पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:मन अनियंत्रित झाले तर‎ नातेसंबंध बिघडतात

2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

आपले मन वाटेल तिथे आणि वाटेल तसे धावत असते. ते स्वतःही‎भरकटते. आपल्यालाही भरकटवते. एखादी व्यक्ती किंवा परिस्थिती‎पाहून ते इतकी मोठी झेप घेते की आपण स्वतःच त्रस्त होतो. आपले‎मन संसारात अनियंत्रित होते. तेव्हा कुटुंबीयांसोबतचे संबंध‎बिघडतात. आपले विचार नकारात्मक होतात.

वाणी दूषित होते.‎स्वतःच्या घरातही बाहेरील जगात घडणाऱ्या काही गोष्टींसारखेच‎वर्तन करू लागतो. कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमधील बुलींग ही‎अत्यंत वेदनादायक बाब मानली जाते. याचा अर्थ समोरच्या व्यक्तीवर‎अयोग्य दबाव टाकणे किंवा त्याला वेदना देणाऱ्या टिप्पणी करणे असा‎ होतो.

आजकाल आपली मुले एकमेकांमध्ये तसेच घर-परिवारातही‎बुलींगचा वापर करताना दिसतात. भारतीय कुटुंबांत सध्या‎खलनायकाच्या भूमिकेला अधिक पसंती मिळते. संयम नसतो तो‎खलनायक बनतो. मात्र आत्मनियंत्रण असते तो नायक ठरतो. मुले‎खलनायकांविषयी आकर्षण दाखवू लागली आहेत. याच कारणामुळे‎कुटुंबांमधील अस्वस्थता व अशांतता वाढत चालली आहे.‎‎

This post was originally published on this site.



शहर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *