सोशल मीडियाच्या आधीच शंकास्पद नैतिक मानकेअसूनही आसाम भाजपने शेअर केलेला व्हिडिओ एकानवीन नीचांकावर पोहोचला. या वादग्रस्त व्हिडिओमध्ये(तो आता काढून टाकण्यात आला आहे) आसामचेमुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना अगदी जवळून एअररायफलमधून गोळीबार करताना दाखवले होते. त्यांच्यानिशाण्यावर दोन व्यक्ती होते - एक टोपी घातलेला वदुसरा दाढी असलेला. व्हिडिओमध्ये बांगलादेशीघुसखोरांविरुद्ध व आसामी अस्मिता जपण्याच्या बाजूनेनिषेध असल्याचा दावा केला गेला होता. खरे तरव्हिडिओने मांडलेली हिंसक, सांप्रदायिक प्रतिमा स्पष्टपणेद्वेषपूर्ण होती. एका राज्याचा मुख्यमंत्री - राज्यघटनेनेनिवडून आलेले नेते - यांनी उघडपणे एखाद्या समुदायावरबंदूक रोखणे हे घटनात्मक अधिकारांचे गंभीर उल्लंघनआहे. नंतर सरमा यांनी असा दावा केला की त्यांना अशाकोणत्याही व्हिडिओची माहिती नव्हती. परंतु असेस्पष्टीकरण अप्रासंगिक आहे. कारण हा व्हिडिओ आसामभाजपच्या अधिकृत एक्स हँडलवरून शेअर केला होता.तो काढून टाकण्यापूर्वी दहा लाखांहून अधिक वेळापाहिला गेला होता. शिवाय ही एक वेगळी घटना नव्हती.गेल्या काही महिन्यांपासून सरमा "मियां" या शब्दाचा वापरकरून विषारी मोहीम राबवत आहेत. तो आसाममधीलबंगाली भाषिक मुस्लिमांसाठी वापरला जाणाराअपमानजनक शब्द आहे. सरमा यांनी "मियां’ वर आर्थिकबहिष्कार टाकण्याचे आवाहनही केले आहे. मग तेदुकानदार, भाजीपाला विक्रेते किंवा ऑटो-रिक्षाचालक असोत. त्यांच्या भूमिकेबद्दल खेद व्यक्त करण्याऐवजीसरमा यांनी त्यांच्या विधानांचे वर्णन आसामच्यासांस्कृतिक आणि सभ्यतेच्या ओळखीचे रक्षणकरण्यासाठी "आवश्यक’ असे केले आहे. स्पष्टपणेसरमा अशा विधानांमध्ये निवडणूक क्षमता पाहतात.आज सरमा आणि त्यांच्या कुटुंबावर व्यापक भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. तेव्हा जातीय भाषणबाजी केवळ महत्त्वाच्या मुद्द्यांपासून लक्ष विचलित करत नाही तर समाजाचे ध्रुवीकरण करण्याचे साधन बनते. //"बाहेरील’ लोकांविरुद्धचा राग हा आसामच्या गुंतागुंतीच्या वांशिक परिदृश्याचा एक भाग आहे. राज्याची अंदाजे 38 टक्के मुस्लिम लोकसंख्या असूनही यामुळे लोकसंख्याशास्त्रीय बदल आणि सांस्कृतिक ऱ्हासाची भीती निर्माण करणेसोपे होते. म्हणूनच आसामबाहेर ही बाब द्वेषपूर्ण भाषणमानले जाईल. स्थानिक लोकसंख्येच्या ऐतिहासिक,भाषिक, सांस्कृतिक आणि आर्थिक हक्कांचे रक्षणम्हणून ते भलेही राज्यात सादर केले जात आहे. भाजपनेतृत्व देखील या आक्षेपार्ह व्हिडिओवर मौन बाळगतआहे. "सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’चा नारा असूनही निवडणुकीपूर्वी आसाममध्ये जातीयवातावरण चिघळवून ठेवण्यात राजकीय फायदा दिसूनयेतो. भाजप नेते "घुसखोरांच्या’ कथित धोक्याचाहीवारंवार उल्लेख करतात. वास्तविक आंतरराष्ट्रीयसीमांवर लक्ष ठेवणे ही केंद्रीय दलांची जबाबदारी आहे.सर्वात चिंताजनक गोष्ट म्हणजे बहुसंख्य राजकारणाच्याविजयी मोर्चासमोर स्वयंघोषित "धर्मनिरपेक्ष’ वर्ग देखीलजवळपास शक्तीहीन आणि असहाय्य दिसतो. वरीलव्हिडिओसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाईचीमागणी करण्यासाठी काही नागरिकांनी सर्वोच्चन्यायालयात जनहित याचिका दाखल केल्या आहेत. परंतुव्यापक राजकीय वर्गाने शर्मा यांच्या जातीयवादाचा थेटसामना करण्यास संकोच दाखवला. कारण यामुळे हिंदूमतदार आणखी दुरावू शकतात अशी भीती आहे. एककाळ असा होता जेव्हा काँग्रेससारख्या पक्षांवर मुस्लिमतुष्टीकरणाचा आरोप केला जात होता; आज बहुसंख्यहिंदू मतांसाठी स्पर्धा आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी शर्मायांच्याविरुद्ध हैदराबादमध्ये पोलिस तक्रार दाखल केलीअसेल तर ते हिंदू मतांवर अवलंबून नसल्यामुळे आहे.आणि कदाचित म्हणूनच शर्मा इतक्या मुक्तपणे द्वेषपूर्णभाषण करू शकतात. काँग्रेसचा दीर्घकाळचा नेताभाजपचा पोस्टर बॉय बनणे हे समकालीन राजकारणातीलसंधीसाधू पक्षांतराचे एक दुर्मिळ उदाहरण आहे. 2015 मध्ये आसामच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे दावा केला कीत्यांनी काँग्रेस सोडली. कारण राहुल गांधींनी एका खाजगीबैठकीत त्यांचा //"अपमान’ केला होता. राहुल गांधींनाआसामच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यापेक्षा आपल्या पाळीवकुत्र्याला बिस्किटे खायला घालणे हे जास्त महत्त्वाचेवाटले. सत्य हे आहे की त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षाकाँग्रेसमध्ये पूर्ण झाल्या नाहीत. तेव्हा भाजप त्यांच्यासाठीएक सुरक्षित व अनुकूल पर्याय बनला. भाजपने शर्मायांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते या सत्याचा विसरपडला. मात्र पक्षांतरानंतर त्यांच्यावरील सर्व खटले मागेघेण्यात आले आहेत किंवा त्यांची गती मंदावली आहे.आज 57 वर्षीय शर्मा हे भाजपच्या नवीन पिढीतीलआघाडीचे नेते आहेत. ही पिढी अटलबिहारीवाजपेयी-अडवाणी काळातील भाजप नेते राजकीयशुद्धता, नैतिक संयम किंवा घटनात्मक मूल्यांना बांधीलहोते. ही पिढी मात्र अशा साधनशुचितेला बांधील दिसतनाही. ही पिढी सर्वात जास्त राजकीय सत्ता मिळविण्याच्यातीव्र इच्छेने प्रेरित आहे. म्हणूनच ईशान्येकडील पक्षाचाप्रमुख चेहरा एक कुशल निवडणूक व्यवस्थापक आणिसमस्यानिवारक म्हणून शर्मा यांना एक अमूल्य ‘असेट’मानले जाते. परंतु राजकारणाकडून चांगल्याची अपेक्षाकरणारे नागरिक निःसंशयपणे शर्मा यांच्या वृत्तीमुळेअस्वस्थ होतील. पुनश्च : हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस सोडण्याचानिर्णय जाहीर केला. तेव्हा एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याने पक्षनेतृत्वाला कथितरित्या इशारा दिला होता की "ते भविष्याचेनेते आहेत; आम्हाला त्यांच्यासारख्या नेत्याची उणीवभासेल.’ एक दशकानंतर तो "भविष्याचा चेहरा’ त्यांनाएका अंधकारमय वर्तमानाचा भाग वाटत असेल का? (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) काँग्रेससारख्या पक्षांवर मुस्लिमतुष्टीकरणाचा आरोप केला जात होता.असाही एक काळ होता; परंतु आजभारतीय राजकारणात बहुसंख्यांक हिंदूमतांसाठी स्पर्धा दिसून येते. कदाचितयामुळेच आसामचे मुख्यमंत्री हिमंताबिस्वा सरमा इतके बेधडकपणे वादग्रस्तविधाने करू शकतात हे स्पष्ट होते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
महाराष्ट्र
- ठाणे महापालिकेचा अजब कारभार: मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शिकवतायत गुजराती शिक्षक; माजी नगरसेवक अनिल भोर यांनी फोडले भांडं
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- धाराशिव जिल्हा परिषदेत दोन तास काळजाचा ठोका चुकला! लिफ्टमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्याची दोन तासांच्या थरारानंतर सुटका
गुन्हा
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
- छत्रपती संभाजीनगरमध्ये थरार: सासूसमोर सुनेची हत्या करणाऱ्या महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी; आर्थिक वादातून हत्या झाल्याचा संशय
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

सोशल मीडियावरील ओळखीतून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग, धमक्या आणि पळवून नेण्याचा प्रयत्न!
पाषाणमध्ये धमकावून ४० हजारांची लूट, तर बिबवेवाडीत उपाहारगृहातून तब्बल २.३० लाखांची रोकड चोरी!
‘The Bollywood Beat’ बॉक्स ऑफिसचे विक्रम, सुपरस्टार्सचे आणि मोठ्या चित्रपटांच्या धमाकेदार अपडेट्स!
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




