डेरॉन एस्मोग्लू यांचा कॉलम:एआयने त्याचे काम करावे‎ आणि माणसाने आपले!

2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‎‎‎‎‎‎‎‎‎‎कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) संदर्भातील जागतिक चर्चा‎सध्या प्रामुख्याने संशोधन संस्थांमधील स्पर्धा किंवा‎तंत्रज्ञानाच्या क्षमतांपुरती मर्यादित आहे. मात्र एआयचा‎उपयोग नेमका कोणत्या उद्देशासाठी व्हावा किंवा‎विद्यमान संस्था व नियामक यंत्रणा हे तंत्रज्ञान‎मानवकल्याणाच्या दिशेने नेऊ शकतील का, हा मूलभूत‎प्रश्न फारसा विचारला जात नाही.‎

अलीकडे पोप लियो यांनी एआय मानवी प्रतिष्ठेसाठी‎गंभीर धोका असल्याचे म्हटले. अनेक वर्षांपासून‎तंत्रज्ञानाचे परिणाम हे आपले नशीब नसून आपल्या‎निवडींवर अवलंबून असतात, असा युक्तिवाद करणारा‎अर्थतज्ज्ञ म्हणून मी पोप यांच्या हस्तक्षेपाचे स्वागत‎करतो. बहुतांश विश्लेषक हे लक्षात घेत नाहीत की‎तंत्रज्ञान कधीही तटस्थ नसते. ते निर्माण करणारे, निधी ‎‎पुरवणारे आणि नियंत्रण ठेवणारे लोक त्यावर आपला‎ठसा उमटवत असतात.‎

त्यामुळे आजचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, ‎‎एआयला नेमके कोणते काम करण्यासाठी तयार केले ‎‎पाहिजे? एआयसारखे तंत्रज्ञान अनेक मार्गांनी विकसित ‎‎होऊ शकते आणि प्रत्येक मार्गाचे समाजावर दूरगामी ‎‎परिणाम होतात. काही वर्षांपूर्वी अयोग्य मानल्या‎जाणाऱ्या गोष्टी आज सामान्य झाल्या आहेत. एआयच्या ‎‎मदतीने व्यापक पाळत ठेवणे किंवा लक्ष्य निश्चित करून ‎‎हल्ले करणारी अल्गोरिदम प्रणाली याची उदाहरणे‎ आहेत.

सिलिकॉन व्हॅलीतील अनेक जण अमेरिकेने नव्या‎लष्करी-अल्गोरिदम व्यवस्थेद्वारे आपली सामरिक‎ताकद वाढवावी, असा आग्रह धरत आहेत. परंतु‎तंत्रज्ञानामुळे प्रत्यक्ष मानवी संपर्काशिवाय हल्ले करणे‎सोपे होते. ते संघर्षांच्या नैतिक मर्यादा कमकुवत करते.‎त्यामुळे एआयचे लष्करीकरण रोखणे आवश्यक आहे.‎हा विषय केवळ संरक्षण क्षेत्रापुरता मर्यादित नसून‎आर्थिक आणि बौद्धिक पातळीवरही महत्त्वाचा आहे.‎तांत्रिक प्रगती म्हणजे नैतिक प्रगती असे नसते, हे लक्षात‎ घेतले पाहिजे.‎‎

एखादी गोष्ट तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे म्हणजे ती‎मानवतेसाठी उपयुक्तच असेल, असे नाही. कोणते‎तंत्रज्ञान स्वीकारार्ह आहे, हे त्यावर नियंत्रण कोणाचे‎आहे आणि त्यामागील विचारसरणी व हितसंबंध‎कोणते आहेत, यावर अवलंबून असते.‎

एआय रोजच्या अनेक जबाबदाऱ्या स्वीकारून‎उत्पादकता वाढवतो. पण त्याचवेळी कामगारांना यंत्रांच्या‎गतीशी आणि अपेक्षांशी जुळवून घेण्यास भाग पाडतो.‎प्रत्यक्षात यंत्रांची रचना कामगारांना पूरक ठरेल, अशी‎असायला हवी.‎ आज संपूर्ण एआय उद्योग मानवी क्षमतांची नक्कल‎करण्यावर आणि मनुष्य करत असलेल्या कामांचे‎स्वयंचलन करण्यावर भर देत आहे. त्यातून अशी कृत्रिम‎सर्वसाधारण बुद्धिमत्ता (एजीआय) विकसित‎करण्याचा प्रयत्न सुरू आहे, जी माणूस करू शकतो ते‎सर्व काही करू शकेल.‎

मात्र हा दृष्टिकोन एका चुकीच्या गृहितकावर आधारित‎आहे. तो म्हणजे यांत्रिक बुद्धिमत्ता आणि मानवी‎बुद्धिमत्ता मूलतः सारख्याच आहेत. प्रत्यक्षात माणूस‎काही मोजक्या अनुभवांतून शिकतो. तो गृहितके तयार‎करतो. मनात विविध शक्यतांचा विचार करतो आणि‎प्रयत्न-चुकांच्या सामाजिक प्रक्रियेतून आपले आकलन‎अधिक परिपक्व करतो. मुले भाषा शिकतात, तीही याच‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎पद्धतीने. याउलट एआय प्रणाली प्रचंड प्रमाणातील‎प्रशिक्षण डेटावर अवलंबून असतात. मोठ्या प्रमाणावर‎नमुने ओळखण्यात त्या कुशल असतात. मात्र त्यांनी‎अद्याप खरी सर्जनशीलता दाखवलेली नाही. त्यांना‎वास्तविक जगाचा प्रत्यक्ष अनुभव नाही. तसेच भौतिक‎आणि सामाजिक जगाशी संवाद साधून शिकण्याची‎मानवी क्षमता त्यांच्यात दिसून आलेली नाही.‎

दोन गोष्टी इतक्या मूलभूतपणे वेगळ्या असतात, तेव्हा‎एका गोष्टीचा वापर दुसऱ्याची नक्कल करण्यासाठी‎करू नये. उलट माणूस करू शकत नाही अशी कामे‎एआयकडे सोपवणे अधिक उपयुक्त ठरेल. त्यामुळे‎मानवी क्षमतांचा विस्तार होईल. विशेषतः विकसनशील‎देशांतील अब्जावधी लोकांसाठी, जिथे चांगली नोकरी हे‎गरिबीतून बाहेर पडण्याचे सर्वात विश्वासार्ह साधन‎आहे, तिथे स्वयंचलन-केंद्रित एआय धोरण विनाशकारी‎ठरू शकते.‎ (प्रोजेक्ट सिंडिकेट)‎

QuoteImage

एआयचा वापर माणसांच्या जागी‎करण्याऐवजी त्यांच्या क्षमतांना पूरक‎ठरणाऱ्या कामांसाठी केला तरच तंत्रज्ञान‎आणि मानव यांच्यात संतुलित‎सहअस्तित्व निर्माण होऊ शकते. अन्यथा‎रोजगार, सामाजिक स्थैर्य आणि आर्थिक‎संधींवर गंभीर परिणाम होण्याचा धोका‎आहे.‎‎

QuoteImage

This post was originally published on this site.



शहर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *