
Sanjay Raut On Dadaji Bhuse : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी आज (२९ ऑक्टोबर) शेवटचा दिवस बाकी असल्यामुळे अनेकांची धावपळ सुरु आहे. तर काही नेत्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. असं असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे यांच्यावर काही संशयितांनी हल्ला आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून अद्वय हिरे हे निवडणूक लढवत आहेत, तर त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाकडून दादा भुसे आहेत.
सध्या मालेगावमध्ये (Malegaon Assembly Constituency Elections 2024) राजकारण तापलं असून अद्वय हिरे यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. यासंदर्भात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटासर दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “आमचे उमेदवार अद्वय हिरे यांच्यावर दादा भुसेंच्या गुंडांनी हल्ला केला असून ते प्रचाराच्या फेरीत असताना वाहनांवर हल्ला केला”, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
|
|
संजय राऊत काय म्हणाले?
“शिवसेना शिंदे गटाचे लोक पराभवाच्या भितीने आमच्या लोकांना धमक्या देत आहेत. आमच्या लोकांवर दबाव आणणं आणि आमच्या पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार सुरु आहेत. काल संध्याकाळी मालेगाव बाह्यचे आमचे उमेदवार अद्वय हिरे यांच्यावर दादा भुसे यांच्या गुंडांनी हल्ला केला. अद्वय हिरे हे प्रचाराच्या फेरीत असताना दादा भुसेंच्या लोकांनी अद्वय हिरेंच्या वाहनांवर हल्ला केला. यावेळी हल्लोखोरांकडे लोखंडी गच, तलवारी, गावठी पिस्तुलं होती. अद्वय हिरेंना ठार मारण्याच्या उद्देशाने हा हल्ला झाला. आमचे पाच शिवसैनिक यामध्ये जखमी झाले. पोलिसांनी यासंदर्भात अद्यापही ठोस कारवाई केली नाही. हे प्रकरण फक्त मालेगावबाबत मर्यादीत नाही. या महाराष्ट्रामध्ये निवडणुका त्यांना शांततेत करायच्या नाहीत, असा याचा अर्थ होत आहे. सध्या पोलीस यंत्रणा राजकीय कामाला जुंपलेली आहे. काल अद्वय हिरे हे सुदैवाने बचावले आहेत”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
‘रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा’
“अशा प्रकारे या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आहे. मग अशा पद्धतींना निवडणुका होणार आहेत का? मी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना आवाहन करतो की, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना तातडीने पदावरून हटवा आणि या गुंडशाही झुंडशाहीच्याबाबत कठोर कारवाईचे आदेश द्या. काही दिवसांपूर्वी अद्वय हिरे तुरुंगात असतानाही त्यांच्यावर दबाव आणला जात होता. आमच्या अनेक पदाधिकाऱ्यांना धमक्या दिल्या जात आहेत. मात्र, आम्ही अशा कोणत्याही धमक्यांना घाबरत नाहीत”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
‘दक्षिण सोलापूरचा विषय संपला’
“आमची आताच काँग्रेसच्या नेत्यांनाचर्चा झाली. दक्षिण सोलापूरचा विषय संपलेला आहे. दक्षिण सोलापूर मतदारसंघात आमचे अधिकृत उमेदवार अमर पाटील हेच असतील. काँग्रेसच्या उमेदवारांना कोणताही एबी फॉर्म दिला जाणार नाही. इतर ठिकाणी काही लोकांनी अर्ज नक्कीच भरले आहेत. मात्र, त्या त्या पक्षाची त्यांना मान्यता नाही. तसेच भूम परांडा या बाबत आमच्यात चर्चा झाली होती. तरीही दोन उमेदवारांनी अर्ज भरले. मात्र, आम्ही त्यामध्ये मार्ग काढू”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
शहर
- कोल्हापुरात संतापजनक प्रकार! लॉजवर बोलावून सुरू होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान; पोलिसांचा छापा पडताच तोतया डॉक्टर मशीन घेऊन पसार, महिला व एजंट ताब्यात"
- राष्टकुल खेळ २०२६: महाराष्ट्राच्या तेजस शिर्सेची ऐतिहासिक कामगिरी; पुरुष 110 मीटर हर्डल्सच्या अंतिम फेरीत धडक, भारताला पदकाची मोठी आशा"
- हुडकेश्वर पोलिस ठाण्यातून कुख्यात चोर फरार; शौचालयाच्या बहाण्याने पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून आरोपी पसार, खात्यात एकच खळबळ"
- महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य! महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात राबवणार १० कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; राष्ट्रीय महिला आयोगाची मोठी घोषणा"
महाराष्ट्र
- नांदेड शहरात तासभर कोसळला मुसळधार पाऊस; मराठवाड्यातील इतर भागांत हलक्या सरी आणि रिमझिम"
- लातूर: स्मार्ट मीटर काढा आणि जुने मीटर पूर्ववत बसवा; महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात आणि स्मार्ट वीज मीटरच्या सक्तीविरुद्ध नागरिकांचा संताप व तीव्र आंदोलन
- कोल्हापुरात संतापजनक प्रकार! लॉजवर बोलावून सुरू होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान; पोलिसांचा छापा पडताच तोतया डॉक्टर मशीन घेऊन पसार, महिला व एजंट ताब्यात"
- कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचा अजब कारभार; विद्यार्थ्यांच्या कष्टाच्या पैशातून भरला कर्मचाऱ्यांचा आयकर दंड, शैक्षणिक वर्तुळात तीव्र संताप
गुन्हा
- बीड: आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथे १९ वर्षीय युवकाने संपवले जीवन, सकाळी गायरानात आढळला मृतदेह
- बंगळुरू: पतीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून बाळंतीणीने संपवले जीवन, मृतदेहाशेजारीच शांत झोपलेला होता ७ महिन्यांचा चिमुकला
- मुंबईत सायबर गुन्हेगारीचा मोठा धक्का! दिल्ली पोलिसांच्या नावे आभासी अटकेत ठेवून वृद्ध व्यावसायिकाची तब्बल आठ कोटी रुपयांची फसवणूक"
- चंद्रपुर: हॉटेलमध्ये घुसून एमआयएमच्या एकमेव नगरसेवकावर १५ ते १६ जणांकडून प्राणघातक हल्ला, राजकीय वर्तुळात चिंता
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- चंदीगड: ट्यूशन घेणाऱ्या पत्नीचे २० वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अफेअर, पतीने रंगेहाथ पकडल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल
- नवी दिल्ली: झारखंड हायकोर्टाचा मोठा निर्णय: रात्री २ वाजता बायकोने काजळ-लिपस्टिक लावले म्हणजे ती मानसिक रोगी ठरत नाही
- नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- 'हा लोकशाहीचा विजय'
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य




























Subscribe to my channel



