सोशल मीडियाच्या आधीच शंकास्पद नैतिक मानकेअसूनही आसाम भाजपने शेअर केलेला व्हिडिओ एकानवीन नीचांकावर पोहोचला. या वादग्रस्त व्हिडिओमध्ये(तो आता काढून टाकण्यात आला आहे) आसामचेमुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना अगदी जवळून एअररायफलमधून गोळीबार करताना दाखवले होते. त्यांच्यानिशाण्यावर दोन व्यक्ती होते - एक टोपी घातलेला वदुसरा दाढी असलेला. व्हिडिओमध्ये बांगलादेशीघुसखोरांविरुद्ध व आसामी अस्मिता जपण्याच्या बाजूनेनिषेध असल्याचा दावा केला गेला होता. खरे तरव्हिडिओने मांडलेली हिंसक, सांप्रदायिक प्रतिमा स्पष्टपणेद्वेषपूर्ण होती. एका राज्याचा मुख्यमंत्री - राज्यघटनेनेनिवडून आलेले नेते - यांनी उघडपणे एखाद्या समुदायावरबंदूक रोखणे हे घटनात्मक अधिकारांचे गंभीर उल्लंघनआहे. नंतर सरमा यांनी असा दावा केला की त्यांना अशाकोणत्याही व्हिडिओची माहिती नव्हती. परंतु असेस्पष्टीकरण अप्रासंगिक आहे. कारण हा व्हिडिओ आसामभाजपच्या अधिकृत एक्स हँडलवरून शेअर केला होता.तो काढून टाकण्यापूर्वी दहा लाखांहून अधिक वेळापाहिला गेला होता. शिवाय ही एक वेगळी घटना नव्हती.गेल्या काही महिन्यांपासून सरमा "मियां" या शब्दाचा वापरकरून विषारी मोहीम राबवत आहेत. तो आसाममधीलबंगाली भाषिक मुस्लिमांसाठी वापरला जाणाराअपमानजनक शब्द आहे. सरमा यांनी "मियां’ वर आर्थिकबहिष्कार टाकण्याचे आवाहनही केले आहे. मग तेदुकानदार, भाजीपाला विक्रेते किंवा ऑटो-रिक्षाचालक असोत. त्यांच्या भूमिकेबद्दल खेद व्यक्त करण्याऐवजीसरमा यांनी त्यांच्या विधानांचे वर्णन आसामच्यासांस्कृतिक आणि सभ्यतेच्या ओळखीचे रक्षणकरण्यासाठी "आवश्यक’ असे केले आहे. स्पष्टपणेसरमा अशा विधानांमध्ये निवडणूक क्षमता पाहतात.आज सरमा आणि त्यांच्या कुटुंबावर व्यापक भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. तेव्हा जातीय भाषणबाजी केवळ महत्त्वाच्या मुद्द्यांपासून लक्ष विचलित करत नाही तर समाजाचे ध्रुवीकरण करण्याचे साधन बनते. //"बाहेरील’ लोकांविरुद्धचा राग हा आसामच्या गुंतागुंतीच्या वांशिक परिदृश्याचा एक भाग आहे. राज्याची अंदाजे 38 टक्के मुस्लिम लोकसंख्या असूनही यामुळे लोकसंख्याशास्त्रीय बदल आणि सांस्कृतिक ऱ्हासाची भीती निर्माण करणेसोपे होते. म्हणूनच आसामबाहेर ही बाब द्वेषपूर्ण भाषणमानले जाईल. स्थानिक लोकसंख्येच्या ऐतिहासिक,भाषिक, सांस्कृतिक आणि आर्थिक हक्कांचे रक्षणम्हणून ते भलेही राज्यात सादर केले जात आहे. भाजपनेतृत्व देखील या आक्षेपार्ह व्हिडिओवर मौन बाळगतआहे. "सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’चा नारा असूनही निवडणुकीपूर्वी आसाममध्ये जातीयवातावरण चिघळवून ठेवण्यात राजकीय फायदा दिसूनयेतो. भाजप नेते "घुसखोरांच्या’ कथित धोक्याचाहीवारंवार उल्लेख करतात. वास्तविक आंतरराष्ट्रीयसीमांवर लक्ष ठेवणे ही केंद्रीय दलांची जबाबदारी आहे.सर्वात चिंताजनक गोष्ट म्हणजे बहुसंख्य राजकारणाच्याविजयी मोर्चासमोर स्वयंघोषित "धर्मनिरपेक्ष’ वर्ग देखीलजवळपास शक्तीहीन आणि असहाय्य दिसतो. वरीलव्हिडिओसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाईचीमागणी करण्यासाठी काही नागरिकांनी सर्वोच्चन्यायालयात जनहित याचिका दाखल केल्या आहेत. परंतुव्यापक राजकीय वर्गाने शर्मा यांच्या जातीयवादाचा थेटसामना करण्यास संकोच दाखवला. कारण यामुळे हिंदूमतदार आणखी दुरावू शकतात अशी भीती आहे. एककाळ असा होता जेव्हा काँग्रेससारख्या पक्षांवर मुस्लिमतुष्टीकरणाचा आरोप केला जात होता; आज बहुसंख्यहिंदू मतांसाठी स्पर्धा आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी शर्मायांच्याविरुद्ध हैदराबादमध्ये पोलिस तक्रार दाखल केलीअसेल तर ते हिंदू मतांवर अवलंबून नसल्यामुळे आहे.आणि कदाचित म्हणूनच शर्मा इतक्या मुक्तपणे द्वेषपूर्णभाषण करू शकतात. काँग्रेसचा दीर्घकाळचा नेताभाजपचा पोस्टर बॉय बनणे हे समकालीन राजकारणातीलसंधीसाधू पक्षांतराचे एक दुर्मिळ उदाहरण आहे. 2015 मध्ये आसामच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे दावा केला कीत्यांनी काँग्रेस सोडली. कारण राहुल गांधींनी एका खाजगीबैठकीत त्यांचा //"अपमान’ केला होता. राहुल गांधींनाआसामच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यापेक्षा आपल्या पाळीवकुत्र्याला बिस्किटे खायला घालणे हे जास्त महत्त्वाचेवाटले. सत्य हे आहे की त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षाकाँग्रेसमध्ये पूर्ण झाल्या नाहीत. तेव्हा भाजप त्यांच्यासाठीएक सुरक्षित व अनुकूल पर्याय बनला. भाजपने शर्मायांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते या सत्याचा विसरपडला. मात्र पक्षांतरानंतर त्यांच्यावरील सर्व खटले मागेघेण्यात आले आहेत किंवा त्यांची गती मंदावली आहे.आज 57 वर्षीय शर्मा हे भाजपच्या नवीन पिढीतीलआघाडीचे नेते आहेत. ही पिढी अटलबिहारीवाजपेयी-अडवाणी काळातील भाजप नेते राजकीयशुद्धता, नैतिक संयम किंवा घटनात्मक मूल्यांना बांधीलहोते. ही पिढी मात्र अशा साधनशुचितेला बांधील दिसतनाही. ही पिढी सर्वात जास्त राजकीय सत्ता मिळविण्याच्यातीव्र इच्छेने प्रेरित आहे. म्हणूनच ईशान्येकडील पक्षाचाप्रमुख चेहरा एक कुशल निवडणूक व्यवस्थापक आणिसमस्यानिवारक म्हणून शर्मा यांना एक अमूल्य ‘असेट’मानले जाते. परंतु राजकारणाकडून चांगल्याची अपेक्षाकरणारे नागरिक निःसंशयपणे शर्मा यांच्या वृत्तीमुळेअस्वस्थ होतील. पुनश्च : हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस सोडण्याचानिर्णय जाहीर केला. तेव्हा एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याने पक्षनेतृत्वाला कथितरित्या इशारा दिला होता की "ते भविष्याचेनेते आहेत; आम्हाला त्यांच्यासारख्या नेत्याची उणीवभासेल.’ एक दशकानंतर तो "भविष्याचा चेहरा’ त्यांनाएका अंधकारमय वर्तमानाचा भाग वाटत असेल का? (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) काँग्रेससारख्या पक्षांवर मुस्लिमतुष्टीकरणाचा आरोप केला जात होता.असाही एक काळ होता; परंतु आजभारतीय राजकारणात बहुसंख्यांक हिंदूमतांसाठी स्पर्धा दिसून येते. कदाचितयामुळेच आसामचे मुख्यमंत्री हिमंताबिस्वा सरमा इतके बेधडकपणे वादग्रस्तविधाने करू शकतात हे स्पष्ट होते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
- बळीराजाचा विजय! ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६,५८५ कोटींची कर्जमाफी; राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक मंजुरी
- "न्याय द्या.. अन्यथा गोळ्या घालून मारा!" सातार्यात तारळी धरणग्रस्तांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या.
महाराष्ट्र
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
- बळीराजाचा विजय! ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६,५८५ कोटींची कर्जमाफी; राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक मंजुरी
- "न्याय द्या.. अन्यथा गोळ्या घालून मारा!" सातार्यात तारळी धरणग्रस्तांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या.
गुन्हा
- बीडमध्ये वाल्मिक कराड गँगची दहशत कायम! जुगार अड्ड्याला विरोध केल्याने महिलेला अमानुष मारहाण; मुलांनाही उचलून फेकले. create landscape image no text on image no colllage image
- नवी मुंबईत अमानवीय घटना! आई-वडिलांना मारहाण करून घराबाहेर काढणाऱ्या मुलावर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका.
- अहिल्यानगरात गुन्हेगारी टोळीचा थरार! कॉन्ट्रॅक्ट नाकारल्याचा राग, कंपनीच्या एचआर हेडवर मारहाण करत लुटमार.
- पुण्यात काळाचा घाला! काम आटोपून घरी परतणाऱ्या पेंटरचा डंपरच्या धडकेत दुर्दैवी अंत.
राजकीय
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
- "महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: महायुतीची उमेदवारांची यादी निश्चित; शिंदे आणि अजित पवार गटाकडून नावांची घोषणा!"
इतर
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
- आजचे राशिभविष्य २९ मे २०२६ : मिथुन राशीत त्रिग्रह योग, या ४ राशींना मिळणार तिप्पट लाभ!
मनोरंजन
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
देश विदेश
- डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबतचा मोठा बदल; भारताला याचा फायदा होणार की फटका?
- लग्नाच्या काही तासांतच काळाचा घाला! भारतीय वंशाच्या पायलटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; नववधू ६ तास ढिगाऱ्याखाली अडकून
- इराकजवळ मालवाहू जहाजावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला, इराणने स्वीकारली जबाबदारी; आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ
- अमेरिका-इराण पुन्हा आमने-सामने! अमेरिकेचे इराणच्या लष्करी तळांवर पुन्हा बॉम्बहल्ले; गेरुक शहर व केशम बेट ठरले लक्ष्य























Subscribe to my channel




