पावसाळी अधिवेशनात ‘मतदारसंघ पुनर्रचनाविधेयका''वरच मुख्य भर राहणार होता. 20 जुलैला सुरूझालेल्या या अधिवेशनापूर्वी एका गोष्टीची जोरदारचर्चा होती. तृणमूल आणि शिवसेना (उबाठा) मधीलफुटीनंतर सत्ताधारी रालोआ संसदेत दोन-तृतीयांशबहुमताच्या अगदी जवळ पोहोचली आहे. पश्चिमबंगालमधील विजयाने उत्साहात असलेली भाजपमहिला आरक्षण विधेयक व त्याला जोडलेले पुनर्रचनाविधेयक मंजूर करून घेईल, अशी आशा व्यक्त केलीजात होती. हे विधेयक याच वर्षी एप्रिलमध्ये फेटाळलेगेले होते. दुसरीकडे भाजप ‘डी’ (डीलिमिटेशन) याविधेयकाला घाईघाईत मंजूर करून घेऊ इच्छिते, अशीभीती विरोधकांना वाटत होती. मतदार पुनर्रचनेच्या माध्यमातून 2029 मध्ये चौथ्यांदा सत्तेत येण्याचाभाजपचा प्रयत्न असल्याचा संशय त्यांना होता. तृणमूल आणि शिवसेनेतील फुटीनंतर रालोआला लोकसभेत आणखी 26 खासदारांचा पाठिंबा मिळाला. यानंतर भाजपचे रणनीतीकार द्रमुकसोबत गुपचूप चर्चाकरत होते. द्रमुकचे लोकसभेत 22 खासदार आहेत.काँग्रेसने द्रमुकसोबतची युती तोडून टीव्हीकेला पाठिंबा दिल्यानंतर द्रमुक ‘इंडिया'' आघाडीपासून दूर झालाहोता. लोकसभेत 8 खासदार असणारी राष्ट्रवादी (शरदपवार गट) सुद्धा या सुधारित विधेयकाला पाठिंबादेण्याच्या विचारात होती. मात्र विद्यार्थ्यांच्याआंदोलनानंतर हे दोन्ही पक्ष संभ्रमात पडले. आधीविधेयकातील मसुदा पाहू आणि मगच निर्णय घेऊ, असेत्यांनी स्पष्ट केले. या पक्षांनी भूमिका बदलण्याचे कारणसमजून घेणे कठीण नाही. शिक्षण व्यवस्थेतसुधारणांच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्याविद्यार्थ्यांनी राजकीय वातावरणाचा ताबा घेतला आहे.दिल्लीनंतर झारखंडमधील विद्यार्थ्यांनीही लाठीमारआणि पाण्याच्या फवाऱ्यांचा सामना करत विधानसभेवरमोर्चा काढला. बिहारमधील विद्यार्थीही आंदोलनाच्यापवित्र्यात आहेत. प्रयागराजमध्ये राहुल गांधी यांच्या‘छात्रों की गूंज'' कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.उत्तर प्रदेशातील निवडणुका अवघ्या काही महिन्यांवरआल्या असताना सत्ताधारी भाजपसाठी ही चिंतेची बाबआहे. कारण तेथील लोकसंख्येत ‘जेन-झी''चा वाटा 28टक्के आहे. काँग्रेसने आपले सर्व लक्ष गृहमंत्र्यांवरकेंद्रित केले आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.गृहमंत्री सभागृहात येत नसल्याची टीका करत काँग्रेसनेआधी आक्रमक भूमिका घेतली. ‘विद्यार्थ्यांवर लाठीमारआणि पॅलेट गन वापरण्याचा आदेश कोणी दिला?'',यावर गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनीकेली. मात्र, गृहमंत्री निवेदन देण्यास तयार झाले, तेव्हाराहुल गांधी यांनी ‘आम्हाला ते ऐकायचेच नाही'', असेसांगितले. आंदोलकांवर झालेल्या बळप्रयोगामुळेगृहमंत्र्यांची प्रतिमा मलिन झाली आहे, असा अंदाजकाँग्रेसने बांधला असावा. ते सभागृहात न आल्याने तेबचावात्मक भूमिकेत आहेत, हा संदेश अधिक ठळकझाला. हा संदेश असाच कायम राहावा, असे काँग्रेसलावाटत होते. पण भाजपने अधिवेशनाच्या शेवटच्याआठवड्यात‘डी’ या विधेयकाच्या पाठिंब्यासाठी पुन्हाप्रयत्न वेगाने सुरू केले. पंतप्रधानांनी 10 ऑगस्ट रोजीराष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) सर्व 8 खासदारांची भेटघेतली. विरोधकांना शांत करण्यासाठी भाजपनेएफसीआरए विधेयकावर मवाळ भूमिका घेण्याचीतयारी दर्शवली. तसेच हे विधेयक संयुक्त संसदीयसमितीकडे पाठवण्यास संमती दिली. पण आता सरकारमतदारसंघ पुनर्रचनेच्या कायद्यावर विचार करण्यासाठीसंसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचा विचार करतआहे. सुधारित विधेयकातील तपशील अधिकृतपणेजाहीर केलेले नाहीत. पण द्रमुक आणिराष्ट्रवादीसारख्या संभाव्य पाठीराख्यांशी त्यावर चर्चाझाली आहे. यामध्ये सर्व राज्यांतील लोकसभेच्या जागा50 टक्क्यांनी समान प्रमाणात वाढवण्याचा प्रस्ताव आहे.