कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) संदर्भातील जागतिक चर्चासध्या प्रामुख्याने संशोधन संस्थांमधील स्पर्धा किंवातंत्रज्ञानाच्या क्षमतांपुरती मर्यादित आहे. मात्र एआयचाउपयोग नेमका कोणत्या उद्देशासाठी व्हावा किंवाविद्यमान संस्था व नियामक यंत्रणा हे तंत्रज्ञानमानवकल्याणाच्या दिशेने नेऊ शकतील का, हा मूलभूतप्रश्न फारसा विचारला जात नाही. अलीकडे पोप लियो यांनी एआय मानवी प्रतिष्ठेसाठीगंभीर धोका असल्याचे म्हटले. अनेक वर्षांपासूनतंत्रज्ञानाचे परिणाम हे आपले नशीब नसून आपल्यानिवडींवर अवलंबून असतात, असा युक्तिवाद करणाराअर्थतज्ज्ञ म्हणून मी पोप यांच्या हस्तक्षेपाचे स्वागतकरतो. बहुतांश विश्लेषक हे लक्षात घेत नाहीत कीतंत्रज्ञान कधीही तटस्थ नसते. ते निर्माण करणारे, निधी पुरवणारे आणि नियंत्रण ठेवणारे लोक त्यावर आपलाठसा उमटवत असतात. त्यामुळे आजचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, एआयला नेमके कोणते काम करण्यासाठी तयार केले पाहिजे? एआयसारखे तंत्रज्ञान अनेक मार्गांनी विकसित होऊ शकते आणि प्रत्येक मार्गाचे समाजावर दूरगामी परिणाम होतात. काही वर्षांपूर्वी अयोग्य मानल्याजाणाऱ्या गोष्टी आज सामान्य झाल्या आहेत. एआयच्या मदतीने व्यापक पाळत ठेवणे किंवा लक्ष्य निश्चित करून हल्ले करणारी अल्गोरिदम प्रणाली याची उदाहरणे आहेत. सिलिकॉन व्हॅलीतील अनेक जण अमेरिकेने नव्यालष्करी-अल्गोरिदम व्यवस्थेद्वारे आपली सामरिकताकद वाढवावी, असा आग्रह धरत आहेत. परंतुतंत्रज्ञानामुळे प्रत्यक्ष मानवी संपर्काशिवाय हल्ले करणेसोपे होते. ते संघर्षांच्या नैतिक मर्यादा कमकुवत करते.त्यामुळे एआयचे लष्करीकरण रोखणे आवश्यक आहे.हा विषय केवळ संरक्षण क्षेत्रापुरता मर्यादित नसूनआर्थिक आणि बौद्धिक पातळीवरही महत्त्वाचा आहे.तांत्रिक प्रगती म्हणजे नैतिक प्रगती असे नसते, हे लक्षात घेतले पाहिजे. एखादी गोष्ट तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे म्हणजे तीमानवतेसाठी उपयुक्तच असेल, असे नाही. कोणतेतंत्रज्ञान स्वीकारार्ह आहे, हे त्यावर नियंत्रण कोणाचेआहे आणि त्यामागील विचारसरणी व हितसंबंधकोणते आहेत, यावर अवलंबून असते. एआय रोजच्या अनेक जबाबदाऱ्या स्वीकारूनउत्पादकता वाढवतो. पण त्याचवेळी कामगारांना यंत्रांच्यागतीशी आणि अपेक्षांशी जुळवून घेण्यास भाग पाडतो.प्रत्यक्षात यंत्रांची रचना कामगारांना पूरक ठरेल, अशीअसायला हवी. आज संपूर्ण एआय उद्योग मानवी क्षमतांची नक्कलकरण्यावर आणि मनुष्य करत असलेल्या कामांचेस्वयंचलन करण्यावर भर देत आहे. त्यातून अशी कृत्रिमसर्वसाधारण बुद्धिमत्ता (एजीआय) विकसितकरण्याचा प्रयत्न सुरू आहे, जी माणूस करू शकतो तेसर्व काही करू शकेल. मात्र हा दृष्टिकोन एका चुकीच्या गृहितकावर आधारितआहे. तो म्हणजे यांत्रिक बुद्धिमत्ता आणि मानवीबुद्धिमत्ता मूलतः सारख्याच आहेत. प्रत्यक्षात माणूसकाही मोजक्या अनुभवांतून शिकतो. तो गृहितके तयारकरतो. मनात विविध शक्यतांचा विचार करतो आणिप्रयत्न-चुकांच्या सामाजिक प्रक्रियेतून आपले आकलनअधिक परिपक्व करतो. मुले भाषा शिकतात, तीही याचपद्धतीने. याउलट एआय प्रणाली प्रचंड प्रमाणातीलप्रशिक्षण डेटावर अवलंबून असतात. मोठ्या प्रमाणावरनमुने ओळखण्यात त्या कुशल असतात. मात्र त्यांनीअद्याप खरी सर्जनशीलता दाखवलेली नाही. त्यांनावास्तविक जगाचा प्रत्यक्ष अनुभव नाही. तसेच भौतिकआणि सामाजिक