
Mumbai/Pune : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आज, मंगळवारी १० फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या परीक्षेला १० हजार ६६४ शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील १५ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी बसणार आहेत. यंदा परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत २७ हजारांनी वाढ झाली आहे.
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये आठ लाख २० हजार २२९ मुले, सात लाख १२ हजार २४० मुली, तर १८ तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
माहिती तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान या विषयांची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. माहिती तंत्रज्ञान विषयासाठी दोन लाख ३६ हजार ३२०, तर सामान्य ज्ञान विषयासाठी एक हजार ७०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी परीक्षेसाठी एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.विद्यार्थ्यांनी केवळ राज्य मंडळाने प्रसिद्ध केलेले आणि छापील वेळापत्रकच ग्राह्य धरावे. यंदाही परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटांची अतिरिक्त वेळ देण्यात येणार आहे. शिक्षण विभागाच्या ९ जानेवारीच्या सरकारी निर्णयानुसार परीक्षा केंद्रापासून ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स केंद्रे बंद ठेवणे, तसेच परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. कोणत्याही केंद्रावर गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी जिल्हा दक्षता समितीवर राहणार आहे, अशी माहिती डॉ. बेडसे यांनी दिली.
कर्मचाऱ्यांची अदलाबदल
राज्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही व्यवस्था अनिवार्य आहे. मात्र, १७२ परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही नसल्याने त्या केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्यात आली आहे. सीसीटीव्ही नसलेली सर्वाधिक, ५५ केंद्र अमरावती मंडळात आहेत. तर २४८ परीक्षा केंद्रे संवेदनशील आहेत.
गैरप्रकार रोखण्यासाठी गुगल मीट, झूमचा वापर
दहावी व बारावीच्या परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पडाव्यात, यासाठी जिल्हा दक्षता समितीच्या अध्यक्षांना आवश्यक नियोजन करण्याची मुभा देण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात सीसीटीव्ही नसलेल्या काही केंद्रांवर गुगल मीट आणि झूम प्रणालीचा वापर केला जाणार आहे. भरारी पथकांना आकस्मिक भेटी देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, विभागीय मंडळांतर्गत विशेष व बैठी पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत. बैठे पथक असतानाही, उपद्रव झाल्यास संबंधित केंद्रावरील, तसेच पथकातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे डॉ. बेडसे यांनी स्पष्ट केले.
विभागीय मंडळनिहाय विद्यार्थी संख्या
पुणे : २,६०,०१४
नागपूर : १,६०,५३०
छत्रपती संभाजीनगर : १,९१,४९३
मुंबई : ३,५२,७१८
कोल्हापूर : १,१६,६११
अमरावती : १,५६,९१५
नाशिक : १,७३,६५१
लातूर : ९६,५४२
कोकण : २४,०१३
शाखानिहाय विद्यार्थीसंख्या
कला ३,८०,६९२
वाणिज्य : ३,२०,१५२
विज्ञान : ७,९९,७७३
व्यावसायिक अभ्यासक्रम : २७,३७८
आयटीआय ४,४९२
परीक्षा पारदर्शक व गैरप्रकारमुक्त व्हावी, यासाठी राज्यभरात २७१ भरारी पथकांसह कॉपीमुक्त अभियानांतर्गत विविध उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. - नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, राज्य मंडळ
शहर
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
महाराष्ट्र
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! अघोरी पूजा आणि मृत्यूची भीती दाखवून 'भोंदू कमलेश'ने राज्यभरातील भाविकांना लुटले; पोलिसांची दोन पथके रवाना!
गुन्हा
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
- रायगड: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेचा जीव घेतला! अलिबागमध्ये ८५ वर्षीय महिलेची हत्या; मृतदेह आंबेनळी घाटात फेकला
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
- अन्न व औषध प्रशासनाचा बीडमध्ये धडाका: तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार भेसळयुक्त पदार्थ आणि गुटखा जप्त
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा

























Subscribe to my channel


