प्रत्येक व्यक्ती समाजाचा घटक आहे. व्यक्ती समाजातच जगत असतो. दोन किंवा अधिक व्यक्तींनी समाज बनतो. समाजाशी फारसा संबंध नसणारे व्यक्ती सुद्धा दिसतात, परंतु ते ही अप्रत्यक्ष रूपाने अथवा उदासीनपणे समाजातच असतात हे मान्य करावेच लागेल. साधारणपणे एका क्षेत्रामध्ये एका भागात राहणाऱ्या अनेक असंख्य अशा लोकांच्या समुदायाला समाज म्हटलं जातं. परंतु ही व्याख्या पुरेशी आहे असे वाटत नाही. समाज म्हणायचं तर लोकांचा परस्पर संबंध असावा लागतो. एका क्षेत्रामध्ये एका गावामध्ये हजारो व्यक्ती राहत असतील परंतु त्यांच्यात परस्पर संबंध नसेल तर त्याला समाज म्हणता येत नाही. याचाच अर्थ एका समुदायातील अनेक व्यक्ती परस्पर सहकार्याच्या सूत्रामध्ये बांधलेले असतील तरच त्यांनी समाज बनतो. केवळ गर्दीला समाज म्हणता येत नसते. परस्पर सहकार्याच्या बंधनात असलेल्या पाच दहा व्यक्तींचा सुद्धा समाज होऊ शकतो. जितका काही स्वार्थ असतो तो आपला स्वतःचा परंतु जेवढे सहकार्य असते ते इतरांसाठी. म्हणून समाजाच्या जडणघडणीमध्ये परस्पर सहकार्य हे सर्वाधिक महत्त्वाचे प्रमुख तत्व बनते. समाजभान (Social Awareness) प्रत्येक व्यक्तीला समस्या असतात परंतु त्यात काही समस्या व्यक्तिगत असतात, तर काही समस्या या समुदायाशी निगडित म्हणजेच सामाजिक असतात. व्यक्तींच्या परस्पर संबंध आणि व्यवहारामुळे काही समस्या समुदायात निर्माण होतात, त्या समस्या प्रत्येक व्यक्तीच्या व्यवहार करण्याचा पद्धती व स्वभावाशी निगडित असतात. म्हणून व्यक्ती समाजात इतरांशी कशा पद्धतीने व्यवहार करतो, कसे वागतो याचा परिणाम सामाजिक समस्यांच्या स्वरूपात उद्भवतो. मानवाला काही अधिकार निसर्गदत्त तर काही अधिकार घटनेने दिलेले असतात. एक मानव म्हणून जगण्यासाठी काही सुविधा गृहीत असतात आणि घटनेने दिलेले अधिकार, हे सगळे म्हणजेच मानवाधिकार यांचे समाजातील कोणाकडून उल्लंघन होत असेल तर या घटकांचा सुद्धा सामाजिक समस्येमध्ये संबंध येतो. काही अधिकार केवळ मात्र आपल्यालाच दिलेले आहेत आणि ते फक्त आपणच वापरून जगावे आणि इतरांच्या त्या अधिकाराबद्दल उदासीन असणे आणि तसा स्वार्थपूर्ण व्यवहार करणे हे साफ चुकीचे आहे. म्हणूनच समाजभान म्हणजे समाजातील समस्या, गरजा, मानवी हक्क आणि आपली सामाजिक जबाबदारी यांची जाण असणे होय. स्वतःच्या स्वार्थापलीकडे जाऊन, सामाजिक आरोग्य राखण्यासाठी, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आणि राष्ट्राच्या हितासाठी जागरूक राहून सक्रिय योगदान देणे म्हणजे समाजभान होय. समाजभान म्हणजे काय :
हे खालील मुद्द्यांवरून अधिक स्पष्ट होते: १: नागरिक कर्तव्य : एक नागरिक म्हणून समाजात जगत असताना प्रत्येक व्यक्ती आपले हक्क जपण्यासाठी धडपडत असतो मात्र समाजाप्रती असलेली कर्तव्ये निष्ठेने पार पाडणे हे देखील महत्त्वाचे असते , ही जाण या ठिकाणी त्याला असावी. २: जागरूकता: समाजात काही परंपरेने आलेल्या अनिष्ट रूढी, अयोग्य प्रथा, कुप्रथा, केवळ स्वार्थ भावनेने, अनैतिक मार्गाने केलेले आर्थिक अर्जन म्हणजे भ्रष्टाचार, आणि अन्य समस्यांवर लक्ष ठेवून त्याविरोधात आवाज उठवणे, ही