जगाशी संवाद साधून शिकण्याचीमानवी क्षमता त्यांच्यात दिसून आलेली नाही. दोन गोष्टी इतक्या मूलभूतपणे वेगळ्या असतात, तेव्हाएका गोष्टीचा वापर दुसऱ्याची नक्कल करण्यासाठीकरू नये. उलट माणूस करू शकत नाही अशी कामेएआयकडे सोपवणे अधिक उपयुक्त ठरेल. त्यामुळेमानवी क्षमतांचा विस्तार होईल. विशेषतः विकसनशीलदेशांतील अब्जावधी लोकांसाठी, जिथे चांगली नोकरी हेगरिबीतून बाहेर पडण्याचे सर्वात विश्वासार्ह साधनआहे, तिथे स्वयंचलन-केंद्रित एआय धोरण विनाशकारीठरू शकते. (प्रोजेक्ट सिंडिकेट) एआयचा वापर माणसांच्या जागीकरण्याऐवजी त्यांच्या क्षमतांना पूरकठरणाऱ्या कामांसाठी केला तरच तंत्रज्ञानआणि मानव यांच्यात संतुलितसहअस्तित्व निर्माण होऊ शकते. अन्यथारोजगार, सामाजिक स्थैर्य आणि आर्थिकसंधींवर गंभीर परिणाम होण्याचा धोकाआहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: बीड बायपासवरील जाबिंदा ग्राउंडजवळ तरुणाला चाकूचा धाक दाखवून सोन्याची साखळी लूटली
- रायगड: रामधरणेश्वर येथील तलावात बुडून २६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!
- 'क्राईम पेट्रोल' फेम अभिनेता सतीश नायकोडी यांची फसवणूक; एसआरए इमारतीत स्वस्त फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली लाखांची लुबाडणूक
- छत्रपती संभाजीनगर हादरलं! सामान पॅक करण्याच्या बहाण्याने बोलावून ३१ वर्षीय पीएचडीच्या विद्यार्थिनीवर रात्री अत्याचार; डिलिव्हरी बॉयच्या कृत्याने खळबळ!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: बीड बायपासवरील जाबिंदा ग्राउंडजवळ तरुणाला चाकूचा धाक दाखवून सोन्याची साखळी लूटली
- ईएमआय एक-दोन दिवस उशिरा भरल्यास सीबीआयएल स्कोअर खराब होतो का; जाणून घ्या नियम आणि परिणाम
- बीड: आष्टीत अमृता फडणवीस यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन; बीडमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयसाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन
- कोल्हापूर: जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील अपहार प्रकरणात मोठी घडामोड; १५ दिवसांपूर्वी जमा झाले आणखी २८ लाख
गुन्हा
- नागपुर: फ्रेंडशिप डे दिवशी थरार; लग्न आणि गिफ्टच्या वादातून तरुणीला नदीत ढकलून केली हत्या, खळबळजनक घटना उघड
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
- पुणे: ६ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला; पुण्याच्या बुधवार पेठेत २२ वर्षीय प्रेयसीच्या खून प्रकरणात नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा
- चंद्रपूर: प्रेमाच्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संपला तरुणीचा संसार; चंद्रपूरमधील दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पेट्रोल भरलं अन् पैसे न देता कारसह पसार? तरुणीचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
रस्ता बंद झाला तर निरीक्षकांनीच उचलली कुऱ्हाड! उत्तराखंड पोलिसांचा व्हिडिओ चर्चेत
पुण्यातील लोणीकंद पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप
देश विदेश
- उत्तर प्रदेश: 'बायकोने मृतदेहाला स्पर्शही करायचा नाही, माझा आत्मा…', भाचीला सुसाइड नोट पाठवत जिम संचालक व कॉलेज लिपिकाने स्वतःला संपवले
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज




























Subscribe to my channel




