पुणे: पिंपरी-चिंचवड शहरातील झपाट्याने विकसित होणाऱ्या वाकड परिसरात स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. चौधरी पार्क तसेच यमुनानगर रोड परिसरातील काही नागरिक, रस्त्यावरील फेरीवाले आणि दुकानदारांकडून रस्त्याच्या कडेला तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जात असल्याने परिसराला अक्षरशः कचऱ्याचे हब स्वरूप प्राप्त होत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे.
रस्त्यावर टाकण्यात आलेल्या कचऱ्यावर भटक्या कुत्र्यांकडून ताव मारला जात असल्याने कचरा रस्त्यावर सर्वत्र पसरतो. यामुळे परिसरात अस्वच्छतेबरोबरच दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. विशेषतः सकाळच्या वेळी आणि पावसाळ्यात या समस्येची तीव्रता अधिक जाणवत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
कचरा टाकण्याची समस्या केवळ नागरिकांपुरती मर्यादित नसून काही फेरीवाले आणि दुकानदारांकडूनही व्यवसायानंतर निर्माण होणारा कचरा रस्त्याच्या कडेला टाकला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे महापालिकेने केवळ कचरा उचलण्यावर भर न देता कचरा कुणाकडून आणि कुठे टाकला जात आहे, यावरही लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
महापालिका कर्मचारी उपलब्ध नसल्याची नागरिकांची तक्रार
परिसरात कचरा साचूनही अनेक वेळा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी वेळेवर उपलब्ध होत नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. परिणामी, कचरा काही काळ तसाच पडून राहतो आणि भटकी कुत्री तसेच इतर प्राणी तो परिसरभर पसरवतात.
नागरिकांच्या मते, नियमित कचरा संकलनाबरोबरच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई झाली तरच या समस्येला आळा बसू शकतो. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने चौधरी पार्क आणि यमुनानगर रोड परिसरात विशेष पाहणी करून रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिक, फेरीवाले आणि दुकानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
‘नो पार्किंग’चे बोर्डच गायब; वाहतूक व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह
दरम्यान, यमुनानगर रोड परिसरात स्वच्छतेसोबतच पार्किंगचा प्रश्नही गंभीर बनला आहे. या रस्त्यावर महापालिका अथवा संबंधित प्रशासनाने लावलेले अनेक ‘नो पार्किंग’चे फलक आजूबाजूला राहणाऱ्या काही नागरिकांनी काढून टाकल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.
स्वतःच्या वाहनांना रस्त्यावर पार्किंग करता यावे, यासाठी नो पार्किंगचे फलक हटविले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. फलकच नसल्यामुळे रस्त्यावर बेकायदा पार्किंग होत असले तरी त्याविरोधात तक्रार करताना नागरिकांना अडचणी येत आहेत.
विशेष म्हणजे, नो पार्किंगचा अधिकृत फलक नसल्यामुळे PTP App वरही अशा पार्किंगविरोधात तक्रार नोंदविण्यात अडथळा येत असल्याचे नागरिक सांगत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने गायब झालेले किंवा काढून टाकलेले नो पार्किंग फलक तातडीने पुन्हा बसवावेत, तसेच ते जाणीवपूर्वक हटविणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
एकीकडे कचरा, दुसरीकडे बेकायदा पार्किंग
चौधरी पार्क आणि यमुनानगर रोड परिसरातील नागरिकांना एकाच वेळी स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थेच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्याच्या कडेला पडलेला कचरा, त्यावर फिरणारी भटकी कुत्री, निर्माण होणारी दुर्गंधी आणि त्याच परिसरात होणारी अनधिकृत पार्किंग यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे.
महापालिकेने या परिसराकडे केवळ तक्रार आल्यानंतर स्वच्छता करण्याच्या दृष्टिकोनातून न पाहता नियमित निरीक्षण, कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, वेळेवर कचरा संकलन आणि सार्वजनिक ठिकाणी जनजागृती या सर्व उपाययोजना एकत्रितपणे राबविण्याची गरज आहे.
तसेच यमुनानगर रोडवरील नो पार्किंग व्यवस्था पुन्हा प्रभावी करण्यासाठी हटविलेले फलक तातडीने बसविणे, बेकायदा पार्किंगवर कारवाई करणे आणि PTP App वर तक्रार नोंदविण्यासाठी आवश्यक असलेली अधिकृत व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
वाकडसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या परिसराची ओळख केवळ मोठ्या इमारती आणि वाढत्या लोकसंख्येमुळे नव्हे, तर स्वच्छ आणि शिस्तबद्ध परिसर म्हणूनही व्हावी, यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




