सोशल मीडियाच्या आधीच शंकास्पद नैतिक मानकेअसूनही आसाम भाजपने शेअर केलेला व्हिडिओ एकानवीन नीचांकावर पोहोचला. या वादग्रस्त व्हिडिओमध्ये(तो आता काढून टाकण्यात आला आहे) आसामचेमुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना अगदी जवळून एअररायफलमधून गोळीबार करताना दाखवले होते. त्यांच्यानिशाण्यावर दोन व्यक्ती होते - एक टोपी घातलेला वदुसरा दाढी असलेला. व्हिडिओमध्ये बांगलादेशीघुसखोरांविरुद्ध व आसामी अस्मिता जपण्याच्या बाजूनेनिषेध असल्याचा दावा केला गेला होता. खरे तरव्हिडिओने मांडलेली हिंसक, सांप्रदायिक प्रतिमा स्पष्टपणेद्वेषपूर्ण होती. एका राज्याचा मुख्यमंत्री - राज्यघटनेनेनिवडून आलेले नेते - यांनी उघडपणे एखाद्या समुदायावरबंदूक रोखणे हे घटनात्मक अधिकारांचे गंभीर उल्लंघनआहे. नंतर सरमा यांनी असा दावा केला की त्यांना अशाकोणत्याही व्हिडिओची माहिती नव्हती. परंतु असेस्पष्टीकरण अप्रासंगिक आहे. कारण हा व्हिडिओ आसामभाजपच्या अधिकृत एक्स हँडलवरून शेअर केला होता.तो काढून टाकण्यापूर्वी दहा लाखांहून अधिक वेळापाहिला गेला होता. शिवाय ही एक वेगळी घटना नव्हती.गेल्या काही महिन्यांपासून सरमा "मियां" या शब्दाचा वापरकरून विषारी मोहीम राबवत आहेत. तो आसाममधीलबंगाली भाषिक मुस्लिमांसाठी वापरला जाणाराअपमानजनक शब्द आहे. सरमा यांनी "मियां’ वर आर्थिकबहिष्कार टाकण्याचे आवाहनही केले आहे. मग तेदुकानदार, भाजीपाला विक्रेते किंवा ऑटो-रिक्षाचालक असोत. त्यांच्या भूमिकेबद्दल खेद व्यक्त करण्याऐवजीसरमा यांनी त्यांच्या विधानांचे वर्णन आसामच्यासांस्कृतिक आणि सभ्यतेच्या ओळखीचे रक्षणकरण्यासाठी "आवश्यक’ असे केले आहे. स्पष्टपणेसरमा अशा विधानांमध्ये निवडणूक क्षमता पाहतात.आज सरमा आणि त्यांच्या कुटुंबावर व्यापक भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. तेव्हा जातीय भाषणबाजी केवळ महत्त्वाच्या मुद्द्यांपासून लक्ष विचलित करत नाही तर समाजाचे ध्रुवीकरण करण्याचे साधन बनते. //"बाहेरील’ लोकांविरुद्धचा राग हा आसामच्या गुंतागुंतीच्या वांशिक परिदृश्याचा एक भाग आहे. राज्याची अंदाजे 38 टक्के मुस्लिम लोकसंख्या असूनही यामुळे लोकसंख्याशास्त्रीय बदल आणि सांस्कृतिक ऱ्हासाची भीती निर्माण करणेसोपे होते. म्हणूनच आसामबाहेर ही बाब द्वेषपूर्ण भाषणमानले जाईल. स्थानिक लोकसंख्येच्या ऐतिहासिक,भाषिक, सांस्कृतिक आणि आर्थिक हक्कांचे रक्षणम्हणून ते भलेही राज्यात सादर केले जात आहे. भाजपनेतृत्व देखील या आक्षेपार्ह व्हिडिओवर मौन बाळगतआहे. "सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’चा नारा असूनही निवडणुकीपूर्वी आसाममध्ये जातीयवातावरण चिघळवून ठेवण्यात राजकीय फायदा दिसूनयेतो. भाजप नेते "घुसखोरांच्या’ कथित धोक्याचाहीवारंवार उल्लेख करतात. वास्तविक आंतरराष्ट्रीयसीमांवर लक्ष ठेवणे ही केंद्रीय दलांची जबाबदारी आहे.