प्रत्येक व्यक्ती समाजाचा घटक आहे. व्यक्ती समाजातच जगत असतो. दोन किंवा अधिक व्यक्तींनी समाज बनतो. समाजाशी फारसा संबंध नसणारे व्यक्ती सुद्धा दिसतात, परंतु ते ही अप्रत्यक्ष रूपाने अथवा उदासीनपणे समाजातच असतात हे मान्य करावेच लागेल. साधारणपणे एका क्षेत्रामध्ये एका भागात राहणाऱ्या अनेक असंख्य अशा लोकांच्या समुदायाला समाज म्हटलं जातं. परंतु ही व्याख्या पुरेशी आहे असे वाटत नाही. समाज म्हणायचं तर लोकांचा परस्पर संबंध असावा लागतो. एका क्षेत्रामध्ये एका गावामध्ये हजारो व्यक्ती राहत असतील परंतु त्यांच्यात परस्पर संबंध नसेल तर त्याला समाज म्हणता येत नाही. याचाच अर्थ एका समुदायातील अनेक व्यक्ती परस्पर सहकार्याच्या सूत्रामध्ये बांधलेले असतील तरच त्यांनी समाज बनतो. केवळ गर्दीला समाज म्हणता येत नसते. परस्पर सहकार्याच्या बंधनात असलेल्या पाच दहा व्यक्तींचा सुद्धा समाज होऊ शकतो. जितका काही स्वार्थ असतो तो आपला स्वतःचा परंतु जेवढे सहकार्य असते ते इतरांसाठी. म्हणून समाजाच्या जडणघडणीमध्ये परस्पर सहकार्य हे सर्वाधिक महत्त्वाचे प्रमुख तत्व बनते. समाजभान (Social Awareness) प्रत्येक व्यक्तीला समस्या असतात परंतु त्यात काही समस्या व्यक्तिगत असतात, तर काही समस्या या समुदायाशी निगडित म्हणजेच सामाजिक असतात. व्यक्तींच्या परस्पर संबंध आणि व्यवहारामुळे काही समस्या समुदायात निर्माण होतात, त्या समस्या प्रत्येक व्यक्तीच्या व्यवहार करण्याचा पद्धती व स्वभावाशी निगडित असतात. म्हणून व्यक्ती समाजात इतरांशी कशा पद्धतीने व्यवहार करतो, कसे वागतो याचा परिणाम सामाजिक समस्यांच्या स्वरूपात उद्भवतो. मानवाला काही अधिकार निसर्गदत्त तर काही अधिकार घटनेने दिलेले असतात. एक मानव म्हणून जगण्यासाठी काही सुविधा गृहीत असतात आणि घटनेने दिलेले अधिकार, हे सगळे म्हणजेच मानवाधिकार यांचे समाजातील कोणाकडून उल्लंघन होत असेल तर या घटकांचा सुद्धा सामाजिक समस्येमध्ये संबंध येतो. काही अधिकार केवळ मात्र आपल्यालाच दिलेले आहेत आणि ते फक्त आपणच वापरून जगावे आणि इतरांच्या त्या अधिकाराबद्दल उदासीन असणे आणि तसा स्वार्थपूर्ण व्यवहार करणे हे साफ चुकीचे आहे. म्हणूनच समाजभान म्हणजे समाजातील समस्या, गरजा, मानवी हक्क आणि आपली सामाजिक जबाबदारी यांची जाण असणे होय. स्वतःच्या स्वार्थापलीकडे जाऊन, सामाजिक आरोग्य राखण्यासाठी, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आणि राष्ट्राच्या हितासाठी जागरूक राहून सक्रिय योगदान देणे म्हणजे समाजभान होय. समाजभान म्हणजे काय :
हे खालील मुद्द्यांवरून अधिक स्पष्ट होते: १: नागरिक कर्तव्य : एक नागरिक म्हणून समाजात जगत असताना प्रत्येक व्यक्ती आपले हक्क जपण्यासाठी धडपडत असतो मात्र समाजाप्रती असलेली कर्तव्ये निष्ठेने पार पाडणे हे देखील महत्त्वाचे असते , ही जाण या ठिकाणी त्याला असावी. २: जागरूकता: समाजात काही परंपरेने आलेल्या अनिष्ट रूढी, अयोग्य प्रथा, कुप्रथा, केवळ स्वार्थ भावनेने, अनैतिक मार्गाने केलेले आर्थिक अर्जन म्हणजे भ्रष्टाचार, आणि अन्य समस्यांवर लक्ष ठेवून त्याविरोधात आवाज उठवणे, ही जागरूकता व्यक्तिमध्ये असायला हवी. ३: सामाजिक समतोल: जातीय, धार्मिक, अनेक प्रकारच्या विषमता, या भिंती झुगारून समाज एकसंध ठेवण्याचा प्रयत्न आपले सामाजिक कर्तव्य समजून करणे. ४: संवेदनशीलता: समाजात सर्वच घटक सबल असतात असे नाही, दुर्बल, पिडीत, दुर्लक्षित लोकांबद्दल मानवीय संवेदना असणे आणि गरजू लोकांच्या वेदनेची जाणीव ठेवून मदतीचा हात देणे. ५: पर्यावरण आणि विकास: आपले सर्व अधिकार घेऊन पृथ्वीवर आणि समाजात जगत असताना आपल्या आजूबाजूच्या नैसर्गिक वातावरणाचा समतोल ठेवणे, हवा, पाणी प्रदूषित न करणे, संतुलित जीवन जगत शाश्वत विकासाचा विचार करणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे हे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. समाजभानाचे महत्त्व:
समाजात वावरताना आपण एकमेकांवर अवलंबून असतो, त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी समाजभान अत्यंत महत्त्वाचे आहे. हे व्यक्तीला निस्वार्थ समाजसेवेकडे प्रवृत्त करते आणि सकारात्मक बदलासाठी प्रेरित करते. आपल्या जगण्याचा दृष्टिकोन केवळ आपणच जगणे हा असताना सुद्धा इतरांचे जगणे देखील महत्त्वाचे आहे आणि त्यांनाही सर्व प्रकारचे नैसर्गिक, जन्मजात, घटनेने दिलेले अधिकार आहेत, पृथ्वीतलावरील केवळ मानवाचेच नव्हे तर सर्व जीवांचे जीवन महत्त्वाचे आहे, ते परस्पर सहकार्याने जगत असतात , सर्व जीव एकमेकावर तेव्हा अस्तित्वाने उपकार करत जगत असतात. मोकळा श्वास घेत जगण्याचा अधिकार सर्वांचाच आहे, या सर्व नैतिक जबाबदारीची जाणीव असणे देखील खूप महत्त्वाचे आहे. (संपर्कः 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
महाराष्ट्र
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! अघोरी पूजा आणि मृत्यूची भीती दाखवून 'भोंदू कमलेश'ने राज्यभरातील भाविकांना लुटले; पोलिसांची दोन पथके रवाना!
गुन्हा
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
- रायगड: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेचा जीव घेतला! अलिबागमध्ये ८५ वर्षीय महिलेची हत्या; मृतदेह आंबेनळी घाटात फेकला
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
- अन्न व औषध प्रशासनाचा बीडमध्ये धडाका: तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार भेसळयुक्त पदार्थ आणि गुटखा जप्त
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा

























Subscribe to my channel