जागरूकता व्यक्तिमध्ये असायला हवी. ३: सामाजिक समतोल: जातीय, धार्मिक, अनेक प्रकारच्या विषमता, या भिंती झुगारून समाज एकसंध ठेवण्याचा प्रयत्न आपले सामाजिक कर्तव्य समजून करणे. ४: संवेदनशीलता: समाजात सर्वच घटक सबल असतात असे नाही, दुर्बल, पिडीत, दुर्लक्षित लोकांबद्दल मानवीय संवेदना असणे आणि गरजू लोकांच्या वेदनेची जाणीव ठेवून मदतीचा हात देणे. ५: पर्यावरण आणि विकास: आपले सर्व अधिकार घेऊन पृथ्वीवर आणि समाजात जगत असताना आपल्या आजूबाजूच्या नैसर्गिक वातावरणाचा समतोल ठेवणे, हवा, पाणी प्रदूषित न करणे, संतुलित जीवन जगत शाश्वत विकासाचा विचार करणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे हे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. समाजभानाचे महत्त्व:
समाजात वावरताना आपण एकमेकांवर अवलंबून असतो, त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी समाजभान अत्यंत महत्त्वाचे आहे. हे व्यक्तीला निस्वार्थ समाजसेवेकडे प्रवृत्त करते आणि सकारात्मक बदलासाठी प्रेरित करते. आपल्या जगण्याचा दृष्टिकोन केवळ आपणच जगणे हा असताना सुद्धा इतरांचे जगणे देखील महत्त्वाचे आहे आणि त्यांनाही सर्व प्रकारचे नैसर्गिक, जन्मजात, घटनेने दिलेले अधिकार आहेत, पृथ्वीतलावरील केवळ मानवाचेच नव्हे तर सर्व जीवांचे जीवन महत्त्वाचे आहे, ते परस्पर सहकार्याने जगत असतात , सर्व जीव एकमेकावर तेव्हा अस्तित्वाने उपकार करत जगत असतात. मोकळा श्वास घेत जगण्याचा अधिकार सर्वांचाच आहे, या सर्व नैतिक जबाबदारीची जाणीव असणे देखील खूप महत्त्वाचे आहे. (संपर्कः 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
- मुंबई: तुरुंगात माझ्यावर विषप्रयोग झाला असावा का? खासदार संजय राऊतांचा खळबळजनक दावा, राहुल गांधींच्या सल्ल्यानंतर करणार 'टॉक्सिक टेस्ट'!
- मुंबई: जोगेश्वरी-गोरेगाव SRA घरकुल घोटाळा: पात्र लाभार्थ्यांना डावलून अपात्रांना घरे वाटप केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे दोन अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्याचे निर्देश!
महाराष्ट्र
- अमरावती: पेपरफुटीने संतापला युवा वर्ग! अमरावतीत MPSC विरोधात शेकडोंचा 'आक्रोश मोर्चा'; अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी
- पुणे: भीमाशंकरवाडीतील ९६ कुटुंबांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा; राज्य सरकारकडून हिरवा कंदील, प्रत्येकाला मिळणार ५०० चौरस फुटाचा भूखंड
- यवतमाळ: शेवटचा प्रवासही धोकादायक! अंत्यसंस्कारासाठी नाल्याच्या पुलावरून मृतदेह नेण्याची वेळ; प्रशासनाचा अनास्था कारभार चव्हाट्यावर
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!
- चंदीगढ: संगीत जगतातून अत्यंत धक्कादायक बातमी; ३५ वर्षीय प्रसिद्ध पंजाबी गायक बलजीत सिंग याचा राहत्या घरी मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ!
- दिल्ली: राजकारणात मोठा भूकंप होणार? संजय राऊतांचा मोठा दावा, देवेंद्र फडणवीस होऊ शकतात देशाचे नवे 'उपपंतप्रधान'!




























Subscribe to my channel