सर्वात चिंताजनक गोष्ट म्हणजे बहुसंख्य राजकारणाच्याविजयी मोर्चासमोर स्वयंघोषित "धर्मनिरपेक्ष’ वर्ग देखीलजवळपास शक्तीहीन आणि असहाय्य दिसतो. वरीलव्हिडिओसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाईचीमागणी करण्यासाठी काही नागरिकांनी सर्वोच्चन्यायालयात जनहित याचिका दाखल केल्या आहेत. परंतुव्यापक राजकीय वर्गाने शर्मा यांच्या जातीयवादाचा थेटसामना करण्यास संकोच दाखवला. कारण यामुळे हिंदूमतदार आणखी दुरावू शकतात अशी भीती आहे. एककाळ असा होता जेव्हा काँग्रेससारख्या पक्षांवर मुस्लिमतुष्टीकरणाचा आरोप केला जात होता; आज बहुसंख्यहिंदू मतांसाठी स्पर्धा आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी शर्मायांच्याविरुद्ध हैदराबादमध्ये पोलिस तक्रार दाखल केलीअसेल तर ते हिंदू मतांवर अवलंबून नसल्यामुळे आहे.आणि कदाचित म्हणूनच शर्मा इतक्या मुक्तपणे द्वेषपूर्णभाषण करू शकतात. काँग्रेसचा दीर्घकाळचा नेताभाजपचा पोस्टर बॉय बनणे हे समकालीन राजकारणातीलसंधीसाधू पक्षांतराचे एक दुर्मिळ उदाहरण आहे. 2015 मध्ये आसामच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे दावा केला कीत्यांनी काँग्रेस सोडली. कारण राहुल गांधींनी एका खाजगीबैठकीत त्यांचा //"अपमान’ केला होता. राहुल गांधींनाआसामच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यापेक्षा आपल्या पाळीवकुत्र्याला बिस्किटे खायला घालणे हे जास्त महत्त्वाचेवाटले. सत्य हे आहे की त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षाकाँग्रेसमध्ये पूर्ण झाल्या नाहीत. तेव्हा भाजप त्यांच्यासाठीएक सुरक्षित व अनुकूल पर्याय बनला. भाजपने शर्मायांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते या सत्याचा विसरपडला. मात्र पक्षांतरानंतर त्यांच्यावरील सर्व खटले मागेघेण्यात आले आहेत किंवा त्यांची गती मंदावली आहे.आज 57 वर्षीय शर्मा हे भाजपच्या नवीन पिढीतीलआघाडीचे नेते आहेत. ही पिढी अटलबिहारीवाजपेयी-अडवाणी काळातील भाजप नेते राजकीयशुद्धता, नैतिक संयम किंवा घटनात्मक मूल्यांना बांधीलहोते. ही पिढी मात्र अशा साधनशुचितेला बांधील दिसतनाही. ही पिढी सर्वात जास्त राजकीय सत्ता मिळविण्याच्यातीव्र इच्छेने प्रेरित आहे. म्हणूनच ईशान्येकडील पक्षाचाप्रमुख चेहरा एक कुशल निवडणूक व्यवस्थापक आणिसमस्यानिवारक म्हणून शर्मा यांना एक अमूल्य ‘असेट’मानले जाते. परंतु राजकारणाकडून चांगल्याची अपेक्षाकरणारे नागरिक निःसंशयपणे शर्मा यांच्या वृत्तीमुळेअस्वस्थ होतील. पुनश्च : हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस सोडण्याचानिर्णय जाहीर केला. तेव्हा एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याने पक्षनेतृत्वाला कथितरित्या इशारा दिला होता की "ते भविष्याचेनेते आहेत; आम्हाला त्यांच्यासारख्या नेत्याची उणीवभासेल.’ एक दशकानंतर तो "भविष्याचा चेहरा’ त्यांनाएका अंधकारमय वर्तमानाचा भाग वाटत असेल का? (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) काँग्रेससारख्या पक्षांवर मुस्लिमतुष्टीकरणाचा आरोप केला जात होता.असाही एक काळ होता; परंतु आजभारतीय राजकारणात बहुसंख्यांक हिंदूमतांसाठी स्पर्धा दिसून येते. कदाचितयामुळेच आसामचे मुख्यमंत्री हिमंताबिस्वा सरमा इतके बेधडकपणे वादग्रस्तविधाने करू शकतात हे स्पष्ट होते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- टोमॅटोच्या किमती गगनाला भिडल्या! सामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारचा 'अनुदानित' विक्रीचा मोठा निर्णय
- शेअर बाजाराची दमदार 'यु टर्न' कामगिरी; सेन्सेक्स ७९० अंकांनी वधारला, निफ्टी पुन्हा २४,००० च्या पार!
