माझ्या माहेरच्या घरातील शब्दसंपदा सत्संगातून आलेलीआहे. आमच्याकडे एखाद्याचे निधन झाले की, ‘त्यांचेशरीर शांत झाले,’ असे म्हटले जाते. फाळणीच्या वेदनासोसलेल्या विविध व्यवसायांत यश-अपयशअनुभवलेल्या सिंधी समाजाला मृत्यू किंवाआजारपणाची भीती सहज वाटत नाही. मला आठवते,वडील आईला म्हणायचे, ‘माझे कपडे फाटले आहेत,किती ठिकाणी ते शिवणार?’ प्रत्यक्षात ते आपल्याशरीराविषयी बोलत असत. आई-वडील एकमेकांनाविचारायचे, ‘आपल्यापैकी आधी कोणाचे स्टेशनयेणार?’ म्हणजेच आयुष्याच्या रेल्वेप्रवासातून आधीकोण उतरून जाणार? मृत्यूची ही स्वीकारार्हता आणि त्यामागची तत्त्वज्ञानाची दृष्टी होती का? याउलट माझ्या गुजराती सासरच्या घरात वेगळीच कथा दिसते. येथे ‘जीवनाचा दर्जा’ जपण्यावर भर दिला जातो. शरीराची काळजी घेतली जाते आणि मृत्यूनंतरही आठवणी जतन केल्या जातात. एक कुटुंब इतिहासातील चढ-उतारांतूनगेले आहे तर दुसऱ्याने शिक्षण आणि आधुनिकतेचा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे मला अनेकदा असे वाटते कीमी दोन घरांत नव्हे, तर दोन वेगळ्या देशांत जगत आहे. आणि त्यांतील सर्वात मोठा फरक मृत्यूकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात दिसून येतो. भलेही मृत्यू सर्वांसाठी समानअसल्याचे म्हटले जाते. माझ्या स्मरणात सर्वप्रथम कवी जॉन डन यांच्या प्रसिद्धओळी उमटतात – ‘डेथ, बी नॉट प्राउड, दो सम हॅवकॉल्ड दी माइटी एंड ड्रेडफुल, फॉर दाउ आर्ट नॉट सो’. या कवितेत कवी मृत्यूला सांगतो की, तू आम्हालासंपवत नाहीस; आम्ही फक्त एका दीर्घ निद्रेत जातोआणि पुढे कुठेतरी नव्या जगात प्रवेश करतो. म्हणूनमृत्यूने आपल्या सामर्थ्याचा गर्व करू नये. त्यालाहीआपले कर्तव्य पार पाडावे लागते. प्रत्येकाच्या आयुष्यातकधीतरी यावेच लागते. शाळेत ही कविता शिकतानामृत्यूविषयी विचार करण्याची ना गरज होती, ना क्षमता.पण आता ती कविता वारंवार आठवते. ती निर्भयतेचासंदेश देते का? माझे आई-वडील त्यांच्या पद्धतीने हेचसमजून घेत होते का? माझ्या स्वतःच्या मृत्यूचा विचारमला फारसा भयावह वाटत नाही. पण जवळच्यामित्रांचा किंवा कुटुंबीयांचा मृत्यू पाहण्याची कल्पनाचअस्वस्थ करणारी आहे. स्वतःला दुःखाच्या अथांगसागरात पाहण्याचा विचारही मन हेलावून टाकतो. याभीतीला आपण कसे लहान करू शकतो? ‘शरीर शांतझाले’ असे म्हणणे आत्मा अमर असल्याची समजूतघालते का? की आपल्या माणसांविषयी अलिप्ततानिर्माण झाली तर दुःख सहन करणे सोपे होते? याप्रश्नांची उत्तरे शोधताना मी साहित्यातील मृत्यूच्या प्रतिमाशोधू लागले. मला साहित्य हे जीवनाच्या गूढतेचे सर्वातप्रभावी प्रतिबिंब वाटते. या शोधप्रवासातील एक विशेषअनुभव सांगावासा वाटतो. संधी मिळाली तर पुढेआणखी काही सांगीन. ही कथा ज्येष्ठ गुजराती लेखिकाधीरुबेन पटेल यांच्या ‘अंगत अनुभव’ या कथेतून आहे.