5 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

जेव्हा सर्वोच्च न्यायालय आपल्याच निर्णयांना वारंवारबदलते तेव्हा तो सार्वजनिक चिंतेचा विषय बनतो. २०२५मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपले आठ निर्णय फिरवले.अनेक आदेश तर दिल्यानंतर काही आठवड्यांतचबदलले गेले. सर्वोच्च न्यायालयाने भूतकाळात आपल्यानिर्णयात बदल किंवा सुधारणा केली नाही असे नाही,परंतु असे सहसा तेव्हाच घडले होते, जेव्हा एखाद्यापक्षाने प्रकरणाच्या पुनरावलोकनासाठी मोठ्याखंडपीठाकडे दाद मागितली होती. मात्र, अलीकडीलघडामोडी वेगळ्या आहेत. कारण हे निर्णयन्यायालयाच्या आतूनच फिरवले गेले. दुसऱ्या शब्दांत,सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेऊन ही प्रकरणेइतर खंडपीठांकडे पाठवली, ज्यांनी पहिल्या खंडपीठाचा निर्णय बदलला. विधिज्ञांच्या मते, सर्वोच्च न्यायालयातअसे पहिल्यांदाच घडत आहे. ही पद्धत सुरू राहिली तरती न्यायशास्त्राच्या भविष्यासाठी चिंताजनक आहे.कारण यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांची वैधता कमकुवत होईल. ज्या विषयांवरील निर्णय मागे घेण्यात आले त्यामध्ये न्यायालयीन शिस्तीपासून ते पर्यावरणाचे विषय, कॉर्पोरेट मुद्दे आणि भटक्या कुत्र्यांच्याप्रकरणांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे बदलण्यातआलेल्या आठ निर्णयांपैकी तीन निर्णय न्यायमूर्ती जे. बी.पारडीवाला यांच्या खंडपीठाने दिले होते, जे भविष्यातभारताचे सरन्यायाधीश होणार आहेत. हे देखील रंजकआहे की, हे निर्णय बदलण्याची सुरुवात निवृत्त न्यायमूर्तीबी.आर. गवई यांच्या कार्यकाळात झाली. विद्यमानसरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या कार्यकाळातही हासिलसिला सुरू आहे. अरावली खाणकामाशी संबंधितनिर्णयाचा उलटफेर सर्वात धक्कादायक होता.
तत्कालीन सरन्यायाधीश गवई यांच्या अध्यक्षतेखालीलखंडपीठाने २० नोव्हेंबर रोजी खाणकामाच्यानियमनासाठी सरकारी समितीने सुचवलेली उंचीसंबंधीव्याख्या मान्य केली होती. पर्यावरणवादी आणिसामाजिक कार्यकर्त्यांच्या विरोधानंतर सरन्यायाधीशसूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने त्यानिर्णयाला स्थगिती दिली आणि या मुद्द्याच्यापुनर्मूल्यांकनासाठी विषयतज्ज्ञांची एक नवीन समितीस्थापन केली. नवीन आदेशात म्हटले आहे की,‘जनभावना’ लक्षात घेऊन आधीच्या निर्णयाचेपुनरावलोकन केले जात आहे. सार्वजनिक विरोधाच्याप्रतिसादात न्यायालयीन पुनरावलोकनाचे पाऊलस्वागतार्ह असले तरी यामुळे आधीचा निर्णय कशाप्रकारे घेतला गेला होता यावर प्रश्नचिन्ह उभे राहते.दिल्ली आणि हरियाणाची फुप्फुसे मानल्या जाणाऱ्याअरावली टेकड्यांसाठी सरकारी समितीचीउंची-आधारित व्याख्या स्वीकारण्यापूर्वी मागीलखंडपीठाने पुरेसा विचार केला नव्हता का? की हीस्थगिती केवळ लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न होता?
आधीचे निर्णय फिरवण्याच्या वेळेमुळे (टायमिंग) हे गूढअधिकच वाढले आहे. अरावलीतील खाणकामालाहिरवा कंदील दाखवणारा पहिला निर्णय तत्कालीनसरन्यायाधीश गवई यांच्या निवृत्तीच्या अवघ्या तीनदिवस आधी, २० नोव्हेंबर रोजी आला. त्यानंतर पाचआठवड्यांनी २९ डिसेंबर रोजी हा निर्णय फिरवण्यातआला. हिवाळी सुट्टीच्या काळात सरन्यायाधीश सूर्यकांतयांनी यासाठी एक विशेष खंडपीठ स्थापन केले.न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती ए. जी. मसीहयांच्या खंडपीठाने निर्णय मागे घेण्याच्या या नवीनपद्धतीतील धोक्यांबाबत इशारा दिला होता. हा इशाराअरावलीचा निर्णय बदलण्याच्या अगदी आधी आलाहोता. स्पष्ट आहे की, त्यांच्या सावधगिरीच्याबोलण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. दोन्ही न्यायाधीशांनीम्हटले होते की, ‘एखाद्या कायदेशीर विषयावरखंडपीठाने दिलेल्या निर्णयामुळे वाद संपला पाहिजे.कारण तो अंतिम असतो... केवळ नंतर एखादा दुसरादृष्टिकोन अधिक चांगला वाटतो म्हणून एखादा निकालपुन्हा उघडला गेला तर कलम १४१ लागू करण्याचाउद्देशच अपयशी ठरेल... यामुळे न्यायालयाचा अधिकारआणि निकालांचे मूल्य कमकुवत होईल.’ सर्वोच्च न्यायालय सध्या सरकारी दबाव, जनहित आणिसंविधान यांच्यातील एका संतुलित रेषेवर चालत आहे. ( ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत. )

