
Mumbai : मुंबईतल्या वांद्रे-वर्सोवा सी लिंकबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. वांद्रे-वर्सोवा सी लिंकचे नाव बदलण्यात आले आहे. वांद्रे-वर्सोवा सी लिंक आता 'स्वातंत्रवीर सावरकर सागरी सेतू' म्हणून ओळखला जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून वांद्रे-वर्सोवा सी लिंकचे नाव बदलले जाणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु होत्या. अखेर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 140 व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी याबाबतची घोषणा केली. या सी लिंकला 'स्वातंत्रवीर सावरकर सागरी सेतू' असे नाव देण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'सावरकर जयंतीनिमित्त आम्ही राज्यभर गौरव दिन साजरा केला. त्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सावरकर आणि सागर यांचे एक वेगळे नातं आहे. त्यामुळे आम्ही वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूला 'स्वातंत्रवीर सावरकर सागरी सेतू' हे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत वांद्रे-वर्सोवा सी लिंकला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली होती.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत सांगितले की, 'स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून, मुंबईतील वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू’ असे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केल्याबद्दल मी त्यांचा नितांत आभारी आहे. 16 मार्च 2023 रोजी यासंदर्भातील मागणी एका पत्रातून मी केली होती. आपल्या महापुरुषांच्या कार्याचे स्मरण सदोदित नव्या पिढीला होत राहील आणि त्यातून उद्याच्या समर्थ भारतासाठी गौरवशाली पिढ्यांचे निर्माण होईल.'
मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी याबाबत ट्वीट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, 'छत्रपती संभाजी महाराजांचे नाव कोस्टल रोडला व त्याच कोस्टल रोडचा भाग असलेल्या वांद्रे वर्सोवा सी-लींकला सावरकरांचे नाव देणे कितपत योग्य? संभाजी महाराज नाकर्ते व रागीट होते व त्यांना मंदिरा मदिराक्षींबद्दल आसक्ती होती हे सावरकरांचे मत होते. दोन्ही नावे एकत्र हा विरोधाभास नव्हे का?', असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवत मुंबईतील कोस्टल रोडला धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे. तर वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे नाव देण्यात यावे. तर मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला (एमटीएचएल) भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी पत्राद्वारे केली होती. त्याच्या या पत्रानंतर आता मुख्यमंत्र्यांनी नावाबाबतच्या निर्णयाची घोषणा केली आहे.
शहर
- चेंबूर दुर्दैवी दुर्घटना: शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळले, तरीही अधिकारी-कंत्राटदारांना 'क्लीन चिट'; सर्व आरोपी निर्दोष
- अहिल्यानगर: श्रीगोंद्यात लग्नानंतर अवघ्या पाच दिवसांत धक्कादायक घडामोड, दोन नववधू रोख रक्कम घेऊन बेपत्ता; पोलिस तपास सुरू
- कोल्हापूर: अंबाबाई मंदिरात मोठी धार्मिक घडामोड! देवतांच्या मूर्तींचे टेंबलाई मंदिरात विधीवत स्थलांतर
- वन विभागाची एक चूक अन् बिबट्या निसटला! आजरा परिसरात थरार कायम, नागरिकांनी रात्री बाहेर पडताना सावधान राहावे
महाराष्ट्र
- चेंबूर दुर्दैवी दुर्घटना: शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळले, तरीही अधिकारी-कंत्राटदारांना 'क्लीन चिट'; सर्व आरोपी निर्दोष
- अहिल्यानगर: श्रीगोंद्यात लग्नानंतर अवघ्या पाच दिवसांत धक्कादायक घडामोड, दोन नववधू रोख रक्कम घेऊन बेपत्ता; पोलिस तपास सुरू
- कोल्हापूर: अंबाबाई मंदिरात मोठी धार्मिक घडामोड! देवतांच्या मूर्तींचे टेंबलाई मंदिरात विधीवत स्थलांतर
- वन विभागाची एक चूक अन् बिबट्या निसटला! आजरा परिसरात थरार कायम, नागरिकांनी रात्री बाहेर पडताना सावधान राहावे
गुन्हा
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट

























Subscribe to my channel




