संविधान दुरुस्ती विधेयक फेटाळले गेले आहे. महिला आरक्षणाच्या नावाखाली सरकार पुनर्रचना साध्य करण्याचा प्रयत्न करत असल्याचा विरोधकांचा आरोप होता. मात्र, पुनर्रचनेबाबत कितीही वाद असले तरी, घटनात्मक व व्यावहारिक दोन्ही दृष्टिकोनातून लोकसभा जागांची पुनर्रचना होणे ही काळाची गरज आहे. शेवटची पुनर्रचना 1976 मध्ये झाली होती. त्यावेळी साधारणपणे 10 लाख लोकांमागे एक खासदार या हिशेबाने 55 कोटी लोकसंख्येसाठी 550 खासदार निश्चित करण्यात आले होते. तेव्हाच पुढील 25 वर्षांसाठी म्हणजे 2001 पर्यंत जागांच्या पुनर्रचनेवर बंदी घालण्यात आली होती. 2001 मध्ये अटल बिहारी वाजपेयी सरकारने ही बंदी पुन्हा 25 वर्षांसाठी वाढवली. म्हणजेच आता 2026 मध्ये पुनर्रचनेची गरज आहे. याचा व्यावहारिक पैलू असा की, सध्या सरासरी 26 लाख लोकांमागे एक खासदार येतो. साहजिकच, इतक्या मोठ्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणे जवळपास अशक्य आहे. अडचण अशी आहे की, लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघांची पुनर्रचना केल्यास दक्षिण भारतातील ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणाचे काम चोख बजावले आहे, त्यांची राजकीय ताकद आणि महत्त्व कमी होईल. सरकारने यावर सर्व राज्यांच्या जागा थेट 50 टक्क्यांनी वाढवण्याचा जो मार्ग काढला आहे, त्यानेही समस्येचे निराकरण होत नाही. कारण याचा फायदा मोठ्या राज्यांनाच मिळेल व त्यांचे संख्याबळ आणखी वाढेल. शिवाय, यामुळे आपण स्वीकारलेले लोकशाही प्रतिनिधित्वाचे लोकसंख्याशास्त्रीय तत्त्व बाधित होते. मग मार्ग काय? खरं तर दक्षिण भारताची मूळ तक्रार समजून घेणे गरजेचे आहे. भारताची संघराज्य रचना काही मोजक्या मोठ्या राज्यांच्या पकडीत आहे. उत्तर प्रदेश, प. बंगाल, महाराष्ट्र आणि बिहार ही राज्ये मिळून जवळपास निम्मी लोकसभा बनवतात. इतर राज्यांचे महत्त्व कमी राहते. लोकसंख्येनुसार पुनर्रचना झाली किंवा 50 टक्क्यांच्या प्रमाणात, तरीही शेवटी ताकद यांचीच वाढेल आणि संघराज्य रचनेतील असंतोष कायम राहील. खरे तर भारताला राज्यांच्या पुनर्रचनेची पुन्हा गरज आहे. 1956 मध्ये भाषेच्या आधारावर राज्यांची पुनर्रचना करण्यात आली होती. त्यानंतर नक्कीच अनेक नवीन राज्ये बनली—सिक्कीम जोडले गेले. बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचे विभाजन करून झारखंड, उत्तराखंड आणि छत्तीसगड बनले. आंध्र प्रदेशमधून तेलंगणा वेगळा झाला. जम्मू-काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून घेण्यात आला; पण आता त्याहीपेक्षा मोठ्या बदलांची गरज आहे. जी अतिशय मोठी राज्ये आहेत, त्यांचे एकापेक्षा जास्त भागांत विभाजन केले जाऊ शकते. 2011 मध्ये उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री असताना मायावतींनी उत्तर प्रदेशचे चार भाग करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावानुसार पूर्वांचल, अवध प्रदेश, बुंदेलखंड आणि हरित प्रदेश किंवा पश्चिम प्रदेश बनवले जाणार होते. आज जेव्हा युपीची लोकसंख्या 20 कोटींच्या पार आहे, तेव्हा हे विभाजन त्या राज्याला प्रशासकीय सुलभता देऊ शकते. बिहार, बंगाल, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तामिळनाडूचेही किमान दोन भाग केले जाऊ शकतात. परंतु ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सावधपणे पुनर्रचना करण्याची मागणी करते. अशी पुनर्रचना शक्य झाली तर संघराज्य रचनेवर काही राज्यांच्या वर्चस्वाची तक्रार कमी होईल. ज्याप्रमाणे हिंदी भाषिक एकापेक्षा जास्त राज्ये आहेत, त्याचप्रमाणे मराठी किंवा बांगला बोलणारी एकापेक्षा जास्त राज्ये असू शकतात. हीच गोष्ट तमिळ, कन्नड भाषिक राज्यांबाबतही लागू होऊ शकते. नवीन राज्यांच्या निर्मितीत त्यांच्या सांस्कृतिक जडणघडणीचाही विचार केला पाहिजे. काही राज्यांच्या सीमांमध्ये फेरबदल करता येऊ शकतात. छोटी राज्ये असतील तर विकासाच्या योजना अधिक चांगल्या प्रकारे राबवता येतील. कदाचित ही गोष्ट मोठ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आवडणार नाही. उदाहरणार्थ, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशचे विभाजन मान्य नसेल, कारण यामुळे त्यांची राजकीय ताकद कमी होईल. मात्र, जर आपल्याला भारताची संघराज्य रचना सुदृढ ठेवायची असेल आणि दक्षिण राज्यांची नाराजी दूर करायची असेल, तर आज ना उद्या आपल्याला राज्यांच्या पुनर्रचनेचा विचार करावाच लागेल. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) शेवटची पुनर्रचना 1976 मध्ये झाली होतीआपल्याला भारताची संघराज्य रचना निकोप राहावी, द. भारतातील राज्यांनी सापत्न वागणुकीची तक्रार करू नये असे वाटत असेल, तर उशिरा का होईना आपल्याला राज्यांच्या पुनर्रचनेच्या दिशेने पाऊल उचलावे लागेल. लोकसभा जागांच्या पुनर्रचनेची नितांत गरज आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- महिला T20 विश्वचषक: भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
महाराष्ट्र
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
गुन्हा
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!

























Subscribe to my channel




