अनेक दिवस झाले! किंबहुना वर्षे उलटून गेली तरी देशाने कोणतेही मोठेआंदोलन पाहिले नव्हते.किमान जेन-अल्फाने तरी असे आंदोलन नक्कीच पाहिलेनव्हते. आता तीच जेन-अल्फा पिढी रस्त्यावर उतरलीआहे!
जेन-झीने जंतर-मंतर आणि रांचीच्या रस्त्यांवरआंदोलनाची मशाल पेटवली, तेव्हापासून जेन-अल्फाच्याअंगातही उत्साह संचारला आहे. 2013 ते 2024 दरम्यानजन्मलेल्या मुलांना ‘जेन-अल्फा'' म्हटले जाते. ही मुळातशाळेत जाणारी लहान-लहान मुले आहेत. यांच्या मागण्याराजकीय नाहीत.सामाजिकही नाहीत. ती फक्त शाळेपर्यंतचा चांगला रस्ता मागत आहेत. किंवावर्गात पंखे आणि बाकांची सोय मागत आहेत. लहान काअसेना, पण ती आंदोलने करत आहेत. तीही अगदी शांततेत आणि सौहार्दाने! नुकत्याच अशा अनेक घटना घडल्या. उत्तर प्रदेशातीलफतेहपूर येथील एका सरकारी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीवीज, पंखे व पाण्याची सोय व्हावी म्हणून निदर्शने केली.यासाठी त्यांनी एआयद्वारे बनवलेल्या पोस्टर्स आणिफलकांचा वापर केला. शेवटी शिक्षण अधिकाऱ्यांना सर्व सुविधा पुरवण्याचे लेखी आश्वासन द्यावे लागले. राजस्थानमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांची कमतरता, शाळेची पडकी इमारत आणि इतर पायाभूत सुविधांसाठी आंदोलन केले. "आम्हाला शिकण्यासाठी चांगली शाळा आणिशिक्षक द्या," अशी त्यांची घोषणा होती. तशाच प्रकारे बिहारमध्येही सरकारी शाळेतील मुलांनी मूलभूत सुविधांसाठी निदर्शने केली. महाराष्ट्रात तर शाळेतील मुलींनी खराब रस्त्याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर टाकला आणि तो व्हायरल केला. जेन-अल्फाने डिजिटल पद्धतीने आपली मागणीमांडण्याचे हे एक उत्तम उदाहरण मानले गेले. सर्वात ताजे प्रकरण उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथील आहे. येथे चंद्रपूरच्या शाळेतील मुले हातात तिरंगा घेऊन पाच किलोमीटर दूर असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली. शाळेपर्यंत पक्का रस्ता तयार करावा, अशीत्यांची मागणी होती. मुलांनी तब्बल पाच तास धरणेआंदोलन केले. काही मुले तर थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातच शिरली होती. या सर्व आंदोलनांचे वैशिष्ट्य म्हणजे, मुलांनी कुठेही राजकीय घोषणाबाजी केली नाही. त्यांनी थेट आपल्या मूलभूत मागण्यांवर लक्ष केंद्रित केलेआणि आपले आंदोलन केवळ तिथेच मर्यादित ठेवले.याचा संदेश अगदी स्पष्ट आहे - यांची लढाई सध्या तरीकोणत्याही केंद्र किंवा राज्य सरकारशी नाही. पण प्रशासनविशेषतः जबाबदार अधिकाऱ्यांनी आता सावध झालेपाहिजे. आता त्यांची मनमानी चालणार नाही.ढिसाळपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही. हे योग्यच आहे! देशातील अनेक राज्यांच्या भागांतआजही सरकारी शाळांची अवस्था अत्यंत वाईट आहे.मुले कधी झाडाखाली बसून शिकण्यास भाग पडत आहेत तर कधीही कोसळू शकणाऱ्या जर्जर इमारतींमध्ये बसत आहेत. जबाबदार अधिकारी या शाळांची पाहणी करायला कधी जात नाहीत आणि त्यांच्या दुरुस्तीकडे लक्षही देत नाहीत. रस्त्यांची अवस्था तर अशी आहे की तिथे रस्ताआहे की खड्डा, हेच समजत नाही! अधिकाऱ्यांच्या भागातील चांगल्या आणि गुळगुळीतरस्त्यांवर दर एक-दोन महिन्यांनी पुन्हा डांबर पडते. मात्र,सर्वसामान्य जनतेच्या भागातील रस्त्यांकडे कोणी ढुंकूनहीपाहत नाही. पण आता हे असे चालणार नाही! जेन-झी नंतर आता जेन-अल्फा आपली ताकददाखवण्यावर ठाम आहे. ती आता कोणाचेही