एखाद्या शाळकरी विद्यार्थ्याला विचारा. पीए (पब्लिक ॲड्रेस) प्रणालीवर त्याचे नाव पुकारले जाते आणि त्याला ऑफिसमध्ये बोलावले जाते, तेव्हा त्याला कसे वाटते? त्या काही मिनिटांत त्याच्या हृदयाची धडधड मोजून पाहा. विश्वास ठेवा, गाड्यांचा स्पीडोमीटरही त्याच्या वेगाची बरोबरी करू शकणार नाही. मी शाळेत होतो, तेव्हा पीए प्रणाली नव्हती. शिपाई वर्गाच्या दारात येऊन मोठ्याने सांगायचा, ‘मॅडम, प्रिन्सिपल सर रघूला बोलावत आहेत.’ एवढेच पुरेसे असायचे. संपूर्ण वर्गाने नाव ऐकताच प्रत्येकाचे अंदाज सुरू व्हायचे. पण रघूच्या हृदयाची धडधड कोणत्या वेगाने चालली आहे, याचा विचार कुणीच करत नसे. वेगळे शिक्षक यावर वेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया द्यायचे. कुणी विचारायचे, ‘काय झाले रघू? असे काय केलेस की प्रिन्सिपल सर बोलावतात?’ हे शब्दच हृदयाचे ठोके कोणत्याही मर्यादेपार नेण्यासाठी पुरेसे असायचे. मग आमच्या एक ललिता टीचर होत्या. त्या इतिहास शिकवायच्या. त्या शिपायाला फक्त सांगायच्या, ‘मी त्याला दोन मिनिटांत पाठवते.’ शिपाई गेल्यावर त्या रघूला जवळ बोलवून सांगायच्या, ‘ऑफिसमध्ये जा आणि थोडे खडू घेऊन ये. तिथे तुला कशासाठी बोलावले आहे, हेही विचारून ये.’ हातात एक काम असल्याने हृदयाची धडधड थोडी शांत व्हायची. एखाद्याला वादळाचा सामना करण्यासाठी शांत कसे तयार करायचे, हे मी ललिता टीचरकडून शिकलो. मग एक दिवस आमचे प्रिन्सिपल नागराजन सर स्वतः आमच्या वर्गात आले. आम्ही भीतीपोटी उभे राहिलो. ते शांतपणे वर्गात फिरले. त्यांनी एका मुलाला सोडून सगळ्यांशी गप्पा मारल्या. त्या मुलाचे नाव मी येथे सांगणार नाही. ते त्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, ‘माझ्यासोबत चल’ आणि खांद्यावर हात ठेवूनच त्याला बाहेर घेऊन गेले. वर्गातील सर्वांच्या डोळ्यांत आश्चर्य होते. तो वर्गातील सर्वात हुशार आणि गुणी विद्यार्थ्यांपैकी एक होता. प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये बोलावले जावे, असा तो मुलगा नक्कीच नव्हता. त्याने असे काय केले असेल की प्रिन्सिपल सर स्वतः त्याला न्यायला आले. यावर आम्ही लगेच कुजबुजू लागलो. खूप उशिरा आम्हाला समजले की, अवघ्या 30 मिनिटांपूर्वी त्या मुलाच्या घरातील एका व्यक्तीचे निधन झाले होते. त्याच्या कुटुंबातील एक जण त्याला घरी नेण्यासाठी आला होता. संवेदनशीलतेची जोड असते. तेव्हाच अधिकार किंवा सत्ता तेव्हाच अर्थपूर्ण ठरते. हे मी नागराजन सरांकडून शिकलो. एक पंडित सर होते. ते आम्हाला तमिळ शिकवायचे. ते नेहमी पांढरा शर्ट आणि पॅन्ट घालायचे. पाच वर्षे मी त्यांना पाहिले. या काळात त्यांनी कधीही आपल्या कपड्यांचा रंग बदलला नाही. एक दिवस काही विद्यार्थ्यांनी पंडित सरांना मुख्य रस्त्यावरून चालताना पाहिले. त्यातील एकाने गुपचूप त्यांच्या पाठीवर शाई उडवली आणि तो पसार झाला. प्रत्येक गुन्हेगार आपल्यामागे काही पुरावा सोडतो, तसे एक जण हसला. दोघे पळून गेले आणि उरलेल्यांनी अतिशय संशयास्पद आणि निरागस हसून सरांना नमस्कार केला. दुसऱ्या दिवशी पंडित सरांनी त्यांना आपल्या डेस्कजवळ बोलावले. त्यांनी संपूर्ण वर्गाला सांगितले, ‘काल माझ्या शर्टवर कुणी शाई उडवली, हे मला माहीत आहे. पण मी तुम्हाला तमिळचे महान कवी तिरुवल्लुवर यांचा एक दोहा ऐकवतो.’ त्यांनी समजावून सांगितले की, एखादा माणूस तुमच्याशी वाईट वागतो, त्याच्याशी चांगुलपणाने वागणे हीच त्याच्यासाठी सर्वात मोठी शिक्षा आहे. यामुळे त्याला आपल्या चुकीची जाणीव होते आणि तुम्ही सूडाच्या भावनेतून मुक्त होता. पंडित सरांकडून मी क्षमाशीलतेची ताकद शिकलो.
फंडा असा की- काही शिक्षक हे स्वतःच एक संस्था असतात. या तिन्ही शिक्षकांपैकी आज कुणीही जिवंत नाही. पण इतक्या वर्षांनंतरही त्यांची आठवण काढली जाते, ती केवळ त्यांनी विषय शिकवले म्हणून नाही, तर आपल्या कृतीतून त्यांनी आम्हाला एक चांगला माणूस कसा बनायचे, हे शिकवले म्हणून!
हे पण वाचा-
शहर
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
- पुणे: अभ्यासाचा आणि परीक्षेचा प्रचंड ताण; बारामतीत १६ वर्षीय विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल, शैक्षणिक वर्तुळात मोठी हळहळ!
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
महाराष्ट्र
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- कोल्हापूर: स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय राज्यात कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहणार नाही काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- जालना: माझ्यामधी वळवळ करू नका.. मराठा आरक्षण मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचे छगन भुजबळांवर अत्यंत तिखट शब्दांत हल्लबोल!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: राजकारणात मोठा भूकंप होणार? संजय राऊतांचा मोठा दावा, देवेंद्र फडणवीस होऊ शकतात देशाचे नवे 'उपपंतप्रधान'!
- नवी दिल्ली: 'काॅक्रोच जनता पार्टी'मध्ये उभी फूट! मनीष ब्रह्मभट्ट यांनी 'CJP-डेमोक्रेटिक' पक्षाची केली घोषणा, अरविंद केजरीवाल आणि अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप!
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड


























Subscribe to my channel




