 7 सैनिक हे पाकिस्तानी लष्कराशी संबंधित आहेत. बंदी म्हणून ठेवण्यात आलेल्या या सात सैनिकांविषयी बलुच नॅशनल कोर्टात सुनावणी झाली आहे. बीएलएच्या ताब्यात असलेल्या सैनिकांकडून बलुच येथील लोकांना त्रास दिला जातो, असा आरोप करण्यात आला आहे. एवढंच नाही तर बंदी बनवलेल्या सैनिकांवर नरसंहाराचाही आरोप आहे.
पाकिस्तान नेमकी काय भूमिका घेणार?
दरम्यान, आता बीएलएने पाकिस्तानी लष्करातील सैनिकांनाच बंदी बनवल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानी सरकार किंवा पाकिस्तानी लष्कराने यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे भविष्यात काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.























Subscribe to my channel




