सध्या देशभरात चर्चा आहे ती अयोध्येतील श्रीराममंदिराची आणि मंदिराच्या दानपेटीतील कथित चोरीची.काही जण म्हणतात, मोठ्या लोकांना वाचवले जातआहे व लहान कर्मचाऱ्यांवर कारवाई होत आहे. तरसरकारचे म्हणणे आहे की, दोषी कुणीही असो, त्यालाशिक्षा टाळता येणार नाही. रामधनाची चोरी केव्हापासून सुरू होती व किती रक्कमलंपास झाली, हे अद्याप स्पष्ट नाही. तपासादरम्यानकाहींच्या घरातून सोने-चांदी जप्त झाल्याचे सांगितलेजाते. काहींकडून मंदिराच्या दानपेट्याच जप्त केल्याचे समोर आले आहे. या तपासातून अखेर काय निष्पन्नहोईल, हे अद्याप सांगता येत नाही. या प्रकरणात कोण कुणाला वाचवत आहे किंवा कुणाला गोवण्याचा प्रयत्नहोत आहे, याचा अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. मात्र तपास करणाऱ्या विशेष तपास पथकावर (एसआयटी) कोणत्याही प्रकारचा राजकीय किंवा प्रशासकीय दबाव येऊ नये, ही राज्य सरकारचीजबाबदारी आहे. शक्य असल्यास न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास व्हावा. तसेच मंदिरातील देणगीचेनिष्पक्ष व स्वतंत्र ऑडिट झाल्याशिवाय चोरीची खरीरक्कम समोर येणे कठीण आहे. या घटनेमुळेअयोध्येच्या आध्यात्मिक व सांस्कृतिक महत्त्वालाहीधक्का बसला आहे. अयोध्येचा पहिला उल्लेखअथर्ववेदात आढळतो. त्यामध्ये अयोध्येचे वर्णनदेवतांची नगरी म्हणून केले गेले – "अष्टचक्रा नवद्वारादेवानां पुरयोध्या." ब्रह्मदेवाचे मानसपुत्र मनू यांनी भगवानविष्णूंच्या सल्ल्याने व विश्वकर्म्यांच्या देखरेखीखाली यानगरीची स्थापना केली होती. स्कंदपुराणानुसार अयोध्याभगवान विष्णूंच्या सुदर्शन चक्रावर वसलेली आहे.त्याशिवाय वैवस्वत मनू यांनी ही नगरी प्रथमवसवल्याचेही मानले जाते. अयोध्येसाठी अशा घटनानवीन नाहीत. या देवनगरीने वैभव, पराक्रम आणि त्यागपाहिला. डोंगराएवढी दुःखेही अनुभवली. ऋषितुल्यराजा मांधाता यांचे साम्राज्य पाहिले, तर सत्यासाठीसर्वस्वाचा त्याग करणाऱ्या राजा हरिश्चंद्रांचे जीवनहीअनुभवले. कैकेयीने युद्धात तुटलेल्या रथाच्या चाकातस्वतःचे बोट अडकवून केलेला त्याग पाहिला तर त्याचकैकेयीच्या हट्टामुळे प्रभू श्रीरामांना वनवासालाजातानाही पाहिले. अयोध्येची तुलना स्वर्गाशी केलीगेली, पण तिच्या वेदनांनाही अंत नव्हता. पुत्रवियोगानेराजा दशरथांनी प्राणत्याग केला. भरताने सिंहासननाकारून श्रीरामांच्या पादुकांची पूजा केली. लक्ष्मणानेचौदा वर्षे अखंड सेवा केली, तर ऊर्मिलेने विरह सहनकेला. त्रेतायुगापासून कलियुगापर्यंतच्या असंख्य कथाया नगरीच्या इतिहासात कोरल्या गेल्या. आज श्रीराम मंदिरात भाविकांना रामलल्लाचे दर्शन घेतायेते. त्या जन्मभूमीसाठी साडेचारशे वर्षांहून अधिककाळ संघर्ष झाला. कधी संत, धर्मगुरूंनी याआंदोलनाचे नेतृत्व केले. कधी राजकीय पक्ष त्यातसहभागी झाले. आंदोलनामुळे अनेक सरकारेकोसळली.काही सत्तेत आली. या आंदोलनाला मोठीगती मिळाली ती बाबरी मशिदीचे कुलूप उघडल्यानंतर.शाहबानो प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निर्णय केंद्रानेमुस्लिम समाजाच्या दबावाखाली बदलल्यानंतर हिंदूसमाजात नाराजी निर्माण झाली. त्यानंतर 1 फेब्रुवारी1986 रोजी बाबरीचे कुलूप उघडले. त्या बंददरवाजांमागे संघर्ष दडलेला आहे, याची कुणालाहीकल्पना नव्हती. अशोक सिंघल यांच्या शिलापूजनामुळेहे आंदोलन घरोघर पोहोचले. आज अशोक सिंघलहयात असते, तर त्यांना काय वाटले असते? त्यांनीआयुष्य मंदिरासाठी संघर्षात घालवले आणि अखेर "श्रीराम मंदिर उभे राहताना पाहणे हीच अखेरची इच्छाआहे," असे म्हणत या जगाचा निरोप घेतला. अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी शेकडोनव्हे, तर हजारो लोकांनी अनेक वर्षे संघर्षकेला. अनेकांनी प्राणांचीही आहुती दिली.अशा मंदिरात देणगीच्या रकमेतील कथितचोरीच्या घटनांमुळे त्यांच्या आत्म्यालाकिती वेदना झाल्या असतील, याचीकल्पनाही करणे कठीण आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
- नागपूर: "इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली काळ; १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अमानवीय अत्याचार; नराधम अटकेत."
- चंद्रपूर: "पप्पा, मला का मारताय?" बापाच्या हल्ल्यातून १२ वर्षांच्या मुलाने स्वतःचा जीव वाचवला;
- पुणे: १० वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम झुंबर खोमणे याला जेजुरी पोलिसांकडून बेड्या
महाराष्ट्र
- "देवानं माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती... मनोज जरांगेंना दोन कोटींची डिफेंडर देणारे मालक सुभाष भोसले स्पष्टच बोलले."
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "ओव्हरटेकच्या नादात वेगाने आलेल्या टेम्पोने उडवले; शिक्रापूरमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या कामगाराचा जागीच मृत्यू."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
गुन्हा
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
- नागपूर: "इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली काळ; १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अमानवीय अत्याचार; नराधम अटकेत."
- पुणे: १० वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम झुंबर खोमणे याला जेजुरी पोलिसांकडून बेड्या
- कोल्हापूर: सरनोबतवाडीत खळबळ अनैतिक संबंधांच्या वादातून दिरा कडून वहिनीची हत्या, आरोपी जेरबंद
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पेट्रोल भरलं अन् पैसे न देता कारसह पसार? तरुणीचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
रस्ता बंद झाला तर निरीक्षकांनीच उचलली कुऱ्हाड! उत्तराखंड पोलिसांचा व्हिडिओ चर्चेत
पुण्यातील लोणीकंद पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप
देश विदेश
- कर्नाटक: "आरोग्यासाठी मोठा निर्णय! गुटखा, पान मसाल्यावर १ वर्षाची पूर्ण बंदी; उत्पादन अन् साठवणुकीवरही निर्बंध."
- उत्तर प्रदेश: रसमलाईचा वाद अंगलट! धाकट्या भावाकडून दादा-वहिनीवर कात्रीने जीवघेणा हल्ला
- गोवा: डेंग्यूचा हाहाकार अवघ्या १० दिवसांत ७१ रुग्ण, आरोग्य यंत्रणेत खळबळ
- राजस्थान: बायकोपासून पैसे लपवण्यासाठी शेतकऱ्याने शेतात पुरले ५ लाख रुपये; वर्षभरानंतर नोटा वाळवीने खाल्ल्याचे पाहून बसला धक्का!
























Subscribe to my channel