या पक्षांनी याच मागणीवर भर दिला होता. लोकसभेतीलजागा 543 वरून 850 करण्याचा हा प्रस्ताव आहे. यामुळेमहिलांना 33 टक्के जागा देणे शक्य होईल. दिल्लीतील राजकीय वर्तुळात एक चर्चा रंगली आहे.त्यानुसार, मतदानाच्या वेळी द्रमुक सभागृहात गैरहजरराहून अप्रत्यक्षपणे या विधेयकाला पाठिंबा देऊ शकते.भाजप याविषयी झामुमो आणि वायएसआर काँग्रेसशीहीचर्चा करत आहे. तरीही, हे विधेयक विनाअडथळा मंजूरकरून घेण्यासाठी भाजपला खूप प्रयत्न करावे लागतील.
(हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) सरकार संसदेचे विशेष अधिवेशनबोलावण्याचा विचार करत आहे.सुधारित विधेयकात सर्व राज्यांमधीलजागा 50 टक्के वाढवण्याचा प्रस्ताव असूशकतो. यामुळे लोकसभेच्या जागा 543वरून 850 पर्यंत वाढू शकतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: जुन्नर तालुक्यातून खळबळजनक बातमी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला आभाटेक जंगलात, परिसरात उडाली मोठी दहशत व शोककळा
- पुणे: विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात कसूर चालणार नाही; राज्य शिक्षण विभागाकडून शाळांसाठी नियमावली जाहीर, दिले ११ महत्त्वाचे निर्देश
- पुणे: भिंतीवर कशाला, मी माझ्या कपाळावरच नरेंद्र मोदींचा फोटो चिटकवून फिरतो; भाजप-मनसे फोटो राजकारणावर संदीप देशपांडे यांचे जोरदार आव्हान
- पुणे: पंतप्रधान मोदींचे नेतृत्व मान्य नसेल तर पाकिस्तानात जा! मनसे नेते अमित ठाकरेंवर शिंदेसेनेचे नेते सिद्धेश कदम यांची घणाघाती टीका
महाराष्ट्र
- पुणे: जुन्नर तालुक्यातून खळबळजनक बातमी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला आभाटेक जंगलात, परिसरात उडाली मोठी दहशत व शोककळा
- पुणे: विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात कसूर चालणार नाही; राज्य शिक्षण विभागाकडून शाळांसाठी नियमावली जाहीर, दिले ११ महत्त्वाचे निर्देश
- पुणे: भिंतीवर कशाला, मी माझ्या कपाळावरच नरेंद्र मोदींचा फोटो चिटकवून फिरतो; भाजप-मनसे फोटो राजकारणावर संदीप देशपांडे यांचे जोरदार आव्हान
- जालना: मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र पेटला! मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात उद्या जालना, बीड, परभणी आणि लातूर कडकडीत बंद; काय सुरू आणि काय राहणार बंद?
गुन्हा
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड
- उत्तराखंड: पूर आलेली नदी पार करताना हातातून निसटली चिमुकली, लेकीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात मारली उडी अन् दोघींचाही मृत्यू
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला
- पश्चिम बंगाल: ममता बॅनर्जींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर! भाचीचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू; नोकरी गेल्यामुळे आणि घटस्फोटाच्या प्रकरणामुळे होती तणावात


























Subscribe to my channel




