विक्रम भट्ट यांचा ७० दिवसांचा तुरुंगवास
प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक विक्रम भट्ट हे सध्या एका गंभीर प्रकरणामुळे चर्चेत आहेत. ३० कोटींच्या फसवणुकीच्या (IVF Fraud Case) आरोपामुळे त्यांना ७० दिवस तुरुंगात घालवावे लागले होते. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी एका मुलाखतीत तिथल्या अनुभवांना आणि त्या काळातील संघर्षाला उजाळा दिला आहे.
तुरुंगातील 'नवा भारत' आणि सहकाऱ्यांचे प्रेम:
सिद्धार्थ कन्नन यांना दिलेल्या मुलाखतीत विक्रम भट्ट यांनी सांगितले की, तुरुंगातील वातावरण सुरुवातीला भीतीदायक वाटत होते, पण तिथे त्यांना माणुसकीचा एक वेगळा पैलू पाहायला मिळाला. ते म्हणाले, "मी ६० ते ८० लोकांसोबत एका खोलीत होतो. तिथे मला एक वेगळाच भारत पाहायला मिळाला. माझ्या सह-कैद्यांनी माझ्याशी खूप प्रेमाने वागणूक दिली. ते मला 'भीष्म पितामह' म्हणायचे आणि दररोज रात्री माझ्याकडून हॉरर गोष्टी ऐकायचे." विशेष म्हणजे, हे सहकारी त्यांची खूप काळजी घेत, त्यांना जेवण मिळवून देण्यापासून ते त्यांच्या सुरक्षेपर्यंत सर्व जबाबदारी स्वतः पार पाडत.
आरोग्याच्या तक्रारी आणि अधिकाऱ्यांची उदासिनता:
तुरुंगात असताना विक्रम भट्ट यांना कावीळ झाली होती. त्यांनी सांगितले की, आजारी असताना त्यांना प्रचंड थंडी वाजायची, अशा वेळी त्यांचे सहकारी त्यांना स्वतःच्या ब्लँकेट्सनी उबदार ठेवत. त्यांनी तुरुंग प्रशासनाकडे रुग्णालयात नेण्याची वारंवार विनंती केली, मात्र 'सुरक्षेचे कारण' देत त्यांना वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत.
कलावंतांचा पाठिंबा:
सुटकेनंतर चित्रपटसृष्टीतील काही सहकाऱ्यांनी फोन करून त्यांची विचारपूस केली. विक्रम भट्ट म्हणाले, "मिथुन चक्रवर्ती आणि अजय देवगण यांचे फोन आले होते. संजय दत्त यांनीही फोन करून माझी चौकशी केली, ज्यांच्यासोबत मी कधीही काम केले नव्हते. मात्र, अक्षय कुमारने संपर्क साधला का, या प्रश्नावर त्यांनी 'तो माझा मित्र नाही' असे स्पष्ट उत्तर दिले."
विक्रम भट्ट आणि त्यांची पत्नी श्वेतांबरी यांच्यावर अजय मुर्डिया यांच्या पत्नीवर बनलेल्या बायोपिकशी संबंधित फसवणुकीचे आरोप आहेत, ज्याचा तपास सध्या सुरू आहे.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



