Rajasthan : राजस्थान उच्च न्यायालयाने 75 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या दांपत्याच्या 58 वर्षे जुन्या विवाहबंधनाला तडा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. न्यायमूर्ती सुदेश बंसल आणि न्यायमूर्ती अनिल कुमार उपमन यांच्या खंडपीठाने कुटुंब न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध पतीने दाखल केलेली अपील फेटाळून लावत हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
न्यायालयाने स्पष्ट केले की वैवाहिक जीवनात किरकोळ मतभेद, वाद-विवाद आणि चढ-उतार हे स्वाभाविक असतात. मात्र अशा सामान्य घटनांना ‘क्रूरता’ म्हणून दाखवत घटस्फोटाचा आधार बनवणे योग्य नाही. विशेषतः या वयात घटस्फोट मंजूर केल्यास केवळ पत्नीच नाही तर संपूर्ण कुटुंबावर त्याचा नकारात्मक परिणाम होईल. समाजातील सर्व सदस्यांच्या सन्मान आणि प्रतिष्ठेलाही धक्का पोहोचू शकतो असेही न्यायालयाने नमूद केले.
पतीचा आरोप काय?
सदर दांपत्याचा विवाह 29 जून 1967 रोजी झाला होता. 2013 पर्यंत त्यांनी तब्बल 46 वर्षे कोणतीही तक्रार नोंदवता एकत्र संसार केल्याचे पतीने स्वतः 26 मे २०१४ रोजी दाखल केलेल्या घटस्फोटाच्या याचिकेत मान्य केले होते. न्यायालयाने निरीक्षण केले की इतका दीर्घ कालावधी एकत्र राहिल्यानंतर आणि वाढत्या वयानुसार मानसिक परिपक्वता व सहनशीलता वाढलेली असते. सुरुवातीच्या अडचणी कालांतराने परस्पर समजुतीने सोडवता येतात.
पतीने दावा केला की 2014 मध्ये पत्नीने त्यांच्याविरुद्ध खोटी हुंडाबळीची एफआयआर दाखल केली होती. जी पोलिसांनी चौकशीनंतर खोटी ठरवून बंद केली. त्यामुळे त्यांना सामाजिक अपमान सहन करावा लागला. तसेच पत्नी सर्व स्थावर मालमत्ता फक्त मोठ्या मुलाच्या नावावर करायला इच्छुक असल्याचा आरोप त्यांनी केला. स्वतः मात्र दोन्ही मुलांमध्ये समान वाटणी व्हावी अशी त्यांची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. पत्नी मोठ्या मुलाच्या प्रभावाखाली असून त्यांची काळजी घेत नाही तसेच इतर महिलांशी संबंध असल्याचे खोटे आरोप करते असेही त्यांनी म्हटले.
पत्नीची बाजू
पत्नीने मात्र पतीवर गंभीर आरोप केले. पती कुटुंबीय मालमत्ता विक्री किंवा वाटप करून वाया घालवण्याच्या तयारीत असल्याचे तिने सांगितले. त्यास विरोध केल्यावर पतीने लहान भावाच्या प्रभावाखाली येत घटस्फोटाची याचिका दाखल केली असा दावा तिने केला.
तसेच पतीचे इतर महिलांशी अवैध संबंध असल्याचा आरोपही तिने केला. एका महिलेचा घरात प्रवेश करून तिला खोलीत ठेवण्यात आल्याची घटना घडल्याचेही तिने नमूद केले. संबंधित मालमत्ता स्वतःने खरेदी केलेली असल्यानेच तिला एफआयआर दाखल करावी लागली असेही पत्नीने स्पष्ट केले.
न्यायालयाचे निरीक्षण
उच्च न्यायालयाने नमूद केले की मालमत्तेच्या वादामुळे कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतो. मात्र केवळ त्या कारणावरून इतक्या वयस्क दांपत्याचा विवाह मोडणे योग्य नाही. पोलिसांनी हुंडाबळीची एफआयआर खोटी ठरवली असली तरी घरात इतर महिला असल्याच्या घटनेला पूर्णपणे असत्य ठरवलेले नाही असेही न्यायालयाने निरीक्षणात घेतले.
शहर
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
- पुणे: अभ्यासाचा आणि परीक्षेचा प्रचंड ताण; बारामतीत १६ वर्षीय विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल, शैक्षणिक वर्तुळात मोठी हळहळ!
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
महाराष्ट्र
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- कोल्हापूर: स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय राज्यात कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहणार नाही काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- जालना: माझ्यामधी वळवळ करू नका.. मराठा आरक्षण मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचे छगन भुजबळांवर अत्यंत तिखट शब्दांत हल्लबोल!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: राजकारणात मोठा भूकंप होणार? संजय राऊतांचा मोठा दावा, देवेंद्र फडणवीस होऊ शकतात देशाचे नवे 'उपपंतप्रधान'!
- नवी दिल्ली: 'काॅक्रोच जनता पार्टी'मध्ये उभी फूट! मनीष ब्रह्मभट्ट यांनी 'CJP-डेमोक्रेटिक' पक्षाची केली घोषणा, अरविंद केजरीवाल आणि अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप!
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड


























Subscribe to my channel




