राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) 100 व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरातील विविध शहरांमध्ये कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. मुंबईतही एक कार्यक्रमा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला संबोधित करताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी परिस्थितीवर नाही तर काम कसं करायचं यावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे, असं सांगितलं. “परिस्थितीचा अधिक विचार करण्यात फायदा नाही. आहे त्या परिस्थिती काय उपाय केले पाहिजे याचा विचार केला पाहिजे. स्वयंसेवक असा विचार करतो. संपूर्ण आयुष्यात आपत्तीचा विचार करू नका. परिस्थिती असते. परिस्थिती येते आणि जाते. आज अशी आहे, उद्या वेगळी असेल. आपण तर तेच असतो. मला त्या परिस्थितीत कसं काम केलं पाहिजे, याचा विचार केला पाहिजे,” असं ते म्हणाले.
“संघाचे स्वयंसेवक असंच काम करतात. अनेक ठिकाणी संकटं होती, तिथे काम केलं. काही ठिकाणी लवकर झालं, तर काही ठिकाणी वेळ लागला. त्या परिस्थितीवर काय उपाय केला पाहिजे याचा विचार केला. त्यामुळे काम पूर्ण झालं. नव्या परिस्थितीत भ्रम फैलावला जातो. संघाबाबत हे फार झालं. जोपर्यंत सत्य समोर येत नाही तोपर्यंत भ्रमाची स्थिती कायम राहते. सत्य समोर येताच भ्रम आपोआप दूर होतो. आमचं काम संस्काराचं आहे, प्रचाराचं नाही. प्रचारात आम्ही मागे आहोत. प्रचार करता करता प्रचार करणाऱ्यांवरही काही परिणाम होतो. प्रचार केला तर प्रसिद्धी होते. प्रसिद्धी झाल्यावर अहंकार वाढतो. त्यापासून वाचणं हे आवश्यक असतं. प्रसिद्धी पावसासारखी असते. जिथे जेवढी पाहिजे, तेवढीच झाली पाहिजे. कमी झाली तर खराब आणि जास्त झाली तरी खराब आहे. त्यामुळे प्रचार कार्याचा केला पाहिजे, व्यक्तीचा करू नये. जिथे जेवढा आवश्यक आहे, तेव्हाच करावा. असं आम्ही चालतो, म्हणून आम्ही मागे आहोत. पण त्यातही जेवढी माहिती देता येईल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. वेबसाईट आणि संपर्कातून आम्ही काम करत आहोत,” असं भागवतांनी स्पष्ट केलं.
“एका मोठ्या मासिकाचे संपादक संघाच्या विरोधत होते. ते मला भेटायला आले. त्यांना मी सर्व सांगितलं. तरीही त्यांचे प्रश्न अनुत्तरीत राहिले. आता उत्तर तरी किती देणार? मी त्यांना नागपूरच्या संघाच्या वर्गाला बोलावलं. तिथे ते दोन दिवस राहिले, तेव्हा त्यांचे सर्व प्रश्न संपले. तरीसुद्धा त्यांचा एक प्रश्न होताच. संघाला पैसा येतो कुठून हा त्यांचा प्रश्न. मी सांगतो स्वयंसेवक संघ चालवण्यासाठी गुरु दक्षिणा देतात. सेवा चालवण्यासाठी आम्ही समाजाकडून मदत घेतो. पण त्यांना विश्वास बसत नव्हता. आम्हाला पैसा कमी येतो. जेवढा पैसा वाचवायचा तेवढा वाचवतो. आम्ही प्रवास करतो. त्यावेळी जेवणासाठी बाहेर खर्च करत नाही. आम्ही घरांमधून जेवण मागवतो. आम्ही हॉटेलात राहत नाही. घरात किंवा कार्यालयात राहतो. समाजाचा जो नॉर्मल बजेट आहे. त्यापेक्षा आमचा बजेट कमी आहे. आम्ही आमच्यात संघ घेऊन भेटतो. ही गोष्ट जेव्हा प्रत्यक्ष लोक पाहतात, तेव्हा त्यांचा भ्रम दूर होतो. आत येऊन तुम्ही संघाला पाहा असं आम्ही सांगतो. एक चमचा साखर खालल्यावर साखर गोड आहे हे तेव्हाच कळतं,” असं भागवत पुढे म्हणाले.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