ऐकूनघेण्याच्या मनस्थितीत नाही. याचे कारण स्पष्ट आहे -त्यांची कोणतीही कमजोरी नाही. त्यांना ना इन्कम टॅक्सचीभीती आहे, ना ईडीची. या मुलांचे कोणतेही राजकीयहितसंबंध नाहीत आणि त्यांना कोणत्याही पदाची किंवाखुर्चीचा लोभ नाही. त्यामुळे त्यांच्यात कोणी फूटही पाडूशकत नाही. एका साध्या नोकरीसाठी अनेक वर्षे संघर्षआणि शेवटी निराशा पदरी पाडणाऱ्या या व्यवस्थेत 1990पूर्वी जन्मलेली माणसे जगून गेली. त्यांनी सर्व वेदना सहनकेल्या आणि आपल्या संघर्षमय आयुष्याशी तडजोडकेली. पण जेन-झी आणि जेन-अल्फाकडे तसा संयमनाही. ती सहन करत राहणाऱ्यांपैकी नाहीत! एकंदरीत, ही व्यवस्था सुधारण्याची वेळ आली आहे.अधिकाऱ्यांनी सुधारण्याची हीच वेळ आहे. वेळेत या सर्व गोष्टी सुधारल्या नाहीत, तर जेन-अल्फासर्वांनाच वठणीवर आणेल! ही व्यवस्था सुधारण्याची वेळ1990 पूर्वी जन्मलेल्यांनी सर्व प्रकारचे त्राससहन केले. संघर्षमय आयुष्य स्वीकारले.पण जेन-झी, जेन-अल्फा अन्याय सहनकरत राहणाऱ्यांपैकी नाहीत. ही व्यवस्थासुधारण्याची वेळ आहे. वेळेत सुधारणाझाली नाही, तर जेन-अल्फा सर्वांनावठणीवर आणेल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: "ओव्हरटेकच्या नादात वेगाने आलेल्या टेम्पोने उडवले; शिक्रापूरमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या कामगाराचा जागीच मृत्यू."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
- नागपूर: "इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली काळ; १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अमानवीय अत्याचार; नराधम अटकेत."
- चंद्रपूर: "पप्पा, मला का मारताय?" बापाच्या हल्ल्यातून १२ वर्षांच्या मुलाने स्वतःचा जीव वाचवला;
महाराष्ट्र
- मुंबई: एका ध्येयवेड्या प्रवासाचा दुर्दैवी अंत २४ वर्षीय 'स्टार बायकर' रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमध्ये भीषण अपघातात मृत्यू!
- सिंधुदुर्ग: "पर्यटकांचा धिंगाणा अन् ग्रामस्थ आक्रमक; कुंभवडे धबधब्यावर ३० ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी."
- "देवानं माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती... मनोज जरांगेंना दोन कोटींची डिफेंडर देणारे मालक सुभाष भोसले स्पष्टच बोलले."
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
गुन्हा
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
- नागपूर: "इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली काळ; १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अमानवीय अत्याचार; नराधम अटकेत."
- पुणे: १० वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम झुंबर खोमणे याला जेजुरी पोलिसांकडून बेड्या
- कोल्हापूर: सरनोबतवाडीत खळबळ अनैतिक संबंधांच्या वादातून दिरा कडून वहिनीची हत्या, आरोपी जेरबंद
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: "आरोग्यासाठी मोठा निर्णय! गुटखा, पान मसाल्यावर १ वर्षाची पूर्ण बंदी; उत्पादन अन् साठवणुकीवरही निर्बंध."
- उत्तर प्रदेश: रसमलाईचा वाद अंगलट! धाकट्या भावाकडून दादा-वहिनीवर कात्रीने जीवघेणा हल्ला
- गोवा: डेंग्यूचा हाहाकार अवघ्या १० दिवसांत ७१ रुग्ण, आरोग्य यंत्रणेत खळबळ
- राजस्थान: बायकोपासून पैसे लपवण्यासाठी शेतकऱ्याने शेतात पुरले ५ लाख रुपये; वर्षभरानंतर नोटा वाळवीने खाल्ल्याचे पाहून बसला धक्का!


























Subscribe to my channel




