टीम इंडियाचं वाढलं टेन्शनImage Credit source: PTI
IND vs PAK, T20 World Cup 2026 : टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये येत्या रविवारी म्हणजेच 15 फेब्रुवारीला भारत-पाकिस्तान हा हाय-व्होल्टेज सामना रंगणा आहे. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियम वर दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळतील. राजकीय वाद आणि बॉयकॉ करण्याची धमकी यामुळे ही मॅच पहिल्यापासूनच चर्चेत आहे. मात्र अखेर 15 तारखेला हा सामना खेळवला जाणार आहे. असं असलं तरीही या हाय-व्होल्टेज सामन्यात टीम इंडियासमोर काही आव्हाने आहेत. नामिबियाविरुद्ध अलिकडेच मिळालेल्या विजयानंतरही, टीम इंडिया अडचणीत सापडू शकते, त्याची 4 प्रमुख कारणं आहेत.
अभिषेक शर्माच्या फिटनेसबद्दल अनिश्चिती
भारतीय संघातील स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा पोटाच्या संसर्गाशी झुंजत आहे. पहिल्या सामन्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, ज्यामुळे त्याला नामिबियाविरुद्धच्या सामन्याला मुकावे लागले. मात्र, त्याला आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे आणि टीम मॅनेजमेंट सतर्क आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवने असेही संकेत दिले की शर्माला परतण्यासाठी आणखी एक किंवा दोन सामने लागू शकतात. अशा परिस्थितीत, जर अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्ध खेळला नाही तर संघाचा ताण वाढू शकतो.
रिंकू सिंगचा खराब फॉर्म
मधल्या फळीत फिनिशरची भूमिका बजावणाऱ्या रिंकू सिंगने या स्पर्धेत आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली नाही. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात त्याने 14 चेंडूत फक्त 6 धावा काढल्या. या काळात त्याने एकही फोर किंवा सिक्सर मारली नाही. तर दुसऱ्या सामन्यात, तो 6 चेंडूत फक्त 1 धाव काढू शकला, ही टीम इंडियासाठी मोठी चिंतेची बाब आहे. रिंकू सहसा त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखली जातो, परंतु सध्या त्याची बॅट शांत असल्याचे दिसते.
स्पिनर्ससमोर फलंदाज अडचणीत
नामिबियाविरुद्धच्या सामन्यात भारताने 209 धावा केल्या, पण मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाजांसमोर ते फसले. नामिबियाचा फिरकीपटू बर्नार्ड स्कोल्झ आणि गेरहार्ड इरास्मस यांनी विकेट घेतल्या आणि मधल्या षटकांमध्ये भारताची घोडदौड रोखली. याचा अर्थ असा की स्पिनर्ससमोर भारतीय फलंदाजांचा कमकुवतपणा पुन्हा एकदा उघड झाला. पाकिस्तानकडे मजबूत स्पिन अटॅक आहे आणि कोलंबोची खेळपट्टी फिरकीला अनुकूल असू शकते, ही बाब टीम इंडियासाठी एक मोठा धोका ठरू शकते.
पॉवरप्लेमध्ये गोलंदाजीची कमजोरी
पॉवरप्लेमध्ये नामिबियाने जलद सुरुवात केली आणि भारताचे गोलंदाज सुरुवातीलाच खूप महागडे ठरले. पॉवरप्लेमध्ये धावा दिल्याने संघाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. नामिबियाने पहिल्या सहा षटकांत 1 गडी गमावून 57 धावा केल्या. पाकिस्तानविरुद्ध पॉवरप्ले महत्त्वाचा ठरू शकतो, तिथे त्यांचे सलामीवीर आक्रमक खेळ करू शकतात. भारतीय गोलंदाजांना त्यांच्यावर चांगलं नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे, अन्यथा पाकिस्तानी संघ मोठी धावसंख्या उभारू शकतो.
शहर
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पाण्याची तीव्र टंचाई! सर्व धरणसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित; विभागीय आयुक्तांचे वीजपंप जप्त करण्याचे कठोर आदेश
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
महाराष्ट्र
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- नंदुरबार: गावोगावी उभे राहिलेत दोन गट, पक्षात गटबाजीचा आजार..; शिंदेंच्या आमदारानेच उघड केली स्वतःच्या पक्षाची पोलखोल!
गुन्हा
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला


























Subscribe to my channel




