गडचिरोलीः आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे! १५ दिवसांत तीन माता आणि अर्भकांच्या मृत्यूने खळबळ, शासकीय रुग्णालयांच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

गडचिरोलीः जिल्ह्यात माता बाल मृत्यूचे सत्र काही थांबायला तयार नाही. चामोर्शी तालुक्यासह चंद्रपूर येथील माता व बाळाचा मृत्यू झाल्याच्या घटना ताज्या असताना ८ सप्टेंबर रोजी महिला व बाल रुग्णालयात आणखी एका माता बालकाला प्राण गमवावे लागले. १५ दिवसांत तीन माता बाल मृत्यूच्या दुर्दैवी घटनेने आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले आहेत.

दिव्या रामसिंग उसेंडी (वय ३१, रा. मुरुमगाव ता. धानोरा) असे मृत महिलेचे नाव आहे. मृत महिला रोजगारासाठी तामिळनाडू येथे गेली होती. प्रसूतीची तारीख जवळ आल्याने ती काही दिवसांपूर्वी मुरूमगाव येथे गावी आली होती. दरम्यान, ८ सप्टेंबर रोजी प्रसव वेदना जाणवू लागल्यामुळे कुटुंबीयांनी तिला मुरूमगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र तिची प्रकृती गंभीर झाली त्यामुळे तिला तातडीने महिला व बाल रुग्णालयात हलविले. प्रसूतीदरम्यान बाळासह तिचाही मृत्यू झाला. १५ दिवसांत सलग तीन घटना घडल्याने आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जिल्हा शल्य चिकित्सकांची भेट
या घटनेनंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी तातडीने महिला व बाल रुग्णालयात भेट दिली. घटनेची सविस्तर माहिती घेतली. यासंदर्भात अद्याप प्रशासनाकडून कुठलेही स्पष्टीकरण आलेले नाही.


यापूर्वी दोन माता-बाल मृत्यू
२३ ऑगस्टः जिजा हंसराज सातर (वय २३, रा. जामगिरी ता. चामोर्शी) या महिलेचा व तिच्या बाळाला वेळेवर उपचार न मिळाल्याने प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणात कारवाई प्रलंबित आहे.

२९ ऑगस्टः चंद्रपूरच्या नागभिड तालुक्यातील कोजबी येथील नाजुका दिवाकर राऊत (वय २८) या महिलेचा गडचिरोलीच्या महिला व बाल रुग्णालयात प्रसूती दरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणाचीही चौकशी सुरू आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *