
Baramati : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण तसेच बदलापूरसह इतर ठिकाणच्या शाळकरी मुलींवरील अत्याचार प्रकरणासंदर्भात राज्य शासनाचा निषेध करण्यासाठी आज बारामतीत महाविकास आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
पुढे बोलताना सुळे म्हणाल्या की, देवेंद्र फडणीस यांच्याकडून खूप अपेक्षा होती. मात्र या सरकारमधील गृहखाते राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले असून, देवेंद्र फडणवीसांनी आता राजीनामा द्यावा. गृहमंत्री असताना आर आर पाटील यांच्या काळात महिलांची छेडछाड झाली नाही. परंतु आता मात्र महिला अत्याचाराच्या घटनांनी कहर केला आहे. राज्यातील परिस्थिती अत्यंत संवेदनशील व गंभीर असताना यांचे मात्र दिल्ली दौरे चाललेले असतात. त्यांना गृह खाते सांभाळायला वेळ नाही. त्यांना फक्त पक्ष फोडाफोडी, घरे फोडाफोडी आणि इतर गोष्टीत जास्त स्वारस्य आहे.
|
Pune News : दहीहंडी उत्सवात लेझर बीमचा अट्टाहास महागात; पुण्यात चार संयोजकांवर गुन्हा |
खरे प्रेम हे खुर्ची, सत्ता आणि ठेकेदारांवरच
पंधराशे रुपयात बहीण भावाचे नाते विकणारे हे सरकार आहे. लोकसभेच्या वेळी सारे ठीक चालले होते. पण लोकसभेच्या निवडणुकीनंतर यांना बहीण आठवली. खरे तर यांना तोपर्यंत बहिणीचे प्रेम कळलेच नव्हते. कारण लोकसभेमध्ये यांना जनतेने त्यांची जागा दाखवली. मात्र यांचे खरे प्रेम हे खुर्ची, सत्ता आणि ठेकेदारांवरच आहे, असेही सुळे यावेळी म्हणाल्या.
नौदलाच्या बदनामीची मोहीम तुम्ही राबवता?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात ज्यांनी ज्यांनी निविदा प्रक्रियेमध्ये भाग घेतला या सर्वांची चौकशी व्हायला हवी. देवेंद्र फडणवीस हे तर नौदलावर जबाबदारी सोडून मोकळे झाले. जे नौदल आपल्या सर्वांची सुरक्षा करते त्याच्या बदनामीची मोहीम तुम्ही राबवता..? दुसरे दीपक केसरकर हे मंत्री तर अपघात झाला ते बरे झाले असे म्हणतात, कितपत योग्य आहे? असेही सुळे म्हणाल्या.
अन्यथा राज्यातील मंत्र्यांना आम्ही फिरू देणार नाही
बदलापूर प्रकरणामध्ये राज्य सरकारकडे खरोखरच संवेदनशीलता असेल तर तातडीने फास्टट्रॅकमध्ये हा खटला चालवून दोन महिन्याच्या आत आरोपींना फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे. वास्तविक पाहता या राज्य सरकारमध्ये जे मंत्री आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते आहेत. ते वाचाळवीर आहेत. या वाचाळवीरांना आता राज्य सरकारने आवरावे. अन्यथा राज्यातील मंत्र्यांना आम्ही फिरू देणार नाही, असे सुळे यावेळी म्हणाल्या..
शहर
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
- नाशिक: महागाईचं विघ्न! आंतरराष्ट्रीय युद्ध अन् एफडीएच्या कारवाईमुळे गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ
- पुणे: मी केवळ एक आमदार, सरकारचा भाग नाही मराठा आरक्षण आणि संवादावर सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्टीकरण
महाराष्ट्र
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
- नाशिक: महागाईचं विघ्न! आंतरराष्ट्रीय युद्ध अन् एफडीएच्या कारवाईमुळे गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ
- पुणे: मी केवळ एक आमदार, सरकारचा भाग नाही मराठा आरक्षण आणि संवादावर सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्टीकरण
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: कौशांबीत पटाखा कारखान्यात भीषण स्फोट; महिला व बालकांसह ७ ते ८ जणांचा मृत्यू, परिसर हादरला
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल


























Subscribe to my channel




