रिटा कोठारी यांचा कॉलम:घरगुती बोलण्यात तत्त्वज्ञान‎ किती खोलवर दडलेले असते?

2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‎‎‎‎‎‎‎‎‎‎माझ्या माहेरच्या घरातील शब्दसंपदा सत्संगातून आलेली‎आहे. आमच्याकडे एखाद्याचे निधन झाले की, ‘त्यांचे‎शरीर शांत झाले,’ असे म्हटले जाते. फाळणीच्या वेदना‎सोसलेल्या विविध व्यवसायांत यश-अपयश‎अनुभवलेल्या सिंधी समाजाला मृत्यू किंवा‎आजारपणाची भीती सहज वाटत नाही. मला आठवते,‎वडील आईला म्हणायचे, ‘माझे कपडे फाटले आहेत,‎किती ठिकाणी ते शिवणार?’ प्रत्यक्षात ते आपल्या‎शरीराविषयी बोलत असत. आई-वडील एकमेकांना‎विचारायचे, ‘आपल्यापैकी आधी कोणाचे स्टेशन‎येणार?’ म्हणजेच आयुष्याच्या रेल्वेप्रवासातून आधी‎कोण उतरून जाणार? मृत्यूची ही स्वीकारार्हता आणि ‎‎त्यामागची तत्त्वज्ञानाची दृष्टी होती का? याउलट माझ्या ‎‎गुजराती सासरच्या घरात वेगळीच कथा दिसते. येथे ‎‎‘जीवनाचा दर्जा’ जपण्यावर भर दिला जातो. शरीराची ‎‎काळजी घेतली जाते आणि मृत्यूनंतरही आठवणी जतन ‎‎केल्या जातात. एक कुटुंब इतिहासातील चढ-उतारांतून‎गेले आहे तर दुसऱ्याने शिक्षण आणि आधुनिकतेचा मार्ग ‎‎स्वीकारला आहे. त्यामुळे मला अनेकदा असे वाटते की‎मी दोन घरांत नव्हे, तर दोन वेगळ्या देशांत जगत आहे. ‎‎आणि त्यांतील सर्वात मोठा फरक मृत्यूकडे पाहण्याच्या ‎‎दृष्टिकोनात दिसून येतो. भलेही मृत्यू सर्वांसाठी समान‎असल्याचे म्हटले जाते.‎

माझ्या स्मरणात सर्वप्रथम कवी जॉन डन यांच्या प्रसिद्ध‎ओळी उमटतात – ‘डेथ, बी नॉट प्राउड, दो सम हॅव‎कॉल्ड दी माइटी एंड ड्रेडफुल, फॉर दाउ आर्ट नॉट सो’.‎

या कवितेत कवी मृत्यूला सांगतो की, तू आम्हाला‎संपवत नाहीस; आम्ही फक्त एका दीर्घ निद्रेत जातो‎आणि पुढे कुठेतरी नव्या जगात प्रवेश करतो. म्हणून‎मृत्यूने आपल्या सामर्थ्याचा गर्व करू नये. त्यालाही‎आपले कर्तव्य पार पाडावे लागते. प्रत्येकाच्या आयुष्यात‎कधीतरी यावेच लागते. शाळेत ही कविता शिकताना‎मृत्यूविषयी विचार करण्याची ना गरज होती, ना क्षमता.‎पण आता ती कविता वारंवार आठवते. ती निर्भयतेचा‎संदेश देते का? माझे आई-वडील त्यांच्या पद्धतीने हेच‎समजून घेत होते का? माझ्या स्वतःच्या मृत्यूचा विचार‎मला फारसा भयावह वाटत नाही. पण जवळच्या‎मित्रांचा किंवा कुटुंबीयांचा मृत्यू पाहण्याची कल्पनाच‎अस्वस्थ करणारी आहे. स्वतःला दुःखाच्या अथांग‎सागरात पाहण्याचा विचारही मन हेलावून टाकतो. या‎भीतीला आपण कसे लहान करू शकतो? ‘शरीर शांत‎झाले’ असे म्हणणे आत्मा अमर असल्याची समजूत‎घालते का? की आपल्या माणसांविषयी अलिप्तता‎निर्माण झाली तर दुःख सहन करणे सोपे होते? या‎प्रश्नांची उत्तरे शोधताना मी साहित्यातील मृत्यूच्या प्रतिमा‎शोधू लागले. मला साहित्य हे जीवनाच्या गूढतेचे सर्वात‎प्रभावी प्रतिबिंब वाटते. या शोधप्रवासातील एक विशेष‎अनुभव सांगावासा वाटतो. संधी मिळाली तर पुढे‎आणखी काही सांगीन. ही कथा ज्येष्ठ गुजराती लेखिका‎धीरुबेन पटेल यांच्या ‘अंगत अनुभव’ या कथेतून आहे.‎रसिकभाई नावाचा एक कर्मचारी अतिशय बडबडा‎आणि अशुभ बातम्या सांगण्यात पटाईत असतो. तो‎कार्यालयात बसला की इतर कर्मचारी त्याच्यापासून दूर‎राहतात. त्याला चहा हवा का असे विचारले तर चर्चा‎चहापासून दूध, दुधापासून गाय आणि पुढे कुठल्यातरी‎विषयापर्यंत पोहोचते. पोळींचा विषय निघाला तरी तो‎नोकर किती पोळ्या खातात, स्वतः किती खातो,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎कोणत्या पिठाच्या पोळ्या मऊ होतात. कुठला गहू‎चांगला असतो, अशा अखंड गप्पा मारत राहतो.‎

एकदा कार्यालयातील लोकांना समजते की‎रसिकभाईंच्या तरुण मुलाचे अकस्मात निधन झाले‎आहे. काही दिवसांनी ते पुन्हा कार्यालयात येतात. सर्वांना‎वाटते आता तर ते आणखी बोलतील. पण आश्चर्य‎म्हणजे रसिकभाई पूर्णपणे शांत झालेले असतात. कोणी‎काही विचारले तर फक्त ‘हो’ किंवा ‘नाही’ एवढेच‎उत्तर देतात. शब्दांच्या जंगलात रमणारा माणूस जणू त्या‎जंगलातून बाहेर पडलेला असतो. मृत्यूचा हा सर्वांत‎गुंतागुंतीचा रंग आहे. स्वतः जिवंत असताना आपल्या‎लेकराला गमावणे. अशा वेळी मृत्यू आयुष्याच्या कडेला‎राहत नाही; तो थेट आयुष्याच्या मध्यभागी येऊन बसतो.‎ (हे लेखिकेचे वैयक्तिक विचार आहेत.)‎

QuoteImage

मला आठवते, वडील आईला म्हणायचे,‎‘माझे कपडे फाटले आहेत, ते किती‎ठिकाणी शिवणार?’ प्रत्यक्षात ते‎आपल्या शरीराविषयी बोलत असत. ते‎एकमेकांना म्हणत- ‘आपल्यापैकी आधी‎कोणाचे स्टेशन येणार?’ म्हणजे‎आयुष्याच्या प्रवासातून आधी कोण‎उतरून जाणार, याविषयी ते सहज होते.‎‎

QuoteImage

This post was originally published on this site.



शहर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *