राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) 100 व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरातील विविध शहरांमध्ये कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. मुंबईतही एक कार्यक्रमा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला संबोधित करताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी परिस्थितीवर नाही तर काम कसं करायचं यावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे, असं सांगितलं. “परिस्थितीचा अधिक विचार करण्यात फायदा नाही. आहे त्या परिस्थिती काय उपाय केले पाहिजे याचा विचार केला पाहिजे. स्वयंसेवक असा विचार करतो. संपूर्ण आयुष्यात आपत्तीचा विचार करू नका. परिस्थिती असते. परिस्थिती येते आणि जाते. आज अशी आहे, उद्या वेगळी असेल. आपण तर तेच असतो. मला त्या परिस्थितीत कसं काम केलं पाहिजे, याचा विचार केला पाहिजे,” असं ते म्हणाले.
“संघाचे स्वयंसेवक असंच काम करतात. अनेक ठिकाणी संकटं होती, तिथे काम केलं. काही ठिकाणी लवकर झालं, तर काही ठिकाणी वेळ लागला. त्या परिस्थितीवर काय उपाय केला पाहिजे याचा विचार केला. त्यामुळे काम पूर्ण झालं. नव्या परिस्थितीत भ्रम फैलावला जातो. संघाबाबत हे फार झालं. जोपर्यंत सत्य समोर येत नाही तोपर्यंत भ्रमाची स्थिती कायम राहते. सत्य समोर येताच भ्रम आपोआप दूर होतो. आमचं काम संस्काराचं आहे, प्रचाराचं नाही. प्रचारात आम्ही मागे आहोत. प्रचार करता करता प्रचार करणाऱ्यांवरही काही परिणाम होतो. प्रचार केला तर प्रसिद्धी होते. प्रसिद्धी झाल्यावर अहंकार वाढतो. त्यापासून वाचणं हे आवश्यक असतं. प्रसिद्धी पावसासारखी असते. जिथे जेवढी पाहिजे, तेवढीच झाली पाहिजे. कमी झाली तर खराब आणि जास्त झाली तरी खराब आहे. त्यामुळे प्रचार कार्याचा केला पाहिजे, व्यक्तीचा करू नये. जिथे जेवढा आवश्यक आहे, तेव्हाच करावा. असं आम्ही चालतो, म्हणून आम्ही मागे आहोत. पण त्यातही जेवढी माहिती देता येईल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. वेबसाईट आणि संपर्कातून आम्ही काम करत आहोत,” असं भागवतांनी स्पष्ट केलं.
“एका मोठ्या मासिकाचे संपादक संघाच्या विरोधत होते. ते मला भेटायला आले. त्यांना मी सर्व सांगितलं. तरीही त्यांचे प्रश्न अनुत्तरीत राहिले. आता उत्तर तरी किती देणार? मी त्यांना नागपूरच्या संघाच्या वर्गाला बोलावलं. तिथे ते दोन दिवस राहिले, तेव्हा त्यांचे सर्व प्रश्न संपले. तरीसुद्धा त्यांचा एक प्रश्न होताच. संघाला पैसा येतो कुठून हा त्यांचा प्रश्न. मी सांगतो स्वयंसेवक संघ चालवण्यासाठी गुरु दक्षिणा देतात. सेवा चालवण्यासाठी आम्ही समाजाकडून मदत घेतो. पण त्यांना विश्वास बसत नव्हता. आम्हाला पैसा कमी येतो. जेवढा पैसा वाचवायचा तेवढा वाचवतो. आम्ही प्रवास करतो. त्यावेळी जेवणासाठी बाहेर खर्च करत नाही. आम्ही घरांमधून जेवण मागवतो. आम्ही हॉटेलात राहत नाही. घरात किंवा कार्यालयात राहतो. समाजाचा जो नॉर्मल बजेट आहे. त्यापेक्षा आमचा बजेट कमी आहे. आम्ही आमच्यात संघ घेऊन भेटतो. ही गोष्ट जेव्हा प्रत्यक्ष लोक पाहतात, तेव्हा त्यांचा भ्रम दूर होतो. आत येऊन तुम्ही संघाला पाहा असं आम्ही सांगतो. एक चमचा साखर खालल्यावर साखर गोड आहे हे तेव्हाच कळतं,” असं भागवत पुढे म्हणाले.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




