रत्नागिरी: ऐतिहासिक गोवा किल्ल्याला पुन्हा तडा! मुसळधार पावसाने तटबंदी कोसळली

रत्नागिरी: दापोली तालुक्यातील हर्णे येथील ऐतिहासिक गोवा किल्ल्याच्या तटबंदीचा आणखी एक भाग कोसळल्याची घटना समोर आली आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे तटबंदीला पुन्हा तडे जाऊन ती कोसळल्याने इतिहासप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे किल्ल्याच्या तटबंदीवर मोठा ताण निर्माण झाला होता. अखेर तटबंदीचा काही भाग कोसळल्याने किल्ल्याच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. यापूर्वीही या किल्ल्याच्या काही भागांचे नुकसान झाले होते.

स्थानिक नागरिकांनी आणि इतिहास अभ्यासकांनी वारंवार संवर्धनाची मागणी करूनही पुरेशी दुरुस्ती न झाल्याने ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप केला आहे. या घटनेनंतर संबंधित प्रशासन आणि पुरातत्त्व विभागाकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात येणार असून, पुढील उपाययोजनांबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

दरम्यान, किल्ल्याच्या परिसरात पर्यटकांनी आणि नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. वारसास्थळांचे संरक्षण आणि तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेण्याची मागणीही स्थानिकांकडून जोर धरत आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *