5 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

जेव्हा सर्वोच्च न्यायालय आपल्याच निर्णयांना वारंवारबदलते तेव्हा तो सार्वजनिक चिंतेचा विषय बनतो. २०२५मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपले आठ निर्णय फिरवले.अनेक आदेश तर दिल्यानंतर काही आठवड्यांतचबदलले गेले. सर्वोच्च न्यायालयाने भूतकाळात आपल्यानिर्णयात बदल किंवा सुधारणा केली नाही असे नाही,परंतु असे सहसा तेव्हाच घडले होते, जेव्हा एखाद्यापक्षाने प्रकरणाच्या पुनरावलोकनासाठी मोठ्याखंडपीठाकडे दाद मागितली होती. मात्र, अलीकडीलघडामोडी वेगळ्या आहेत. कारण हे निर्णयन्यायालयाच्या आतूनच फिरवले गेले. दुसऱ्या शब्दांत,सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेऊन ही प्रकरणेइतर खंडपीठांकडे पाठवली, ज्यांनी पहिल्या खंडपीठाचा निर्णय बदलला. विधिज्ञांच्या मते, सर्वोच्च न्यायालयातअसे पहिल्यांदाच घडत आहे. ही पद्धत सुरू राहिली तरती न्यायशास्त्राच्या भविष्यासाठी चिंताजनक आहे.कारण यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांची वैधता कमकुवत होईल. ज्या विषयांवरील निर्णय मागे घेण्यात आले त्यामध्ये न्यायालयीन शिस्तीपासून ते पर्यावरणाचे विषय, कॉर्पोरेट मुद्दे आणि भटक्या कुत्र्यांच्याप्रकरणांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे बदलण्यातआलेल्या आठ निर्णयांपैकी तीन निर्णय न्यायमूर्ती जे. बी.पारडीवाला यांच्या खंडपीठाने दिले होते, जे भविष्यातभारताचे सरन्यायाधीश होणार आहेत. हे देखील रंजकआहे की, हे निर्णय बदलण्याची सुरुवात निवृत्त न्यायमूर्तीबी.आर. गवई यांच्या कार्यकाळात झाली. विद्यमानसरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या कार्यकाळातही हासिलसिला सुरू आहे. अरावली खाणकामाशी संबंधितनिर्णयाचा उलटफेर सर्वात धक्कादायक होता.
तत्कालीन सरन्यायाधीश गवई यांच्या अध्यक्षतेखालीलखंडपीठाने २० नोव्हेंबर रोजी खाणकामाच्यानियमनासाठी सरकारी समितीने सुचवलेली उंचीसंबंधीव्याख्या मान्य केली होती. पर्यावरणवादी आणिसामाजिक कार्यकर्त्यांच्या विरोधानंतर सरन्यायाधीशसूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने त्यानिर्णयाला स्थगिती दिली आणि या मुद्द्याच्यापुनर्मूल्यांकनासाठी विषयतज्ज्ञांची एक नवीन समितीस्थापन केली. नवीन आदेशात म्हटले आहे की,‘जनभावना’ लक्षात घेऊन आधीच्या निर्णयाचेपुनरावलोकन केले जात आहे. सार्वजनिक विरोधाच्याप्रतिसादात न्यायालयीन पुनरावलोकनाचे पाऊलस्वागतार्ह असले तरी यामुळे आधीचा निर्णय कशाप्रकारे घेतला गेला होता यावर प्रश्नचिन्ह उभे राहते.दिल्ली आणि हरियाणाची फुप्फुसे मानल्या जाणाऱ्याअरावली टेकड्यांसाठी सरकारी समितीचीउंची-आधारित व्याख्या स्वीकारण्यापूर्वी मागीलखंडपीठाने पुरेसा विचार केला नव्हता का? की हीस्थगिती केवळ लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न होता?
आधीचे निर्णय फिरवण्याच्या वेळेमुळे (टायमिंग) हे गूढअधिकच वाढले आहे. अरावलीतील खाणकामालाहिरवा कंदील दाखवणारा पहिला निर्णय तत्कालीनसरन्यायाधीश गवई यांच्या निवृत्तीच्या अवघ्या तीनदिवस आधी, २० नोव्हेंबर रोजी आला. त्यानंतर पाचआठवड्यांनी २९ डिसेंबर रोजी हा निर्णय फिरवण्यातआला. हिवाळी सुट्टीच्या काळात सरन्यायाधीश सूर्यकांतयांनी यासाठी एक विशेष खंडपीठ स्थापन केले.न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती ए. जी. मसीहयांच्या खंडपीठाने निर्णय मागे घेण्याच्या या नवीनपद्धतीतील धोक्यांबाबत इशारा दिला होता. हा इशाराअरावलीचा निर्णय बदलण्याच्या अगदी आधी आलाहोता. स्पष्ट आहे की, त्यांच्या सावधगिरीच्याबोलण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. दोन्ही न्यायाधीशांनीम्हटले होते की, ‘एखाद्या कायदेशीर विषयावरखंडपीठाने दिलेल्या निर्णयामुळे वाद संपला पाहिजे.कारण तो अंतिम असतो... केवळ नंतर एखादा दुसरादृष्टिकोन अधिक चांगला वाटतो म्हणून एखादा निकालपुन्हा उघडला गेला तर कलम १४१ लागू करण्याचाउद्देशच अपयशी ठरेल... यामुळे न्यायालयाचा अधिकारआणि निकालांचे मूल्य कमकुवत होईल.’ सर्वोच्च न्यायालय सध्या सरकारी दबाव, जनहित आणिसंविधान यांच्यातील एका संतुलित रेषेवर चालत आहे. ( ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत. )

न्यायालयांकडून, विशेषतः सर्वोच्चन्यायालयाकडून अशी अपेक्षा केली जातेकी, कोणताही आदेश देण्यापूर्वी त्यांनीसर्व कायदेशीर पैलूंचा गांभीर्याने विचारकरावा. एकदा आदेश दिला की तोसर्वमान्य असला पाहिजे.

This post was originally published on this site.
शहर
- जुलैमध्ये पावसाची दडी! महाराष्ट्रात पाऊस का गायब झाला आणि उकाडा का वाढला? हवामान विभागाचा मोठा खुलासा
- नागपूर: 'स्वयम्' योजनेचा मोठा दिलासा! आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट २०० कोटी; शिक्षणाला मिळाले नवे बळ
- अमरावती: उत्पन्न दाखल्यांसाठी नागरिकांची दमछाक; सेतू केंद्रांचा सर्व्हर डाऊन आणि तलाठ्यांच्या अनुपस्थितीमुळे कामांचा खोळंबा
- हिंगोली: जनावरे घरी परतली, पण दोन जिवलग मित्र कायमचे हरवले, कायाधू नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू
महाराष्ट्र
- जुलैमध्ये पावसाची दडी! महाराष्ट्रात पाऊस का गायब झाला आणि उकाडा का वाढला? हवामान विभागाचा मोठा खुलासा
- नागपूर: 'स्वयम्' योजनेचा मोठा दिलासा! आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट २०० कोटी; शिक्षणाला मिळाले नवे बळ
- अमरावती: उत्पन्न दाखल्यांसाठी नागरिकांची दमछाक; सेतू केंद्रांचा सर्व्हर डाऊन आणि तलाठ्यांच्या अनुपस्थितीमुळे कामांचा खोळंबा
- हिंगोली: जनावरे घरी परतली, पण दोन जिवलग मित्र कायमचे हरवले, कायाधू नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू
गुन्हा
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ई-२० (E20) पेट्रोलबाबत केंद्र सरकारची झोप उडवणारा सर्व्हे; मायलेजमधील घट आणि इंजिन खराब होण्याच्या भीतीने जनता चिंतेत, एनडीए समर्थकही विरोधात
- हरमुझ सामुद्रधुनीत इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; भारतीय नाविक ठार, भारताने इराणच्या राजदूताला बजावले समन्स
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! आसाममधील २७ जणांना 'परदेशी' ठरवणारे उच्च न्यायालयाचे निर्णय रद्द; नागरिकत्वाचा निर्णय निष्पक्ष प्रक्रियेने घेण्याचे आदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

























Subscribe to my channel