रसिकभाई नावाचा एक कर्मचारी अतिशय बडबडाआणि अशुभ बातम्या सांगण्यात पटाईत असतो. तोकार्यालयात बसला की इतर कर्मचारी त्याच्यापासून दूरराहतात. त्याला चहा हवा का असे विचारले तर चर्चाचहापासून दूध, दुधापासून गाय आणि पुढे कुठल्यातरीविषयापर्यंत पोहोचते. पोळींचा विषय निघाला तरी तोनोकर किती पोळ्या खातात, स्वतः किती खातो,कोणत्या पिठाच्या पोळ्या मऊ होतात. कुठला गहूचांगला असतो, अशा अखंड गप्पा मारत राहतो. एकदा कार्यालयातील लोकांना समजते कीरसिकभाईंच्या तरुण मुलाचे अकस्मात निधन झालेआहे. काही दिवसांनी ते पुन्हा कार्यालयात येतात. सर्वांनावाटते आता तर ते आणखी बोलतील. पण आश्चर्यम्हणजे रसिकभाई पूर्णपणे शांत झालेले असतात. कोणीकाही विचारले तर फक्त ‘हो’ किंवा ‘नाही’ एवढेचउत्तर देतात. शब्दांच्या जंगलात रमणारा माणूस जणू त्याजंगलातून बाहेर पडलेला असतो. मृत्यूचा हा सर्वांतगुंतागुंतीचा रंग आहे. स्वतः जिवंत असताना आपल्यालेकराला गमावणे. अशा वेळी मृत्यू आयुष्याच्या कडेलाराहत नाही; तो थेट आयुष्याच्या मध्यभागी येऊन बसतो. (हे लेखिकेचे वैयक्तिक विचार आहेत.) मला आठवते, वडील आईला म्हणायचे,‘माझे कपडे फाटले आहेत, ते कितीठिकाणी शिवणार?’ प्रत्यक्षात तेआपल्या शरीराविषयी बोलत असत. तेएकमेकांना म्हणत- ‘आपल्यापैकी आधीकोणाचे स्टेशन येणार?’ म्हणजेआयुष्याच्या प्रवासातून आधी कोणउतरून जाणार, याविषयी ते सहज होते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: सुरक्षेचा मोठा प्रश्न! केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अधिकृत ताफ्याला दुचाकीस्वाराने मारला 'कट'; ३२ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: "ओम नमस्ते गणपतये...!" पुण्यात स्त्रीशक्तीचा अभूतपूर्व जागर; श्रीमंत दगडूशेठ बाप्पासमोर तब्बल ३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण!
- मुंबई: कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते...राज ठाकरेंच्या एकाच वाक्यातील सूचक आणि रहस्यमय पोस्टमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ!
- छत्रपती संभाजीनगर: गणरायाच्या स्वागतावेळी मृत्यूने साधला डाव; कंटेनर थेट मिरवणुकीच्या गर्दीत घुसल्याने २ ठार, पाच वर्षांच्या बालकासह १२ जण जखमी!
महाराष्ट्र
- उल्हासनगर: महापालिकेचा अजब कारभार! पावसाळा संपल्यावर विद्यार्थ्यांना मिळणार रेनकोट आणि शालेय साहित्य; पालकांमध्ये संताप!
- पुणे: फर्ग्युसन रोडवर २१ हजार पाणीपुरीच्या पुऱ्यांपासून साकारला तब्बल १३ फूट उंच देखणा गणपती बाप्पा!
- कोल्हापूर: पोलिसांची भन्नाट क्लिष्ट कामगिरी! एका छोट्या 'फोन पे' ट्रान्झॅक्शन आणि कपड्याच्या तुकड्यामुळे लागला तब्बल ५ लाखांच्या चोरीचा छडा!
- सोलापूर: अचानक प्रकृती बिघडून रक्ताची उलटी झाल्याने २५ वर्षीय महिला पोलीस प्रतीक्षा पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी; पांगरीत शोककळा!
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही





























Subscribe to my channel




