5 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

जेव्हा सर्वोच्च न्यायालय आपल्याच निर्णयांना वारंवारबदलते तेव्हा तो सार्वजनिक चिंतेचा विषय बनतो. २०२५मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपले आठ निर्णय फिरवले.अनेक आदेश तर दिल्यानंतर काही आठवड्यांतचबदलले गेले. सर्वोच्च न्यायालयाने भूतकाळात आपल्यानिर्णयात बदल किंवा सुधारणा केली नाही असे नाही,परंतु असे सहसा तेव्हाच घडले होते, जेव्हा एखाद्यापक्षाने प्रकरणाच्या पुनरावलोकनासाठी मोठ्याखंडपीठाकडे दाद मागितली होती. मात्र, अलीकडीलघडामोडी वेगळ्या आहेत. कारण हे निर्णयन्यायालयाच्या आतूनच फिरवले गेले. दुसऱ्या शब्दांत,सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेऊन ही प्रकरणेइतर खंडपीठांकडे पाठवली, ज्यांनी पहिल्या खंडपीठाचा निर्णय बदलला. विधिज्ञांच्या मते, सर्वोच्च न्यायालयातअसे पहिल्यांदाच घडत आहे. ही पद्धत सुरू राहिली तरती न्यायशास्त्राच्या भविष्यासाठी चिंताजनक आहे.कारण यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांची वैधता कमकुवत होईल. ज्या विषयांवरील निर्णय मागे घेण्यात आले त्यामध्ये न्यायालयीन शिस्तीपासून ते पर्यावरणाचे विषय, कॉर्पोरेट मुद्दे आणि भटक्या कुत्र्यांच्याप्रकरणांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे बदलण्यातआलेल्या आठ निर्णयांपैकी तीन निर्णय न्यायमूर्ती जे. बी.पारडीवाला यांच्या खंडपीठाने दिले होते, जे भविष्यातभारताचे सरन्यायाधीश होणार आहेत. हे देखील रंजकआहे की, हे निर्णय बदलण्याची सुरुवात निवृत्त न्यायमूर्तीबी.आर. गवई यांच्या कार्यकाळात झाली. विद्यमानसरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या कार्यकाळातही हासिलसिला सुरू आहे. अरावली खाणकामाशी संबंधितनिर्णयाचा उलटफेर सर्वात धक्कादायक होता.
तत्कालीन सरन्यायाधीश गवई यांच्या अध्यक्षतेखालीलखंडपीठाने २० नोव्हेंबर रोजी खाणकामाच्यानियमनासाठी सरकारी समितीने सुचवलेली उंचीसंबंधीव्याख्या मान्य केली होती. पर्यावरणवादी आणिसामाजिक कार्यकर्त्यांच्या विरोधानंतर सरन्यायाधीशसूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने त्यानिर्णयाला स्थगिती दिली आणि या मुद्द्याच्यापुनर्मूल्यांकनासाठी विषयतज्ज्ञांची एक नवीन समितीस्थापन केली. नवीन आदेशात म्हटले आहे की,‘जनभावना’ लक्षात घेऊन आधीच्या निर्णयाचेपुनरावलोकन केले जात आहे. सार्वजनिक विरोधाच्याप्रतिसादात न्यायालयीन पुनरावलोकनाचे पाऊलस्वागतार्ह असले तरी यामुळे आधीचा निर्णय कशाप्रकारे घेतला गेला होता यावर प्रश्नचिन्ह उभे राहते.दिल्ली आणि हरियाणाची फुप्फुसे मानल्या जाणाऱ्याअरावली टेकड्यांसाठी सरकारी समितीचीउंची-आधारित व्याख्या स्वीकारण्यापूर्वी मागीलखंडपीठाने पुरेसा विचार केला नव्हता का? की हीस्थगिती केवळ लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न होता?
आधीचे निर्णय फिरवण्याच्या वेळेमुळे (टायमिंग) हे गूढअधिकच वाढले आहे. अरावलीतील खाणकामालाहिरवा कंदील दाखवणारा पहिला निर्णय तत्कालीनसरन्यायाधीश गवई यांच्या निवृत्तीच्या अवघ्या तीनदिवस आधी, २० नोव्हेंबर रोजी आला. त्यानंतर पाचआठवड्यांनी २९ डिसेंबर रोजी हा निर्णय फिरवण्यातआला. हिवाळी सुट्टीच्या काळात सरन्यायाधीश सूर्यकांतयांनी यासाठी एक विशेष खंडपीठ स्थापन केले.न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती ए. जी. मसीहयांच्या खंडपीठाने निर्णय मागे घेण्याच्या या नवीनपद्धतीतील धोक्यांबाबत इशारा दिला होता. हा इशाराअरावलीचा निर्णय बदलण्याच्या अगदी आधी आलाहोता. स्पष्ट आहे की, त्यांच्या सावधगिरीच्याबोलण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. दोन्ही न्यायाधीशांनीम्हटले होते की, ‘एखाद्या कायदेशीर विषयावरखंडपीठाने दिलेल्या निर्णयामुळे वाद संपला पाहिजे.कारण तो अंतिम असतो... केवळ नंतर एखादा दुसरादृष्टिकोन अधिक चांगला वाटतो म्हणून एखादा निकालपुन्हा उघडला गेला तर कलम १४१ लागू करण्याचाउद्देशच अपयशी ठरेल... यामुळे न्यायालयाचा अधिकारआणि निकालांचे मूल्य कमकुवत होईल.’ सर्वोच्च न्यायालय सध्या सरकारी दबाव, जनहित आणिसंविधान यांच्यातील एका संतुलित रेषेवर चालत आहे. ( ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत. )

