पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:कुटुंब संस्थेच्या हितासाठी विवाहाबाबत गंभीर राहा

विवाह संस्थेवर हळूहळू हल्ले वाढत आहेत. भविष्यात कुटुंबाला याची मोठी किंमत मोजावी लागेल. काही सरकारे ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ला कायद्याच्या कक्षेत आणून तिला पाठिंबा देत आहेत. एका छताखाली विवाहाशिवाय स्त्री-पुरुषांनी पती-पत्नीसारखे राहणे, हा कायदेशीर विषय असू शकतो, पण यामुळे विवाह संस्थेची नैतिकता नक्कीच दुखावली जाईल. एक आकडेवारी धक्कादायक आहे की, ॲरेंज मॅरेज 25 % ने घटली आहेत आणि लव्ह मॅरेजचे प्रमाण वाढले आहे. दुसरी आकडेवारी समोर येते की, साखरपुडा व लग्नातील काळ जर 6 महिन्यांपेक्षा जास्त असेल, तर 70 % नातेसंबंध एकतर तुटतात किंवा त्यात दुरावा निर्माण होतो. तरुणांनी एकमेकांच्या आवडीनुसार विवाह करावा, यावर टीका करण्याचे काहीच कारण नाही. माता सीतेने प्रभू रामांना लग्नापूर्वी वाटिकेत पाहिले होते व त्यांना पसंती दिली होती. रुक्मिणीने श्रीकृष्णांना लग्नासाठी निमंत्रण दिले होते, परंतु या घटनांमध्ये विवाह संस्थेचा मान राखला गेला होता, जो आपल्या कुटुंबासाठी अत्यंत आवश्यक आहे.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *