कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) संदर्भातील जागतिक चर्चासध्या प्रामुख्याने संशोधन संस्थांमधील स्पर्धा किंवातंत्रज्ञानाच्या क्षमतांपुरती मर्यादित आहे. मात्र एआयचाउपयोग नेमका कोणत्या उद्देशासाठी व्हावा किंवाविद्यमान संस्था व नियामक यंत्रणा हे तंत्रज्ञानमानवकल्याणाच्या दिशेने नेऊ शकतील का, हा मूलभूतप्रश्न फारसा विचारला जात नाही. अलीकडे पोप लियो यांनी एआय मानवी प्रतिष्ठेसाठीगंभीर धोका असल्याचे म्हटले. अनेक वर्षांपासूनतंत्रज्ञानाचे परिणाम हे आपले नशीब नसून आपल्यानिवडींवर अवलंबून असतात, असा युक्तिवाद करणाराअर्थतज्ज्ञ म्हणून मी पोप यांच्या हस्तक्षेपाचे स्वागतकरतो. बहुतांश विश्लेषक हे लक्षात घेत नाहीत कीतंत्रज्ञान कधीही तटस्थ नसते. ते निर्माण करणारे, निधी पुरवणारे आणि नियंत्रण ठेवणारे लोक त्यावर आपलाठसा उमटवत असतात. त्यामुळे आजचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, एआयला नेमके कोणते काम करण्यासाठी तयार केले पाहिजे? एआयसारखे तंत्रज्ञान अनेक मार्गांनी विकसित होऊ शकते आणि प्रत्येक मार्गाचे समाजावर दूरगामी परिणाम होतात. काही वर्षांपूर्वी अयोग्य मानल्याजाणाऱ्या गोष्टी आज सामान्य झाल्या आहेत. एआयच्या मदतीने व्यापक पाळत ठेवणे किंवा लक्ष्य निश्चित करून हल्ले करणारी अल्गोरिदम प्रणाली याची उदाहरणे आहेत. सिलिकॉन व्हॅलीतील अनेक जण अमेरिकेने नव्यालष्करी-अल्गोरिदम व्यवस्थेद्वारे आपली सामरिकताकद वाढवावी, असा आग्रह धरत आहेत. परंतुतंत्रज्ञानामुळे प्रत्यक्ष मानवी संपर्काशिवाय हल्ले करणेसोपे होते. ते संघर्षांच्या नैतिक मर्यादा कमकुवत करते.त्यामुळे एआयचे लष्करीकरण रोखणे आवश्यक आहे.हा विषय केवळ संरक्षण क्षेत्रापुरता मर्यादित नसूनआर्थिक आणि बौद्धिक पातळीवरही महत्त्वाचा आहे.तांत्रिक प्रगती म्हणजे नैतिक प्रगती असे नसते, हे लक्षात घेतले पाहिजे. एखादी गोष्ट तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे म्हणजे तीमानवतेसाठी उपयुक्तच असेल, असे नाही. कोणतेतंत्रज्ञान स्वीकारार्ह आहे, हे त्यावर नियंत्रण कोणाचेआहे आणि त्यामागील विचारसरणी व हितसंबंधकोणते आहेत, यावर अवलंबून असते. एआय रोजच्या अनेक जबाबदाऱ्या स्वीकारूनउत्पादकता वाढवतो. पण त्याचवेळी कामगारांना यंत्रांच्यागतीशी आणि अपेक्षांशी जुळवून घेण्यास भाग पाडतो.प्रत्यक्षात यंत्रांची रचना कामगारांना पूरक ठरेल, अशीअसायला हवी. आज संपूर्ण एआय उद्योग मानवी क्षमतांची नक्कलकरण्यावर आणि मनुष्य करत असलेल्या कामांचेस्वयंचलन करण्यावर भर देत आहे. त्यातून अशी कृत्रिमसर्वसाधारण बुद्धिमत्ता (एजीआय) विकसितकरण्याचा प्रयत्न सुरू आहे, जी माणूस करू शकतो तेसर्व काही करू शकेल. मात्र हा दृष्टिकोन एका चुकीच्या गृहितकावर आधारितआहे. तो म्हणजे यांत्रिक बुद्धिमत्ता आणि मानवीबुद्धिमत्ता मूलतः सारख्याच आहेत. प्रत्यक्षात माणूसकाही मोजक्या अनुभवांतून शिकतो. तो गृहितके तयारकरतो. मनात विविध शक्यतांचा विचार करतो आणिप्रयत्न-चुकांच्या सामाजिक प्रक्रियेतून आपले आकलनअधिक परिपक्व करतो. मुले भाषा शिकतात, तीही याचपद्धतीने. याउलट एआय प्रणाली प्रचंड प्रमाणातीलप्रशिक्षण डेटावर अवलंबून असतात. मोठ्या प्रमाणावरनमुने ओळखण्यात त्या कुशल असतात. मात्र त्यांनीअद्याप खरी सर्जनशीलता दाखवलेली नाही. त्यांनावास्तविक जगाचा प्रत्यक्ष अनुभव नाही. तसेच भौतिकआणि सामाजिक जगाशी संवाद साधून शिकण्याचीमानवी क्षमता त्यांच्यात दिसून आलेली नाही. दोन गोष्टी इतक्या मूलभूतपणे वेगळ्या असतात, तेव्हाएका गोष्टीचा वापर दुसऱ्याची नक्कल करण्यासाठीकरू नये. उलट माणूस करू शकत नाही अशी कामेएआयकडे सोपवणे अधिक उपयुक्त ठरेल. त्यामुळेमानवी क्षमतांचा विस्तार होईल. विशेषतः विकसनशीलदेशांतील अब्जावधी लोकांसाठी, जिथे चांगली नोकरी हेगरिबीतून बाहेर पडण्याचे सर्वात विश्वासार्ह साधनआहे, तिथे स्वयंचलन-केंद्रित एआय धोरण विनाशकारीठरू शकते. (प्रोजेक्ट सिंडिकेट) एआयचा वापर माणसांच्या जागीकरण्याऐवजी त्यांच्या क्षमतांना पूरकठरणाऱ्या कामांसाठी केला तरच तंत्रज्ञानआणि मानव यांच्यात संतुलितसहअस्तित्व निर्माण होऊ शकते. अन्यथारोजगार, सामाजिक स्थैर्य आणि आर्थिकसंधींवर गंभीर परिणाम होण्याचा धोकाआहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

15 July 2026
15 July 2026
इंदौर : रोड रेजचा थरार! कारच्या बोनटवर चढून तरुणाचा धिंगाणा #इंदौर #रोडरेज #व्हायरलव्हिडिओ #ब्रेकिंग
देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.























Subscribe to my channel




