साडेचार दशकांपूर्वी, डोंबिवली ते सीएसएमटी (पूर्वीचे व्हीटी) हा माझा मुंबई लोकल ट्रेनचा प्रवास अनेक वर्षे एखाद्या आध्यात्मिक यात्रेसारखा होता. याचे कारण म्हणजे ट्रेनच्या डब्यात भजन गाणाऱ्या मंडळांची उपस्थिती. माझी आई खास करून काही स्नॅक्स डब्यात बांधून देत असे, जो आम्ही नैवेद्य समजून आधी देवाला अर्पण करायचो आणि मग सर्वांना वाटायचो. यामुळे रोजचा कंटाळवाणा प्रवास एका सुंदर भक्तिमय अनुभवात बदलत असे. हा नैवेद्य केवळ ग्रुपच्या लोकांनाच नाही, तर रोजच्या प्रवाशांना आणि अनोळखी सहप्रवाशांनाही दिला जायचा. लोकही पूर्ण श्रद्धेने तो प्रसाद स्वीकारत. संध्याकाळी हाच ग्रुप पुन्हा एकत्र येऊन घरी परतायचा. परतीच्या प्रवासात कोणी पत्ते खेळायचे, कोणी बुद्धिबळ, तर कोणी अंताक्षरी खेळायचे. काही अविवाहित मुले तर ट्रेनमध्येच भाज्या चिरून घ्यायचे, जेणेकरून घरी गेल्यावर स्वयंपाक करणे सोपे जावे. ग्रुपमधील प्रत्येक माणूस उतरताना आपली जागा दुसऱ्या प्रवाशाला द्यायचा. असे नाही की डब्याचा दरवाजा बंद करण्यावरून कधी वाद होत नसत, विशेषतः पावसाळ्यात, पण जेव्हा अशी बाचाबाची व्हायची, तेव्हा ग्रुपमधील एखादी व्यक्ती मध्यस्थी करून सर्वांना शांत करायची. पुढच्या दहा मिनिटांत दरवाजा बंद करण्याला विरोध करणारे लोकही स्वतः दरवाजा बंद करून ग्रुपसोबत भजन गायला लागायचे. त्या ग्रुपमध्ये एक आनंदी माणूस असायचा, ज्याला सगळे ‘समझोत्याचा बादशाह’ म्हणायचे. या ग्रुपचा मुख्य उद्देश हाच होता की, सर्वजण दिवसभर कष्टाचे काम करत आहेत, त्यामुळे कोणीही मनात नैराश्य घेऊन किंवा मूड खराब करून कार्यालयात किंवा घरी पोहोचावे. मंगळवारी रात्री घडलेली एक भयानक घटना ऐकून मला जुना हा प्रवास आठवला. मुंबईत पावसाची पहिली सर आली होती आणि मयंक लोहार (वय 22 वर्षे) व रोशन सुवर्णा हे दोघे लोकलच्या दरवाजाजवळ उभे होते. सहप्रवाशांनी दरवाजा बंद करण्यास सांगितले. मयंकने ते ऐकले, पण रोशनने नकार दिला. मयंकने जबरदस्तीने दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा नशेत असलेल्या रोशनने रागाच्या भरात बॅगेतून खंजीर काढला आणि मयंकच्या पोटावर व छातीवर वार केले. मयंकचा दवाखान्यात नेताना मृत्यू झाला. त्या फर्स्ट क्लास डब्यात 30 पेक्षा जास्त लोक होते आणि माझे असे मानणे आहे की, कोणालाच ही हिंसा आवडली नसेल. तरीही, कोणाही प्रवाशाने पीडिताची मदत केली नाही किंवा तो हल्ला रोखला नाही. काही लोकांनी पोलिसांना फोन नक्कीच केला, पण बहुतेक लोक मात्र तो हल्ला आणि त्यानंतरचे दृश्य मोबाइलवर चित्रित (व्हिडिओ बनवत) करत राहिले. सोशल मीडियावर आलेले व्हिडिओ याचा पक्का पुरावा आहेत. आपण, असे मानूया की प्रवासी घाबरले होते आणि धक्क्यात होते, पण त्यांना जोरात ओरडण्यापासून कोणी रोखले होते? सर्वांनी मिळून आरडाओरडा केला असता, तर हल्लेखोराचे लक्ष विचलित झाले असते. जर ते सर्वजण एखाद्या भजन मंडळीसारखे किंवा अंताक्षरी खेळणाऱ्या ग्रुपप्रमाणे एकमेकांवर विश्वास ठेवणारे असते, तर रोशन 30 जणांवर भारी पडू शकला नसता. दुर्दैवाने, त्या डब्यातील सर्व लोक पूर्णपणे ‘एकटे’ होते. कदाचित त्यांनी विचार केला असेल की, धोक्यापासून दूर राहून व्हिडिओ बनवणे हाच सुरक्षित मार्ग आहे. अन्यथा, मयंकवर वार केल्यानंतर रोशन धावत्या ट्रेनमधून उतरून पळाला कसा आणि पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वी 15 तास गायब कसा राहिला? मानसशास्त्रीयदृष्ट्या, ट्रेनमधील सर्वजण असा विचार करत राहिले की, कोणीतरी दुसरा माणूस, कदाचित एखादा ताकदवान व्यक्ती मध्ये पडेल आणि याच विचारात सगळे तमाशा बघत राहिले.