न्यायालयांकडून, विशेषतः सर्वोच्चन्यायालयाकडून अशी अपेक्षा केली जातेकी, कोणताही आदेश देण्यापूर्वी त्यांनीसर्व कायदेशीर पैलूंचा गांभीर्याने विचारकरावा. एकदा आदेश दिला की तोसर्वमान्य असला पाहिजे.

This post was originally published on this site.
शहर
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
- दौंडमध्ये हॉटेल ओएसिसमध्ये राडा! सहजापूर फाट्यावर तुफान हाणामारी; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद
महाराष्ट्र
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- सांगलीत काळाचा घाला! जत तालुक्यात भिंत कोसळून ६ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू; मुसळधार पावसाने घातला धुमाकूळ
- मुंब्र्यात खळबळ! ठाणे महापालिकेच्या महिला डॉक्टरची सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
गुन्हा
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
राजकीय
- राजकारणात असूनही चिमुरड्यांना न्याय देता येत नसेल, तर आपण फसलो आहोत; आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका
- भाजपला देशभर आग लावून निवडणुका जिंकायच्या आहेत; खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
- सुनेत्रा पवारांची 'दिल्ली वारी'; राज्यसभा सदस्यत्वाचा आज राजीनामा? बारामती विजयानंतर सक्रिय राजकारणात मोठ्या निर्णयाची शक्यता
- राजकीय संघर्षात 'सॉफ्ट पॉवर'चा गेम; मुख्यमंत्री शिंदेंच्या अनपेक्षित भेटीनंतर ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस
इतर
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
मनोरंजन
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
- दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ! गायिका सुचित्राचे त्रिशा कृष्णनवर गंभीर आरोप; थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी वेधलं लक्ष!
- प्रभासच्या 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर शोककळा; भीषण अपघातात क्रू मेंबरचा मृत्यू, शूटिंग तात्पुरते स्थगित!
- बॉक्स ऑफिस धमाका: रितेशच्या 'राजा शिवाजी'ची विक्रमी घोडदौड; अक्षय कुमारचा 'भूत बंगला' २०० कोटींच्या पार
देश विदेश
- वेटर ते थेट राष्ट्राध्यक्ष! संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचा थक्क करणारा जीवनप्रवास!
- हंताव्हायरसचा धोका! क्रूझवरील ३ जणांच्या मृत्यूनंतर भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; आता पुढे काय?
- वय ७४ वर्षे आणि ७२ देशांची एकट्याने सफर! ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा जगप्रवासाचा प्रेरणादायी थरार
- अमेरिकेचा इराणला अंतिम इशारा! 'होर्मुझची सामुद्रधुनी उघडा, अन्यथा बॉम्बहल्ल्यांना तयार राहा'; ट्रम्प यांची थेट धमकी!






















Subscribe to my channel




