मुंबई: सध्याच्या काळात राज्यातील बळीराजासमोर आर्थिक अडचणी आणि शासकीय निकषांचे मोठे संकट उभे ठाकले आहे. पिक कर्जाव्यतिरिक्त शासनाच्या शेतीपूरक व इतर विविध विकास योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांसमोर अटींचा डोंगर उभा राहिला आहे. पाईपलाईन, कुक्कुटपालन, शेळीपालन, डेअरी, दुग्धव्यवसाय, ट्रॅक्टर खरेदी, दूध वाहतूक करण्यासाठी टेम्पो किंवा इतर शेतीपूरक व्यवसायांसाठी बँकांकडून कर्ज प्रकरणे करताना 'अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजना' असो किंवा इतर कोणत्याही शासकीय योजना असोत, बँका आता कडक निकष लावत आहेत. बँक कोणताही विचार न करता केवळ एकच अट प्रामुख्याने पुढे करते, ती म्हणजे संबंधित शेतकऱ्याकडे मागील ३ ते ४ वर्षांचे 'इन्कम टॅक्स रिटर्न' (ITR) असणे बंधनकारक आहे.
सध्याच्या परिस्थितीनुसार, जर शेतकऱ्याचा सिबिल (CIBIL) स्कोर खराब असेल किंवा मागील काही वर्षांमधील बॅलन्स शीट (Balance Sheet) उत्तम नसेल, तर बँका पिक कर्ज किंवा व्यवसाय कर्ज देण्यास स्पष्ट नकार देतात. जेमतेम ३ ते ४ वर्षांची उत्तम आर्थिक बाजू आणि ITR दाखवणाऱ्या मोजक्याच शेतकऱ्यांना कुठे तरी थोडेफार कर्ज मंजूर होते. मात्र, यामध्ये सर्वात मोठा विरोधाभास आणि पेच असा निर्माण झाला आहे की, जर शेतकऱ्यांनी शासनाच्या अटी पूर्ण करण्यासाठी आणि कर्ज मिळवण्यासाठी ITR भरायला सुरुवात केली, तर शासन भविष्यात घोषित होणाऱ्या 'कर्जमाफी'च्या लाभापासून या शेतकऱ्यांना वंचित ठेवेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
शासन स्तरावरून वेळोवेळी अशा प्रकारच्या चर्चा समोर येतात की, जे शेतकरी किंवा नागरिक आयटीआर (ITR) भरतात, ते करदाते असल्यामुळे त्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार नाही. जर खरोखरच ही भूमिका कायम राहिली, तर शेतकरी एका मोठ्या दुष्टचक्रात अडकणार आहेत. एका बाजूला जोडधंदा व शेती व्यवसायाच्या विकासासाठी योजनांचे कर्ज हवे असल्यास ITR आवश्यक आहे, आणि दुसरीकडे ITR भरल्यास भविष्यातील कर्जमाफी मिळणार नाही, अशी दुहेरी भूमिका शेतकऱ्यांसाठी विघातक ठरू शकते.
या संपूर्ण परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त करत शेतकरी वर्गातून असा सवाल केला जात आहे की, जर भविष्यात प्रत्येक शेतीपूरक व्यवसायासाठी ITR सक्तीचा केला गेला आणि ITR भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले गेले, तर हा प्रकार म्हणजे हुकूमशाहीच म्हणावा लागेल. या भीतीपोटी भविष्यात कोणताही शेतकरी कर्जमाफीच्या अपेक्षेने ITR भरणार नाही आणि जर ITR भरला नाही, तर बँका वरील सर्व शेतीपूरक व्यवसायांसाठी कर्ज देणार नाहीत. परिणामी, भांडवल आणि कर्जाच्या अभावी ग्रामीण भागातील शेतकरी अधिक आर्थिक अडचणीत सापडतील, ज्यामुळे शेतकरी आत्महत्यांच्या संख्येत पुन्हा वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शासनाने या अटींचा पुनर्विचार करून शेतकऱ्यांना सुलभ व विनाअट आर्थिक साहाय्य उपलब्ध करून द्यावे, अशी तीव्र मागणी जोर धरत आहे.
शहर
- नागपूर: २३७ वर्षांची परंपरा कायम! लाकडी नंदींच्या बाजारात मोठी उलाढाल, महाकाय नंदीबैलांचे दर थेट लाखांच्या घरात
- नागपूर: राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या; आमदार रोहित पवारांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
- मुंबई: वित्त खाते परत मिळवण्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक; सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ लवकरच अमित शहांची भेट घेणार!
- मुंबई: शिंदेसेनेला ठाण्यात मोठा धक्का! बनावट आदिवासी प्रमाणपत्राप्रकरणी नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द
महाराष्ट्र
- मुंबई: ठाणे जिल्ह्यातही सार्वजनिक उत्सवांमध्ये डॉल्बी आणि लेझर लाईट्सवर पूर्ण बंदी घाला; अंधश्रद्धा निर्मूलन समितीची आक्रमक मागणी
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागात कथित भ्रष्टाचार; सभापतींच्या राजीनाम्याची जोरदार मागणी
- बीड: शासनाने १२ मागण्या मान्य केल्यावरही मुंबई मोर्चाचा अट्टहास का? ज्योती मेटे यांचे मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर गंभीर सवाल
- कोल्हापूर: गुंतवणुकीच्या परताव्याचे आमिष दाखवून अडीच कोटींची फसवणूक; कोकणातील कसाल-गिम्वी येथून तीन जणांना बेड्या
गुन्हा
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा





























Subscribe to my channel



