कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) संदर्भातील जागतिक चर्चासध्या प्रामुख्याने संशोधन संस्थांमधील स्पर्धा किंवातंत्रज्ञानाच्या क्षमतांपुरती मर्यादित आहे. मात्र एआयचाउपयोग नेमका कोणत्या उद्देशासाठी व्हावा किंवाविद्यमान संस्था व नियामक यंत्रणा हे तंत्रज्ञानमानवकल्याणाच्या दिशेने नेऊ शकतील का, हा मूलभूतप्रश्न फारसा विचारला जात नाही. अलीकडे पोप लियो यांनी एआय मानवी प्रतिष्ठेसाठीगंभीर धोका असल्याचे म्हटले. अनेक वर्षांपासूनतंत्रज्ञानाचे परिणाम हे आपले नशीब नसून आपल्यानिवडींवर अवलंबून असतात, असा युक्तिवाद करणाराअर्थतज्ज्ञ म्हणून मी पोप यांच्या हस्तक्षेपाचे स्वागतकरतो. बहुतांश विश्लेषक हे लक्षात घेत नाहीत कीतंत्रज्ञान कधीही तटस्थ नसते. ते निर्माण करणारे, निधी पुरवणारे आणि नियंत्रण ठेवणारे लोक त्यावर आपलाठसा उमटवत असतात. त्यामुळे आजचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, एआयला नेमके कोणते काम करण्यासाठी तयार केले पाहिजे? एआयसारखे तंत्रज्ञान अनेक मार्गांनी विकसित होऊ शकते आणि प्रत्येक मार्गाचे समाजावर दूरगामी परिणाम होतात. काही वर्षांपूर्वी अयोग्य मानल्याजाणाऱ्या गोष्टी आज सामान्य झाल्या आहेत. एआयच्या मदतीने व्यापक पाळत ठेवणे किंवा लक्ष्य निश्चित करून हल्ले करणारी अल्गोरिदम प्रणाली याची उदाहरणे आहेत. सिलिकॉन व्हॅलीतील अनेक जण अमेरिकेने नव्यालष्करी-अल्गोरिदम व्यवस्थेद्वारे आपली सामरिकताकद वाढवावी, असा आग्रह धरत आहेत. परंतुतंत्रज्ञानामुळे प्रत्यक्ष मानवी संपर्काशिवाय हल्ले करणेसोपे होते. ते संघर्षांच्या नैतिक मर्यादा कमकुवत करते.त्यामुळे एआयचे लष्करीकरण रोखणे आवश्यक आहे.हा विषय केवळ संरक्षण क्षेत्रापुरता मर्यादित नसूनआर्थिक आणि बौद्धिक पातळीवरही महत्त्वाचा आहे.तांत्रिक प्रगती म्हणजे नैतिक प्रगती असे नसते, हे लक्षात घेतले पाहिजे. एखादी गोष्ट तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे म्हणजे तीमानवतेसाठी उपयुक्तच असेल, असे नाही. कोणतेतंत्रज्ञान स्वीकारार्ह आहे, हे त्यावर नियंत्रण कोणाचेआहे आणि त्यामागील विचारसरणी व हितसंबंधकोणते आहेत, यावर अवलंबून असते. एआय रोजच्या अनेक जबाबदाऱ्या स्वीकारूनउत्पादकता वाढवतो. पण त्याचवेळी कामगारांना यंत्रांच्यागतीशी आणि अपेक्षांशी जुळवून घेण्यास भाग पाडतो.प्रत्यक्षात यंत्रांची रचना कामगारांना पूरक ठरेल, अशीअसायला हवी. आज संपूर्ण एआय उद्योग मानवी क्षमतांची नक्कलकरण्यावर आणि मनुष्य करत असलेल्या कामांचेस्वयंचलन करण्यावर भर देत आहे. त्यातून अशी कृत्रिमसर्वसाधारण बुद्धिमत्ता (एजीआय) विकसितकरण्याचा प्रयत्न सुरू आहे, जी माणूस करू शकतो तेसर्व काही करू शकेल. मात्र हा दृष्टिकोन एका चुकीच्या गृहितकावर आधारितआहे. तो म्हणजे यांत्रिक बुद्धिमत्ता आणि मानवीबुद्धिमत्ता मूलतः सारख्याच आहेत. प्रत्यक्षात माणूसकाही मोजक्या अनुभवांतून शिकतो. तो गृहितके तयारकरतो. मनात विविध शक्यतांचा विचार करतो आणिप्रयत्न-चुकांच्या सामाजिक प्रक्रियेतून आपले आकलनअधिक परिपक्व करतो. मुले भाषा शिकतात, तीही याचपद्धतीने. याउलट एआय प्रणाली प्रचंड प्रमाणातीलप्रशिक्षण डेटावर अवलंबून असतात. मोठ्या प्रमाणावरनमुने ओळखण्यात त्या कुशल असतात. मात्र त्यांनीअद्याप खरी सर्जनशीलता दाखवलेली नाही. त्यांनावास्तविक जगाचा प्रत्यक्ष अनुभव नाही. तसेच भौतिकआणि सामाजिक जगाशी संवाद साधून शिकण्याचीमानवी क्षमता त्यांच्यात दिसून आलेली नाही. दोन गोष्टी इतक्या मूलभूतपणे वेगळ्या असतात, तेव्हाएका गोष्टीचा वापर दुसऱ्याची नक्कल करण्यासाठीकरू नये. उलट माणूस करू शकत नाही अशी कामेएआयकडे सोपवणे अधिक उपयुक्त ठरेल. त्यामुळेमानवी क्षमतांचा विस्तार होईल. विशेषतः विकसनशीलदेशांतील अब्जावधी लोकांसाठी, जिथे चांगली नोकरी हेगरिबीतून बाहेर पडण्याचे सर्वात विश्वासार्ह साधनआहे, तिथे स्वयंचलन-केंद्रित एआय धोरण विनाशकारीठरू शकते. (प्रोजेक्ट सिंडिकेट) एआयचा वापर माणसांच्या जागीकरण्याऐवजी त्यांच्या क्षमतांना पूरकठरणाऱ्या कामांसाठी केला तरच तंत्रज्ञानआणि मानव यांच्यात संतुलितसहअस्तित्व निर्माण होऊ शकते. अन्यथारोजगार, सामाजिक स्थैर्य आणि आर्थिकसंधींवर गंभीर परिणाम होण्याचा धोकाआहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- महिला T20 विश्वचषक: भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
महाराष्ट्र
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
गुन्हा
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

पनवेल तालुक्यातील नांदगाव येथील धक्कादायक घटना समोर आली आहे. #punenews #latestnews #viralvideo
पुणे: खून प्रकरणातील फरार आरोपी अखेर जेरबंद; भारती विद्यापीठ पोलिसांची आंबेगाव पठारात मोठी कारवाई
पुणे: पाणीटंचाईचे संकट! आमदार बापूसाहेब पठारे यांनी विधानसभेत महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले
देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!

























Subscribe to my channel