फंडा असा आहे की, आपल्याला आपल्या मेंदूला हे सांगावे लागेल की, गर्दीत ‘एकटे’ चालण्यापेक्षा, आपण एक समाज म्हणून राहण्याची आणि सामूहिक भल्याचा विचार करण्याची गरज आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- बदलापूर हादरले! अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या; नवऱ्याने 'हार्ट अटॅक'चा रचला बनाव, पण पोस्टमॉर्टम रिपोर्टने उघड सत्य!
- वारंवार UPI पेमेंट केल्याने सिबिल स्कोअर कमी होतो का? जाणून घ्या यामागचं खरं सत्य!
- पुण्यात रंगणार 'इनोव्हेशन महाकुंभ २.०'; एसएनडीटीच्या १११ विद्यार्थिनी मांडणार स्टार्टअपच्या नाविन्यपूर्ण कल्पना
- मंगळवेढ्यात दुष्काळाचे सावट! ३५ हजार हेक्टरवरील खरीप पेरणी खोळंबली; पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजाची चिंता वाढली
महाराष्ट्र
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!
- बदलापूर: अनैतिक संबंधावरून पत्नीची निर्घृण हत्या; नवऱ्याचा 'हार्ट अटॅक'चा बनाव पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उघड!
- बदलापूर हादरले! अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या; नवऱ्याने 'हार्ट अटॅक'चा रचला बनाव, पण पोस्टमॉर्टम रिपोर्टने उघड सत्य!
- वारंवार UPI पेमेंट केल्याने सिबिल स्कोअर कमी होतो का? जाणून घ्या यामागचं खरं सत्य!
गुन्हा
- बदलापूर: अनैतिक संबंधावरून पत्नीची निर्घृण हत्या; नवऱ्याचा 'हार्ट अटॅक'चा बनाव पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उघड!
- प्लाझ्मा विक्रीचा काळा बाजार? ठराविक फार्मा कंपन्यांना चढ्या दराने प्लाझ्मा विक्रीची तक्रार; अन्न व औषध प्रशासनाकडे चौकशीची मागणी.
- पुणे: लोहगड हत्या प्रकरण: चेतन-केतन प्रकरणात नीरज कुमारची एन्ट्री; सिया गोयलशी काय कनेक्शन?
- 'बिडी आणि तंबाखूच्या पुडी'ने उघड केला आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; १५० शेतकऱ्यांची केबल चोरणारे ५ जण गजाआड.
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाचा नियम: पीएनजी कनेक्शन घेतल्यास ३० दिवसांच्या आत एलपीजी कनेक्शन सरेंडर करणे अनिवार्य!
- विराट कोहलीच्या 'One8' शूजची जबरदस्त क्रेझ! २४ तासांत दीड लाख जोड्यांची विक्री; जाणून घ्या किंमत.
- औषधांची विश्वासार्हता तपासणे होणार सोपे! आता सर्व लसी आणि कर्करोगाच्या औषधांवर 'QR कोड' अनिवार्य; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
- अध्यात्मिक पर्यटनाची मोठी झेप! अयोध्या, काशी ते मथुरा-वृंदावन; 'या' धार्मिक शहरांमुळे उत्तर प्रदेश देशात अव्वल

























Subscribe to my channel