- जालन्यात खळबळ: दीड वर्षात १५ बांगलादेशी घुसखोर जेरबंद; बनावट ओळखपत्रांचे मोठे रॅकेट उघड!
- इंडिगोची एअरपोर्ट टॅक्सी सेवा सुरू! आता अवघ्या ४९ रुपयांपासून कॅब बुकिंग, प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा
महाराष्ट्र
- शेअर बाजाराची दमदार 'यु टर्न' कामगिरी; सेन्सेक्स ७९० अंकांनी वधारला, निफ्टी पुन्हा २४,००० च्या पार!
- जालन्यात खळबळ: दीड वर्षात १५ बांगलादेशी घुसखोर जेरबंद; बनावट ओळखपत्रांचे मोठे रॅकेट उघड!
- इंडिगोची एअरपोर्ट टॅक्सी सेवा सुरू! आता अवघ्या ४९ रुपयांपासून कॅब बुकिंग, प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा
- अमरावतीत अंगावर काटा आणणारी घटना! सकाळी फिरायला निघालेल्या मुलालाच आढळला वडिलांचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह; ६५ वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या
गुन्हा
- अमरावतीत अंगावर काटा आणणारी घटना! सकाळी फिरायला निघालेल्या मुलालाच आढळला वडिलांचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह; ६५ वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या
- लोहगड किल्ला हत्याकांडाचा धक्कादायक खुलासा! केतन अग्रवालचा मृत्यू 'अपघात' नसून मंगेतर आणि तिच्या प्रियकराने केलेली सुनियोजित हत्या
- मुंबई: लोकलमध्ये प्रवाशावर जीवघेणा हल्ला; दरवाजा बंद करण्याच्या वादातून तरुणावर चाकूने वार!
- गोव्यातील आलिशान सोसायटीतून चालत होते सायबर फ्रॉडचे साम्राज्य; ६.२५ कोटींचे व्यवहार उघड, १२ जणांना बेड्या
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- स्कोडाची दमदार एन्ट्री! एका चार्जवर ६४७ किमी धावणार ७-सीटर लक्झरी इलेक्ट्रिक एसयूव्ही 'पीक' (Peaq) लाँच
- उत्तर प्रदेशात खळबळ! काकी गरोदर राहिली अल्पवयीन पुतण्यामुळे; नात्याला काळीमा फासणाऱ्या प्रकरणामुळे गाव हादरले!
- प्रवाशांसाठी मोठा दिलासा! हायवेवर आता मिळणार गाडी दुरुस्ती आणि पंचरची सुविधा; NHAI चा महत्त्वाचा निर्णय
- टेलिग्रामवरील बंदी अखेर उठली; मात्र 'मेसेज एडिटिंग' फिचर ३० जूनपर्यंत बंदच राहणार
























Subscribe to my channel




