बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा झालेला पराभव आणित्यानंतर अनेक पक्षांत झालेली पक्षांतरे यामुळे प्रादेशिकपक्षांच्या प्रासंगिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.सध्या प्रादेशिक पक्ष संकटाचा सामना करत आहेत हेखरे आहे. परंतु त्यांचे महत्त्व संपले असे मानणे घाईचेठरेल. बंगालमध्ये तृणमूल किंवा दिल्लीत‘आप''सारख्या पक्षांच्या पराभवाकडे प्रादेशिक पक्षांचाकायमचा अस्त म्हणून पाहिले जाऊ नये. गेल्या चारलोकसभा निवडणुकांसोबतच विविध राज्यांच्याविधानसभा निवडणुकांतही राष्ट्रीय आणि प्रादेशिकपक्षांच्या मतांच्या टक्क्यांत फारसा फरक पडला नाही. कोणत्याही पक्षाचा मूळ जनाधार ओळखण्यासाठीमतांची टक्केवारी हा सर्वात उत्तम निकष असतो. हेलक्षात घेणे महत्त्वाचे आहे. याशिवाय,लोकसभेच्यातुलनेत मतदार विधानसभा निवडणुकांत प्रादेशिकपक्षांना अधिक पसंती देतात. ही बाब स्थानिक राजकीय ओळखीचे महत्त्व अधोरेखित करते. बंगालमधील पराभवानंतर तृणमूलच्या अनेक आमदार,खासदारांना पक्षांतराला सामोरे जावे लागले. ‘आप''च्याराज्यसभा खासदारांमध्येही मोठ्या प्रमाणावर पक्षांतरझाले. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्रपवार) खासदारांनीही गट बदलला. या घडामोडीसंघटनात्मक कमकुवतपणा नक्कीच दाखवतात. पण हाजनसमर्थन घटल्याचा पुरावा मानला जाऊ शकत नाही.सध्या 11 राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे तरकाँग्रेसची सत्ता 3 राज्यांत आहे. प्रादेशिक पक्ष 4राज्यांमध्ये सत्ता चालवत आहेत. 10 इतर राज्ये आणिकेंद्रशासित प्रदेशांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालीलआघाडी सरकारे सत्तेत आहेत. यातील 4 राज्यांतप्रादेशिक पक्ष आघाडीचे प्रमुख भागीदार आहेत आणिभाजपची भूमिका घटक पक्षाची आहे. आंध्र प्रदेश,मेघालय, नागालँड व पुद्दुचेरी ही ती राज्ये आहेत. उर्वरित6 राज्यांत भाजप प्रादेशिक पक्षांशी युती करून सरकारचेनेतृत्व करत आहे. यात बिहार, उत्तर प्रदेश, आसाम,गोवा, महाराष्ट्र आणि त्रिपुराचा समावेश आहे. 3राज्यांमध्ये काँग्रेसही प्रादेशिक पक्षांसोबत आघाडीसरकारचा भाग आहे. झारखंडमध्ये काँग्रेस ही‘झामुमो''ची तर जम्मू-काश्मीरमध्ये ‘नॅशनलकॉन्फरन्स''ची लहान सहकारी पक्ष आहे. केरळमध्येकाँग्रेस इतर प्रादेशिक पक्षांसोबत आघाडी सरकारचेनेतृत्व करत आहे. गेल्या चार लोकसभानिवडणुकांमधील विविध पक्षांच्या मतांचे विश्लेषणकेले असता या काळात राष्ट्रीय पक्षांची एकूण मते60.04% ते 68.15% दरम्यान राहिल्याचे दिसते.म्हणजेच त्यांचे एकूण राजकीय समर्थन साधारण स्थिरराहिले आहे. सर्वाधिक 68.15% मते त्यांना 2019 च्यालोकसभा निवडणुकीत मिळाली होती. महत्त्वाची बाबम्हणजे 2014 ची निवडणूक हे दाखवते की भारताच्या‘फर्स्ट-पास्ट-द-पोस्ट '' निवडणूक पद्धतीत मतांचीटक्केवारी, निवडणुकीचा निकाल नेहमी एकमेकांनुसारनसतो. गेल्या चार लोकसभा निवडणुकांमध्ये 2014मध्ये राष्ट्रीय पक्षांची एकूण मते सर्वात कमी असूनही,भाजपच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए''ने स्पष्ट बहुमतमिळवून केंद्रात सरकार स्थापन केले होते. 2009 च्यालोकसभा निवडणुकीत सर्व राष्ट्रीय पक्षांना मिळून63.59% मते मिळाली होती तर 2024 च्या निवडणुकीतहा आकडा 62.72% होता. दुसरीकडे, प्रादेशिक पक्षांनी लोकसभा निवडणुकांमध्येसातत्याने सुमारे एक-तृतीयांश मते मिळवली. 2009 च्यालोकसभा निवडणुकीत सर्व प्रादेशिक पक्षांना मिळून31.22% मते मिळाली होती, तर 2014 मध्ये हे प्रमाण35.86% होते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीतहीसर्व प्रादेशिक पक्षांची एकूण मते 33.52% होती. केवळ2019 ची निवडणूक याला अपवाद ठरली. तेव्हाप्रादेशिक पक्षांची मते 28.1% पर्यंत खाली आली होती. हेआकडे स्पष्ट करते की काही राज्यांत पराभव होऊनहीप्रादेशिक पक्षांनी राष्ट्रीय पातळीवर व अनेक राज्यांतआपला जनाधार मजबूत ठेवला आहे. परंतु,तमिळनाडूमध्ये ‘द्रमुक''चे नुकसान झाले तेव्हा त्यांचीजागा कोणत्याही राष्ट्रीय पक्षाने नाही, तर ‘टीव्हीके'' यादुसऱ्या प्रादेशिक पक्षाने घेतली हे आपण विसरता कामानये. यावरून अनेक राज्यांतील राजकीय स्पर्धेचे स्वरूपअजूनही प्रामुख्याने प्रादेशिक ताकदींवरच अवलंबूनअसल्याचे दिसून येते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) गेल्या चार लोकसभानिवडणुकांसोबतच विविध राज्यांच्याविधानसभा निवडणुकांमध्येही प्रादेशिकपक्षांच्या मतांच्या टक्क्यांमध्ये फारसाबदल झालेला नाही. मतांची टक्केवारीहा पक्षाचा मूळ जनाधार दर्शवणारा उत्तमनिकष असतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