न्यायालयांकडून, विशेषतः सर्वोच्चन्यायालयाकडून अशी अपेक्षा केली जातेकी, कोणताही आदेश देण्यापूर्वी त्यांनीसर्व कायदेशीर पैलूंचा गांभीर्याने विचारकरावा. एकदा आदेश दिला की तोसर्वमान्य असला पाहिजे.

This post was originally published on this site.
शहर
- सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार! कच्च्या तेलाच्या दरात ७ टक्क्यांची प्रचंड उसळी; महाराष्ट्र व देशभरात पेट्रोल-डिझेल आणि CNG चे नवे दर जाहीर!
- मान्सूनची पाऊले वेगवान! गोवा, कर्नाटक, केरळ किनारपट्टीवर ढगांची दाटी; मुंबईसह उपनगरांत पावसाची दमदार हजेरी!
- पुणे नसरापूर चिमुकली हत्या प्रकरण: तीन लहान मुलांची न्यायालयात महत्त्वाची साक्ष; आरोपीच्या कृत्याचा केला पर्दाफाश
- धक्कादायक! स्वतःला 'RAW' अधिकारी सांगून तरुणीशी थाटला संसार; लग्नानंतर सत्य समोर येताच पायाखालची जमीन सरकली!
महाराष्ट्र
- अमरावतीत औद्योगिक प्रदूषणाचा मोठा स्फोट! नांदगावपेठच्या जमिनीत सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड घातक पातळीवर; निरी (NEERI) च्या अहवालानंतर भूसंपादनाचे आदेश!
- मुंबई-गोवा महामार्ग: ३१ मे ची डेडलाईन उलटूनही काम अपूर्णच; प्रवाशांची गैरसोय कायम!
- सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार! कच्च्या तेलाच्या दरात ७ टक्क्यांची प्रचंड उसळी; महाराष्ट्र व देशभरात पेट्रोल-डिझेल आणि CNG चे नवे दर जाहीर!
- मान्सूनची पाऊले वेगवान! गोवा, कर्नाटक, केरळ किनारपट्टीवर ढगांची दाटी; मुंबईसह उपनगरांत पावसाची दमदार हजेरी!
गुन्हा
- धक्कादायक! स्वतःला 'RAW' अधिकारी सांगून तरुणीशी थाटला संसार; लग्नानंतर सत्य समोर येताच पायाखालची जमीन सरकली!
- बीडमध्ये वाल्मिक कराड गँगची दहशत कायम! जुगार अड्ड्याला विरोध केल्याने महिलेला अमानुष मारहाण; मुलांनाही उचलून फेकले. create landscape image no text on image no colllage image
- नवी मुंबईत अमानवीय घटना! आई-वडिलांना मारहाण करून घराबाहेर काढणाऱ्या मुलावर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका.
- अहिल्यानगरात गुन्हेगारी टोळीचा थरार! कॉन्ट्रॅक्ट नाकारल्याचा राग, कंपनीच्या एचआर हेडवर मारहाण करत लुटमार.
राजकीय
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
- "महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: महायुतीची उमेदवारांची यादी निश्चित; शिंदे आणि अजित पवार गटाकडून नावांची घोषणा!"
इतर
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
मनोरंजन
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
देश विदेश
- डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबतचा मोठा बदल; भारताला याचा फायदा होणार की फटका?
- लग्नाच्या काही तासांतच काळाचा घाला! भारतीय वंशाच्या पायलटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; नववधू ६ तास ढिगाऱ्याखाली अडकून
- इराकजवळ मालवाहू जहाजावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला, इराणने स्वीकारली जबाबदारी; आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ
- अमेरिका-इराण पुन्हा आमने-सामने! अमेरिकेचे इराणच्या लष्करी तळांवर पुन्हा बॉम्बहल्ले; गेरुक शहर व केशम बेट ठरले लक्ष्य

























Subscribe to my channel




