मुंबई: सध्याच्या काळात राज्यातील बळीराजासमोर आर्थिक अडचणी आणि शासकीय निकषांचे मोठे संकट उभे ठाकले आहे. पिक कर्जाव्यतिरिक्त शासनाच्या शेतीपूरक व इतर विविध विकास योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांसमोर अटींचा डोंगर उभा राहिला आहे. पाईपलाईन, कुक्कुटपालन, शेळीपालन, डेअरी, दुग्धव्यवसाय, ट्रॅक्टर खरेदी, दूध वाहतूक करण्यासाठी टेम्पो किंवा इतर शेतीपूरक व्यवसायांसाठी बँकांकडून कर्ज प्रकरणे करताना 'अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजना' असो किंवा इतर कोणत्याही शासकीय योजना असोत, बँका आता कडक निकष लावत आहेत. बँक कोणताही विचार न करता केवळ एकच अट प्रामुख्याने पुढे करते, ती म्हणजे संबंधित शेतकऱ्याकडे मागील ३ ते ४ वर्षांचे 'इन्कम टॅक्स रिटर्न' (ITR) असणे बंधनकारक आहे.
सध्याच्या परिस्थितीनुसार, जर शेतकऱ्याचा सिबिल (CIBIL) स्कोर खराब असेल किंवा मागील काही वर्षांमधील बॅलन्स शीट (Balance Sheet) उत्तम नसेल, तर बँका पिक कर्ज किंवा व्यवसाय कर्ज देण्यास स्पष्ट नकार देतात. जेमतेम ३ ते ४ वर्षांची उत्तम आर्थिक बाजू आणि ITR दाखवणाऱ्या मोजक्याच शेतकऱ्यांना कुठे तरी थोडेफार कर्ज मंजूर होते. मात्र, यामध्ये सर्वात मोठा विरोधाभास आणि पेच असा निर्माण झाला आहे की, जर शेतकऱ्यांनी शासनाच्या अटी पूर्ण करण्यासाठी आणि कर्ज मिळवण्यासाठी ITR भरायला सुरुवात केली, तर शासन भविष्यात घोषित होणाऱ्या 'कर्जमाफी'च्या लाभापासून या शेतकऱ्यांना वंचित ठेवेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
शासन स्तरावरून वेळोवेळी अशा प्रकारच्या चर्चा समोर येतात की, जे शेतकरी किंवा नागरिक आयटीआर (ITR) भरतात, ते करदाते असल्यामुळे त्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार नाही. जर खरोखरच ही भूमिका कायम राहिली, तर शेतकरी एका मोठ्या दुष्टचक्रात अडकणार आहेत. एका बाजूला जोडधंदा व शेती व्यवसायाच्या विकासासाठी योजनांचे कर्ज हवे असल्यास ITR आवश्यक आहे, आणि दुसरीकडे ITR भरल्यास भविष्यातील कर्जमाफी मिळणार नाही, अशी दुहेरी भूमिका शेतकऱ्यांसाठी विघातक ठरू शकते.
या संपूर्ण परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त करत शेतकरी वर्गातून असा सवाल केला जात आहे की, जर भविष्यात प्रत्येक शेतीपूरक व्यवसायासाठी ITR सक्तीचा केला गेला आणि ITR भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले गेले, तर हा प्रकार म्हणजे हुकूमशाहीच म्हणावा लागेल. या भीतीपोटी भविष्यात कोणताही शेतकरी कर्जमाफीच्या अपेक्षेने ITR भरणार नाही आणि जर ITR भरला नाही, तर बँका वरील सर्व शेतीपूरक व्यवसायांसाठी कर्ज देणार नाहीत. परिणामी, भांडवल आणि कर्जाच्या अभावी ग्रामीण भागातील शेतकरी अधिक आर्थिक अडचणीत सापडतील, ज्यामुळे शेतकरी आत्महत्यांच्या संख्येत पुन्हा वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शासनाने या अटींचा पुनर्विचार करून शेतकऱ्यांना सुलभ व विनाअट आर्थिक साहाय्य उपलब्ध करून द्यावे, अशी तीव्र मागणी जोर धरत आहे.
शहर
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
- महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठा उलटफेर! पुढील चार आठवडे पावसाचं असमान वितरण आणि तूट राहण्याचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता वाढली!
- आजचे राशिभविष्य २१ ऑगस्ट २०२६: शुक्र देणार पैसा, लक्झरी आणि सुख-समृद्धी; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!
- पुणे: भावाला वाचवताना दोघांचा करुण अंत, पुण्याच्या दौंडमध्ये विजेचा शॉक लागून दोन चुलत भावांचा मृत्यू आई थोडक्यात बचावली!
महाराष्ट्र
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
- नक्कीच पुढच्या जन्मी डॉक्टर बनेल... वैद्यकीय परीक्षेच्या तणावातून १९ वर्षीय सूरजचे टोकाचे पाऊल!
गुन्हा
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!




























Subscribe to my channel



