साडेचार दशकांपूर्वी, डोंबिवली ते सीएसएमटी (पूर्वीचे व्हीटी) हा माझा मुंबई लोकल ट्रेनचा प्रवास अनेक वर्षे एखाद्या आध्यात्मिक यात्रेसारखा होता. याचे कारण म्हणजे ट्रेनच्या डब्यात भजन गाणाऱ्या मंडळांची उपस्थिती. माझी आई खास करून काही स्नॅक्स डब्यात बांधून देत असे, जो आम्ही नैवेद्य समजून आधी देवाला अर्पण करायचो आणि मग सर्वांना वाटायचो. यामुळे रोजचा कंटाळवाणा प्रवास एका सुंदर भक्तिमय अनुभवात बदलत असे. हा नैवेद्य केवळ ग्रुपच्या लोकांनाच नाही, तर रोजच्या प्रवाशांना आणि अनोळखी सहप्रवाशांनाही दिला जायचा. लोकही पूर्ण श्रद्धेने तो प्रसाद स्वीकारत. संध्याकाळी हाच ग्रुप पुन्हा एकत्र येऊन घरी परतायचा. परतीच्या प्रवासात कोणी पत्ते खेळायचे, कोणी बुद्धिबळ, तर कोणी अंताक्षरी खेळायचे. काही अविवाहित मुले तर ट्रेनमध्येच भाज्या चिरून घ्यायचे, जेणेकरून घरी गेल्यावर स्वयंपाक करणे सोपे जावे. ग्रुपमधील प्रत्येक माणूस उतरताना आपली जागा दुसऱ्या प्रवाशाला द्यायचा. असे नाही की डब्याचा दरवाजा बंद करण्यावरून कधी वाद होत नसत, विशेषतः पावसाळ्यात, पण जेव्हा अशी बाचाबाची व्हायची, तेव्हा ग्रुपमधील एखादी व्यक्ती मध्यस्थी करून सर्वांना शांत करायची. पुढच्या दहा मिनिटांत दरवाजा बंद करण्याला विरोध करणारे लोकही स्वतः दरवाजा बंद करून ग्रुपसोबत भजन गायला लागायचे. त्या ग्रुपमध्ये एक आनंदी माणूस असायचा, ज्याला सगळे ‘समझोत्याचा बादशाह’ म्हणायचे. या ग्रुपचा मुख्य उद्देश हाच होता की, सर्वजण दिवसभर कष्टाचे काम करत आहेत, त्यामुळे कोणीही मनात नैराश्य घेऊन किंवा मूड खराब करून कार्यालयात किंवा घरी पोहोचावे. मंगळवारी रात्री घडलेली एक भयानक घटना ऐकून मला जुना हा प्रवास आठवला. मुंबईत पावसाची पहिली सर आली होती आणि मयंक लोहार (वय 22 वर्षे) व रोशन सुवर्णा हे दोघे लोकलच्या दरवाजाजवळ उभे होते. सहप्रवाशांनी दरवाजा बंद करण्यास सांगितले. मयंकने ते ऐकले, पण रोशनने नकार दिला. मयंकने जबरदस्तीने दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा नशेत असलेल्या रोशनने रागाच्या भरात बॅगेतून खंजीर काढला आणि मयंकच्या पोटावर व छातीवर वार केले. मयंकचा दवाखान्यात नेताना मृत्यू झाला. त्या फर्स्ट क्लास डब्यात 30 पेक्षा जास्त लोक होते आणि माझे असे मानणे आहे की, कोणालाच ही हिंसा आवडली नसेल. तरीही, कोणाही प्रवाशाने पीडिताची मदत केली नाही किंवा तो हल्ला रोखला नाही. काही लोकांनी पोलिसांना फोन नक्कीच केला, पण बहुतेक लोक मात्र तो हल्ला आणि त्यानंतरचे दृश्य मोबाइलवर चित्रित (व्हिडिओ बनवत) करत राहिले. सोशल मीडियावर आलेले व्हिडिओ याचा पक्का पुरावा आहेत. आपण, असे मानूया की प्रवासी घाबरले होते आणि धक्क्यात होते, पण त्यांना जोरात ओरडण्यापासून कोणी रोखले होते? सर्वांनी मिळून आरडाओरडा केला असता, तर हल्लेखोराचे लक्ष विचलित झाले असते. जर ते सर्वजण एखाद्या भजन मंडळीसारखे किंवा अंताक्षरी खेळणाऱ्या ग्रुपप्रमाणे एकमेकांवर विश्वास ठेवणारे असते, तर रोशन 30 जणांवर भारी पडू शकला नसता. दुर्दैवाने, त्या डब्यातील सर्व लोक पूर्णपणे ‘एकटे’ होते. कदाचित त्यांनी विचार केला असेल की, धोक्यापासून दूर राहून व्हिडिओ बनवणे हाच सुरक्षित मार्ग आहे. अन्यथा, मयंकवर वार केल्यानंतर रोशन धावत्या ट्रेनमधून उतरून पळाला कसा आणि पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वी 15 तास गायब कसा राहिला? मानसशास्त्रीयदृष्ट्या, ट्रेनमधील सर्वजण असा विचार करत राहिले की, कोणीतरी दुसरा माणूस, कदाचित एखादा ताकदवान व्यक्ती मध्ये पडेल आणि याच विचारात सगळे तमाशा बघत राहिले.
फंडा असा आहे की, आपल्याला आपल्या मेंदूला हे सांगावे लागेल की, गर्दीत ‘एकटे’ चालण्यापेक्षा, आपण एक समाज म्हणून राहण्याची आणि सामूहिक भल्याचा विचार करण्याची गरज आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: सुरक्षेचा मोठा प्रश्न! केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अधिकृत ताफ्याला दुचाकीस्वाराने मारला 'कट'; ३२ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: "ओम नमस्ते गणपतये...!" पुण्यात स्त्रीशक्तीचा अभूतपूर्व जागर; श्रीमंत दगडूशेठ बाप्पासमोर तब्बल ३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण!
- मुंबई: कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते...राज ठाकरेंच्या एकाच वाक्यातील सूचक आणि रहस्यमय पोस्टमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ!
- छत्रपती संभाजीनगर: गणरायाच्या स्वागतावेळी मृत्यूने साधला डाव; कंटेनर थेट मिरवणुकीच्या गर्दीत घुसल्याने २ ठार, पाच वर्षांच्या बालकासह १२ जण जखमी!
महाराष्ट्र
- उल्हासनगर: महापालिकेचा अजब कारभार! पावसाळा संपल्यावर विद्यार्थ्यांना मिळणार रेनकोट आणि शालेय साहित्य; पालकांमध्ये संताप!
- पुणे: फर्ग्युसन रोडवर २१ हजार पाणीपुरीच्या पुऱ्यांपासून साकारला तब्बल १३ फूट उंच देखणा गणपती बाप्पा!
- कोल्हापूर: पोलिसांची भन्नाट क्लिष्ट कामगिरी! एका छोट्या 'फोन पे' ट्रान्झॅक्शन आणि कपड्याच्या तुकड्यामुळे लागला तब्बल ५ लाखांच्या चोरीचा छडा!
- सोलापूर: अचानक प्रकृती बिघडून रक्ताची उलटी झाल्याने २५ वर्षीय महिला पोलीस प्रतीक्षा पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी; पांगरीत शोककळा!
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही





























Subscribe to my channel




