IND vs PAK : खेळायचं आहे तर खेळा नाही, तर...! आयसीसीने पाकिस्तानच्या 3 अटी फेटाळून लावल्याImage Credit source: PTI
IND vs PAK Match, T20 World Cup 2026: टी20 वर्ल्डकप स्पर्धेपासून सुरू असलेला ड्रामा अजूनही संपण्याचं नाव घेत नाही. बांगलादेशने भारतात खेळण्यास नकार दिल्यापासून जे काही सुरू झाले आहे, ते 15 फेब्रुवारीपर्यंत चालणार यात काही शंका नाही. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असल्याने साखळी फेरीत आमनेसामने येणार हे निश्चित होतं. 15 फेब्रुवारी हा सामना नियोजित आहे. पण या सामन्यापूर्वीच बरंच काही घडलं. बांगलादेशने भारतात खेळण्यास, तर आयसीसीने वेळापत्रक बदलण्यास नकार दिला. त्यानंतर बांगलादेशची जागा स्कॉटलँडने घेतली. बांगलादेशला वगळल्याने पाकिस्तानने आक्रमक पवित्रा घेतला. खरं तर राजकीय पोळी शेकण्यासाठी भारताविरूद्धचा सामना खेळणार नसल्याचं जाहीर केलं. आयसीसीकडून पाकिस्तानला हा सामना खेळण्यासाठी वारंवार विनवणी केली जात आहे. पीसीबी अध्यक्ष मोहसिन नकवी पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भेट घेणार आहेत. असं असताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हा सामना खेळण्यासाठी तीन अटी ठेवल्या आहेत.
आयसीसीने मेंबर पार्टिसिपेशन करारानुसार आणि डिसेंबरब 2024 मध्ये झालेल्या हायब्रिड होस्टिंग मॉडेलच्या दाखला देत पाकिस्तानला सामना खेळण्यास सांगितलं आहे. पण पीसीबीने या दरम्यान आयसीसीवर दबाव टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. रिपोर्टनुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळण्याची मागणी ठेवली आहे. इतकंच काय तर या तीन देशात ट्राय सिरीजचा प्रस्ताव ठेवला आहे. भारतीय खेळाडूंनी सामन्यापूर्वी हँडशेक करावं. तसेच आयसीसीकडून पाकिस्तानला जास्त मानधन मिळावं अशा मागण्या ठेवल्या आहेत.
पाकिस्तान आणि बांगलादेशच्या किती मागण्या आयसीसीने मान्य केल्या हे स्पष्ट नाही. पण आयसीसी भारतविरुद्ध द्विपक्षीय मालिका, ट्राय सिरीजची हमी घेऊ शकत नाही. कारण याबाबतचा पूर्ण अधिकार बीसीसीआयकडे आहे आणि बीसीसीआय भारत सरकारच्या अधिपत्याखाली आहे. दुसरीकडे, भारताचा नियोजित बांग्लादेश दौराही होणं कठीण दिसत आहे. अशा स्थितीत पाकिस्तानच्या मागण्यांना आयसीसी भीक घालेल असं वाटत नाही. त्यामुळे पाकिस्तानला थोडी लाज असेल तर खेळणार नाही. पण भीकेला लागलेल्या पाकिस्तानला आर्थिक फटका बसू नये असं वाटत असेल तर खेळेल. आता त्या दिवशी पाकिस्तान काय निर्णय घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दुसरीकडे, बीसीसीआय या प्रकरणावर मौन बाळगून आहे. भारत मल्टिनॅशनल स्पर्धेत तटस्थ ठिकाणी खेळण्यास तयार आहे. मौन बाळगून बीसीसीआयने पाकिस्तानची नाचक्की केली आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



